शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

औरंगाबाद जिल्ह्यात दररोज २५१ वाहनांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 20:15 IST

वाहनसंख्या पोहोंचली १३ लाखांवर 

ठळक मुद्देदुचाकींची संख्या तब्बल १० लाखअवघ्या ९ वर्षांत वाहनांची संख्या १३ लाख ७९ हजारांवर गेली आहे.

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : जिल्ह्यातील वाहनांची संख्या तब्बल १३ लाख ७९ हजारांवर पोहोचली आहे. महिन्याला सुमारे आठ हजार तर दररोज जवळपास २५१ नव्या वाहनांची भर पडत आहे. जुन्या आणि भंगार वाहनांनी प्रदूषणाला हातभार लागत असून, शुद्ध हवा आणि स्वच्छ वातावरण अशी औरंगाबादची ओळख नाहीशी होत आहे. 

शहराच्या लोकसंख्येएवढीच वाहने सध्या रस्त्यावर धावत आहेत. यामध्ये दुचाकींची संख्या १० लाखांवर आहे. वाहनांमधून कार्बन मोनोक्साईड, हायड्रोकार्बन असे विषारी वायू मोठ्या प्रमाणात बाहेर सोडले जातात. त्यास लगाम लावण्यासाठी सर्व प्रकारच्या वाहनांना पीयूसी तपासणी बंधनकारक करण्यात आलेली आहे. पर्यावरणाला धोकादायक ठरेल एवढ्या प्रमाणात विषारी वायू वाहनांतून बाहेर पडत नाही ना, हे पाहणे हा ‘पीयूसी’चा उद्देश आहे. मात्र, जिल्ह्यात पीयूसी केवळ दंड वाचविण्यासाठीचे साधन झाले आहे. ते देणाऱ्या यंत्रणेकडून गांभीर्याने तपासणी होत  नाही. शिवाय जिल्ह्यात दुचाकींची संख्या अधिक आहे. दुचाकींनाही दरवर्षी पीयूसी तपासणी बंधनकारक आहे. मात्र, त्याकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते. 

महिन्याला ७ ते ८ हजार नवीन वाहने रस्त्यांवरजिल्ह्यात दर महिन्याला सुमारे ७ ते ८ हजार नवीन वाहने रस्त्यांवर येत आहेत. वर्षाला एक लाख वाहनांची भर पडत आहे. २०१० मध्ये जिल्ह्यातील वाहनांची संख्या ५ लाख ८३ हजार होती. अवघ्या ९ वर्षांत वाहनांची संख्या १३ लाख ७९ हजारांवर गेली आहे. 

५४९ इलेक्ट्रिक दुचाकीजिल्ह्यात ५८५ इलेक्ट्रिक वाहने आहेत. यामध्ये इलेक्ट्रिक दुचाकींची संख्या ५४९ इतकी आहे. उर्वरित वाहने ही कंपन्यांमध्ये मालाची ने-आण करणारी आहेत. वायू प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने इलेक्ट्रिक वाहनांकडे पाहिले जाते; परंतु जिल्ह्यात त्यांची संख्या तोकडीच आहे. त्याशिवाय एकच सीएनजी वाहन आहे. 

फक्त ३६ सिटी बसशहरात आजघडीला केवळ ३६ स्मार्ट सिटी बस धावत आहे. शहराच्या तुलनेत त्यांची संख्या अपुरी आहे. परिणामी, दुचाकी वाहन वापरण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. त्यातूनच वाहनांची संख्या वाढत आहे आणि वायू प्रदूषणाला हातभार लागत आहे.

मानकांप्रमाणे हवे वायूंचे प्रमाणवाहनांसाठी दिलेल्या मानकांप्रमाणे वायूंचे प्रमाण पाहिजे. त्यापेक्षा अधिक प्रमाण असेल तर त्या वाहनाला पीयूसी प्रमाणपत्र दिले जात नाही. बीएस-३ वाहनांना सहा महिन्याला हे प्रमाणपत्र घ्यावे लागते, तर बीएस-४ वाहनांना दरवर्षी हे प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार यांनी सांगितले.

जिल्ह्यातील परिस्थितीएकूण वाहनांची संख्या    १३ लाख ७९ हजार ४६२दुचाकी    १० लाख ८६ हजार ५२९रिक्षा    ३४ हजार ७२७मोटार कार    ८२ हजार ४७९जीप    २९ हजार ३२२ट्रक    १५ हजार ८८३टँकर    ४ हजार ७८१ट्रॅक्टर    २९ हजार ३७६रुग्णवाहिका    ५३८मिनी बस    २ हजार १७९स्कूल बस    १ हजार १२५

असे हवे वायूचे प्रमाण- पेट्रोल वाहनकार्बन मोनोक्साईडची कमाल मर्यादा ३.५ %.हायड्रोकार्बनची कमाल मर्यादा ४५०० पीपीएम (पर पार्ट मिलियन)- डिझेल वाहनकाळ्या धुराचे प्रमाण- २.४५

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादenvironmentपर्यावरणpollutionप्रदूषण