शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

औरंगाबाद जिल्ह्यात १०००० हेक्टर गायरान अतिक्रमित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 13:48 IST

जिल्ह्यातील गायरान जमिनी अतिक्रमणाच्या विळख्यात येऊ लागल्या आहेत. १० हजार ४१८.८ हेक्टरहून अधिक सरकारी जमीन अतिक्रमित झाली आहे.

ठळक मुद्दे१३ हजार ५१० लोकांकडून सरकारी जमिनींवर अतिक्रमण केल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा प्रशासनाने अजून तरी कारवाईच्या दिशेने काहीही पाऊल उचलले नाही. 

- विकास राऊत 

औरंगाबाद : जिल्ह्यातील गायरान जमिनी अतिक्रमणाच्या विळख्यात येऊ लागल्या आहेत. १० हजार ४१८.८ हेक्टरहून अधिक सरकारी जमीन अतिक्रमित झाली आहे. एकेक करीत मोक्याच्या सरकारी जमिनी भूमाफियांच्या घशात चालली असताना जिल्हा प्रशासनाने अजून तरी कारवाईच्या दिशेने काहीही पाऊल उचलले नाही. 

१३ हजार ५१० लोकांकडून सरकारी जमिनींवर अतिक्रमण केल्याची माहिती समोर आली आहे. या आकडेवारीवरून लक्षात येते की, सरकारी जमीन बळकावणारे मोठे रॅकेट जिल्ह्यात सक्रिय आहे. तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार या पातळीवर सरकारी जमिनींची माहिती असते. ही यंत्रणा मागील काही वर्षांपासून सुस्तावल्यामुळे गायरान भूमाफियांच्या तावडीत जाऊ लागली आहे, असे दिसते. १९८८, १९९१ आणि २००१ सालच्या शासनादेश गायरान जमिनीबाबत प्रशासकीय पातळीवर निर्णय होत असले तरी काही जमिनींना हे आदेश लागू होत नसताना त्या अतिक्रमित झालेल्या आहेत. १९९१ च्या शासकीय आदेशानुसार काही ठिकाणचे अतिक्रमित गायरान नियमित करण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. झाल्टा फाट्यालगतची २६ एकर म्हाडासाठी दिलेली महसूल मालकीची जमीन अतिक्रमित झालेली आहे. ही गायरान जमीन असून, त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी एक महिन्यापूर्वी चर्चा झालेली आहे. अद्याप त्या ठिकाणी काहीही कारवाई झालेली नाही. तलाठी हे सातबारा व अभिलेखाचे कस्टोडियन असतात. गावातील शासकीय जमिनीची देखभाल करणे व त्यावर लक्ष ठेवणे हे त्यांचे प्रमुख काम असते. परंतु अलीकडे तलाठीच भूमाफियांना सहकार्य करीत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.

करोडीतील १५७ एकरही गेली असतीनायब तहसीलदार सतीश तुपे हे करोडी येथे तलाठी म्हणून कार्यरत असताना त्यांनी गट नं.२४ मधील १५७ एकर सरकारी जमीन अतिक्रमणापासून वाचविली होती. ११ हेक्टर ७३ आर असे या जमिनीचे मूळ क्षेत्र दाखविण्यात आले होते. परंतु तुपे यांनी ती जमीन पुन्हा मोजणीचे आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांकडून मिळविले. भूमी अभिलेख विभागाकडून ती जमीन मोजल्यानंतर ६२ हेक्टर ९३ आर इतके क्षेत्रफळ वाढले. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी तुपे यांच्या अहवालावरून सातबारा दुरुस्त केल्यामुळे ती जमीन अतिक्रमणापासून वाचली. नसता ती पूर्ण जमीन भूमाफियांच्या घशात गेली असती. त्या जमिनीवर आरटीओ कार्यालय, महावितरण, अग्निशमन केंद्र व इतर कार्यालय सध्या होत आहेत. दोन शैक्षणिक संस्था, विधि विद्यापीठासाठीदेखील ती जागा देण्याचा प्रस्ताव होता. जर ती जमीन अतिक्रमित झाली असती तर समृद्धी महामार्गात कोट्यवधी रुपयांचा मोबदला भूसंपादनासाठी अनेक भूमाफियांनी लाटला असता. 

टॅग्स :Aurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादNavalkishor Ramनवलकिशोर रामEnchroachmentअतिक्रमण