शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

राष्ट्रीय लोक अदालतमध्ये औरंगाबाद खंडपीठ देशात सर्वप्रथम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2017 7:20 PM

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील उच्च न्यायालय विधि सेवा उपसमितीतर्फे आयोजित राष्ट्रीय लोकअदालतमध्ये १,१५८ प्रकरणे निकाली निघाली. भूसंपादनाची एकूण १,५०० पैकी १,१३५ प्रकरणे आणि मोटार अपघाताची १७७ पैकी २३ प्रकरणे तडजोड करून निकाली काढण्यात आली.

ठळक मुद्देएकाच दिवसात १,१५८ प्रकरणे निकालीयामुळे शासनाच्या सुमारे दहा कोटी रुपयांची बचत झाली आहे. 

औरंगाबाद : मुंबई उच्च न्यायालयाच्याऔरंगाबाद खंडपीठातील उच्च न्यायालय विधि सेवा उपसमितीतर्फे आयोजित राष्ट्रीय लोकअदालतमध्ये १,१५८ प्रकरणे निकाली निघाली. भूसंपादनाची एकूण १,५०० पैकी १,१३५ प्रकरणे आणि मोटार अपघाताची १७७ पैकी २३ प्रकरणे तडजोड करून निकाली काढण्यात आली. यामुळे शासनाच्या सुमारे दहा कोटी रुपयांची बचत झाली आहे. 

वरील निकाली निघालेल्या प्रकरणांची संख्या पाहता संपूर्ण देशातील उच्च न्यायालयांच्या इतिहासात पहिल्यांदाच एका दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रकरणे निकाली काढण्याची ही पहिली वेळ आहे, असे उपसमितीतर्फे कळविण्यात आले आहे.  या वर्षातील राष्ट्रीय लोक अदालतमध्ये एकूण निकाली निघालेल्या प्रकरणांची संख्या जवळपास २,४६५ एवढी आहे. सदरील प्रकरणे निकाली निघाल्यामुळे शासनाचा वेळ, खर्च व मनुष्यबळाची निश्चितच बचत झालेली आहे. तसेच हजाराहून अधिक पक्षकारांना विनाविलंब व त्वरित न्याय व नुकसानभरपाईची रक्कम मिळणार आहे. त्यामुळे पक्षकारांचा प्रकरणे मिटवण्यासाठी ओघ वाढलेला आहे. उच्च न्यायालय विधि सेवा उपसमितीचे चेअरमन न्या. रवींद्र बोर्डे यांच्या आदेशावरून आणि प्रबंधक एच.ए. पाटील आणि आर.आर. काकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली ९ डिसेंबर रोजी खंडपीठात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केले होते.

या राष्ट्रीय लोकअदालतीसाठी न्या. व्ही.के. जाधव, न्या. पी.आर. बोरा, न्या. ए.एम. ढवळे, माजी जिल्हा न्यायाधीश ए.टी.ए.के. शेख, अ‍ॅड. के.बी. चौधरी, अ‍ॅड. के.सी. संत, अ‍ॅड. एस.पी. ब्रह्मे, अ‍ॅड. दसगावकर, अ‍ॅड. परांजपे आदींनी महत्त्वाची भूमिका बजावली. लोक अदालतीच्या यशस्वीतेसाठी सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे, सहायक सरकारील वकील अभिजित फुले, भूषण विर्धे, श्रीरंग दंडे, रवींद्र देशमुख, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, उपायुक्त महेंद्र हरपाळकर, शिवानंद टाकसाळे, पी.एल. सोरमारे, न्यायमूर्तींचे खाजगी सचिव अनिल भुन्ने, राजशिष्टाचार अधिकारी अरुण बक्षी, प्रभारी आस्थापना अधिकारी प्रमोद फटके आदींनी परिश्रम  घेतले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCourtन्यायालय