शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

पाणी प्रश्नावर राजकीय पोळी भाजून घेण्याचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 11:57 PM

मराठवाड्याच्या राजधानीचे शहर म्हणजे औरंगाबाद होय. शहर मागील एक दशकापासून तहानलेले आहे. शहरातील १५ लाखांहून अधिक नागरिकांना दररोज पाणी मिळत नाही. कोणाला दोन, तर कोणाला सहा दिवसाआड पाणी मिळते. शहराची तहान भागावी म्हणून काँग्रेस आघाडी सरकारने नऊ वर्षांपूर्वी महापालिकेला समांतर जलवाहिनी टाकण्यासाठी १९४ कोटींचा निधी दिला. या निधीवरील व्याजच ११४ कोटी झाले आहे.

मुजीब देवणीकरलोकमत न्यूज नेटवर्कमराठवाड्याच्या राजधानीचे शहर म्हणजे औरंगाबाद होय. शहर मागील एक दशकापासून तहानलेले आहे. शहरातील १५ लाखांहून अधिक नागरिकांना दररोज पाणी मिळत नाही. कोणाला दोन, तर कोणाला सहा दिवसाआड पाणी मिळते. शहराची तहान भागावी म्हणून काँग्रेस आघाडी सरकारने नऊ वर्षांपूर्वी महापालिकेला समांतर जलवाहिनी टाकण्यासाठी १९४ कोटींचा निधी दिला. या निधीवरील व्याजच ११४ कोटी झाले आहे. जायकवाडीपासून औरंगाबाद शहरापर्यंत पाणी आणण्यासाठी महापालिकेने औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीला ठेका दिला. ८०० कोटी रुपयांच्या या कामात कंपनीने ४०० कोटी रुपये टाकावेत असेही ठरले. २०१५ मध्ये प्रत्यक्ष कामही सुरू झाले. शहरात अजून पाणी आले नसताना कंपनीने दरवर्षी १० टक्के पाणीपट्टीत वाढ सुरू केली, कारण करारात तसे नमूद केले होते. कंपनीची सावकारी शहराला परवडणार नाही, म्हणून महापालिकेतील शिवसेना-भाजप युतीच्या शिलेदारांनी आॅक्टोबर २०१६ मध्ये कंपनीची हकालपट्टी केली.कंपनीने याबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून, अद्याप निकाल आलेला नाही. कंपनीने नुकसानभरपाई मिळावी म्हणून लवादाकडेही धाव घेतली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक शहरातील पाणी प्रश्नात लक्ष घातले. त्यांनी औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीसोबत मुंबईत एक बैठकही घेतली. बैठकीला औरंगाबाद शहरातील सर्व राजकीय पक्षांचे आमदारही उपस्थित होते. कंपनीने नागरिकांवर टाकलेल्या जाचक अटी, ज्यात दरवर्षी दहा टक्के पाणीपट्टीवाढ रद्द करण्याच्या सूचना केल्या. कंपनीने त्या मान्य केल्या. नव्याने करार करून शहराला पाणी मिळेल या दृष्टीने पाऊल उचलावे, असा सल्लाही त्यांनी दिला. कंपनीचे अधिकारी सोमवारी औरंगाबादेत दाखल झाले. महापालिकेतील सेना पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. याचवेळी भाजपच्या नगरसेवकांनी सिडको-हडको भागात अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या कारणावरून गोंधळ घातला. त्यामुळे कंपनीसोबत नियोजित बैठक होऊ शकली नाही.एकीकडे मुख्यमंत्री फडणवीस शहरातील पाणी प्रश्न सुटावा म्हणून सकारात्मक पाऊल टाकत आहेत. दुसरीकडे स्थानिक भाजप नगरसेवक फक्त सेनेला डिवचण्यासाठी समांतरच्या बैठकांवर पाणी फेरण्याचे काम करीत आहेत. हा विरोधाभास औरंगाबादकरांच्या पचणी पडायला तयार नाही. मागील दहा वर्षांपासून पाणी प्रश्न सोडविण्यात पदाधिकाºयांना यश आलेले नाही. शहरात पाणी येतअसताना त्यात खोडा घालण्याचे काम स्थानिक मंडळी करीत आहेत. पाणी प्रश्नावर आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचे हे प्रयत्न आहेत.प्रत्येक निवडणुकांमध्ये सेना-भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्यात समांतर जलवाहिनीचा प्रश्न सोडविणार, असे आश्वासन दिलेले असते. शहरातील पाणी प्रश्न अत्यंत गंभीर वळणार येऊन ठेपलेला असताना प्रा. विजय दिवाण यांच्या नेतृत्वाखालील समांतर जलवाहिनी कृती समितीनेही सोमवारी कंबर कसली. पुन्हा या शहरात समांतर जलवाहिनीची कंपनी येऊच देणार नाही, यासाठी लोकलढा उभारण्याची तयारीही त्यांनी दर्शविली. येणाºया काही दिवसांमध्ये समांतर जलवाहिनीचा प्रवास सोपा नाही.

टॅग्स :water shortageपाणीकपातAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका