शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

Atal Bihari Vajpayee : ‘हम तो जागे हैं, हम कहाँ सोये हैं’; अटलबिहारी वाजपेयींचा औरंगाबादशी होता विशेष स्नेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 16:04 IST

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा औरंगाबादशी वेगळा स्नेह होता. जनसंघापासून ते देशाच्या विदेशमंत्री पदापर्यंतच्या प्रवासात वाजपेयी अनेक वेळा या ऐतिहासिक शहरात येऊन गेले.

औरंगाबाद : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा औरंगाबादशी वेगळा स्नेह होता. जनसंघापासून ते देशाच्या विदेशमंत्री पदापर्यंतच्या प्रवासात वाजपेयी अनेक वेळा या ऐतिहासिक शहरात येऊन गेले. वाजपेयींच्या प्रमुख उपस्थितीत बैठका आणि जनसभाही झाल्या. अनेकदा त्यांनी सुभेदारी गेस्ट हाऊसवर मुक्काम केला. त्यावेळेस रात्रीच्या छोटेखानी मैफलीत ते संसदेमधील किस्से, कविता सर्वांना सांगत असत. शहरातील माजी आ. शालिग्राम बसैये, तसेच सुधीर देशपांडे (आबासाहेब) यांच्या घरीही ते येऊन गेले होते. या आठवणी खास लोकमतच्या वाचकांसाठी दयाराम बसैये व आबासाहेब देशपांडे यांनी सांगितल्या आहेत. 

‘ओ भाजपके लाल, तुम अब तो जागो’ दयाराम बसैैये यांनी सांगितले की, स्वतंत्र खलिस्तानच्या मागणीसाठी पंजाबमध्ये आतंकवाद वाढला होता. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी औरंगाबादेत आले होते. आमचे बंधू त्यावेळेस भाजपचे शहराध्यक्ष होते. पंजाबमधील आतंकवादामुळे चिडून मी कविता लिहिली होती आणि आमचे मोठे बंधू शालिग्राम बसैये यांना मी ती कविता अटलजींना दाखविण्याची विनंती केली. सुभेदारी गेस्ट हाऊसवर बंधूंनी अटलजींशी माझी भेट करून दिली. अटलजी म्हणाले की, दयाराम आपने कविता की है बहुत अच्छे, तुम्हने ही कविता की है ना. मी म्हणालो हो. लगेच अटलजीने कविता लिहिलेला कागद माझ्या हातातून घेतला व म्हणाले ‘अब बोलो कविता’. कविता मुखपाठ होती. ‘ओ भाजप के लाल, तुम अब तो जागो’ ही कविता मी म्हटली. लगेच अटलजी म्हणाले की ‘हम तो जागे है, हम कहाँ सोये है’ या हजरजबाबी उत्तराने उपस्थितांमध्ये एकच हास्य पिकले. 

ते म्हणाले, येथे स्वयंसेवकांची संख्या कमी...दयाराम बसैये यांनी सांगितले की, अटलजी जेव्हा विदेशमंत्री होते. त्यावेळेस शहरात कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते. सुभेदारी गेस्ट हाऊसवर मुक्काम करून सकाळी चिकलठाणा विमानतळावर ते जाण्यासाठी निघाले. विमान येण्यास वेळ असल्याने त्यांनी लेबर कॉलनी येथील राणाप्रताप प्रभात शाखेत हजेरी लावली. त्यावेळेस तेथील छोटे मैदान नागरिकांनी खचून भरून गेले होते. त्यावेळेस अटलजींचे ऊर्जेने भरलेले बौद्धिक पार पडले. त्यावेळेस उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजविल्या. ते पाहून अटलजी लगेच म्हणाले की, या ठिकाणी स्वयंसेवकांची संख्या खूप कमी आहे. बिगरस्वयंसेवक जास्त आहेत. कारण, स्वयंसेवक शाखेत कधीच टाळ्या वाजवत नाहीत.

कार्यकर्ते विसरून जातात म्हणून...विदेशमंत्री असताना अटलजी विमानाने सकाळी शहरात आले. नेहमीप्रमाणे त्यांची व्यवस्था सुभेदारी गेस्ट हाऊसवर करण्यात आली होती. दयाराम बसैये म्हणाले की, त्यादिवशी सकाळी अटलजी सुभेदारी गेस्ट हाऊसवर पोहोचल्यावर फ्रेश होऊन आले आणि शालिग्राम बसैये यांना म्हणाले की, मेरा कल का हवाईजहाज का तिकीट किधर है. त्यावेळेस बंधूंनी लगेच तिकीट त्यांच्याकडे सुपूर्द केले. मी म्हटले की, ‘अटलजी असे का? तेव्हा त्यांनी उत्तर दिले की, ‘कार्यकर्ते कार्यक्रमाच्या आधी व पश्चात नियोजनात असतात. जेव्हा विमानाने जायची वेळ येते तेव्हा तिकीट कोणत्या कार्यकर्त्याकडे दिले हे माहीत नसते. ज्याच्याकडे  असते तोही व्यस्त असतो. आपली अडचण होऊ नये, म्हणून मी आधीच तिकीट मागून घेत असतो. 

बदले नही अटलजी जगन्नाथ बसैये यांनी सांगितले की, भाजपच्या प्रदेश अधिवेशनाच्या निमित्ताने ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी शहरात आले होते. त्यावेळेस दयाराम बसैये यांनी हिंदीतून मराठीत अनुवाद केलेले ‘वंदले अटलजी’ हे पुस्तक मोठे बंधू शालिग्राम बसैये यांनी अडवाणींना दिले. त्यांनी दिल्लीमध्ये ते पुस्तक अटलजींकडे सुपूर्द केले. ‘वंदले अटलजी’ हे वाचून लगेच अटलजी अडवाणींना म्हणाले, ‘बदले नही अटलजी, मै तो वही हू, वंदले अटलजी,’ असे म्हणत त्यांनी कोटी केली. त्यावेळेस अडवाणीही मोठ्याने हसले. 

रात्रीच्या वेळी रंगणारी मैफलदयाराम बसैये यांनी सांगितले की, जेव्हा अटलजी औरंगाबादेत येत तेव्हा तेव्हा सुभेदारी गेस्ट हाऊस येथे त्यांचा मुक्काम असे. मग आमचे मोठे बंधू शालिग्राम बसैये, ओमप्रकाश बसैये, लहान बंधू जगन्नाथ बसैये, तसेच शहरातील जनसंघाचे व नंतर भाजपचे कार्यकर्ते असे काही जण यांची रात्री ८.३० वाजेनंतर मैफल रंगत असे. अटलजी म्हणायचे, ‘बसैय्ये बंधू आपने मेरा दूध और च्यवनप्राश लाया क्या.’ गरमागरम दूध पिल्यानंतर व च्यवनप्राश खाल्ल्यानंतर अटलजी संसदेतील तत्कालीन दिग्गज नेत्यांचे भाषण व तेथील गमती-जमती त्यांच्या स्टाईलमध्ये सांगत असत. अखेरीस स्वरचित काही ओळीही ते ऐकवत असत. अटलजींचा असा सहवास आम्हाला काही वेळा लाभला. 

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू