शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

Atal Bihari Vajpayee : ‘हम तो जागे हैं, हम कहाँ सोये हैं’; अटलबिहारी वाजपेयींचा औरंगाबादशी होता विशेष स्नेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 16:04 IST

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा औरंगाबादशी वेगळा स्नेह होता. जनसंघापासून ते देशाच्या विदेशमंत्री पदापर्यंतच्या प्रवासात वाजपेयी अनेक वेळा या ऐतिहासिक शहरात येऊन गेले.

औरंगाबाद : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा औरंगाबादशी वेगळा स्नेह होता. जनसंघापासून ते देशाच्या विदेशमंत्री पदापर्यंतच्या प्रवासात वाजपेयी अनेक वेळा या ऐतिहासिक शहरात येऊन गेले. वाजपेयींच्या प्रमुख उपस्थितीत बैठका आणि जनसभाही झाल्या. अनेकदा त्यांनी सुभेदारी गेस्ट हाऊसवर मुक्काम केला. त्यावेळेस रात्रीच्या छोटेखानी मैफलीत ते संसदेमधील किस्से, कविता सर्वांना सांगत असत. शहरातील माजी आ. शालिग्राम बसैये, तसेच सुधीर देशपांडे (आबासाहेब) यांच्या घरीही ते येऊन गेले होते. या आठवणी खास लोकमतच्या वाचकांसाठी दयाराम बसैये व आबासाहेब देशपांडे यांनी सांगितल्या आहेत. 

‘ओ भाजपके लाल, तुम अब तो जागो’ दयाराम बसैैये यांनी सांगितले की, स्वतंत्र खलिस्तानच्या मागणीसाठी पंजाबमध्ये आतंकवाद वाढला होता. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी औरंगाबादेत आले होते. आमचे बंधू त्यावेळेस भाजपचे शहराध्यक्ष होते. पंजाबमधील आतंकवादामुळे चिडून मी कविता लिहिली होती आणि आमचे मोठे बंधू शालिग्राम बसैये यांना मी ती कविता अटलजींना दाखविण्याची विनंती केली. सुभेदारी गेस्ट हाऊसवर बंधूंनी अटलजींशी माझी भेट करून दिली. अटलजी म्हणाले की, दयाराम आपने कविता की है बहुत अच्छे, तुम्हने ही कविता की है ना. मी म्हणालो हो. लगेच अटलजीने कविता लिहिलेला कागद माझ्या हातातून घेतला व म्हणाले ‘अब बोलो कविता’. कविता मुखपाठ होती. ‘ओ भाजप के लाल, तुम अब तो जागो’ ही कविता मी म्हटली. लगेच अटलजी म्हणाले की ‘हम तो जागे है, हम कहाँ सोये है’ या हजरजबाबी उत्तराने उपस्थितांमध्ये एकच हास्य पिकले. 

ते म्हणाले, येथे स्वयंसेवकांची संख्या कमी...दयाराम बसैये यांनी सांगितले की, अटलजी जेव्हा विदेशमंत्री होते. त्यावेळेस शहरात कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते. सुभेदारी गेस्ट हाऊसवर मुक्काम करून सकाळी चिकलठाणा विमानतळावर ते जाण्यासाठी निघाले. विमान येण्यास वेळ असल्याने त्यांनी लेबर कॉलनी येथील राणाप्रताप प्रभात शाखेत हजेरी लावली. त्यावेळेस तेथील छोटे मैदान नागरिकांनी खचून भरून गेले होते. त्यावेळेस अटलजींचे ऊर्जेने भरलेले बौद्धिक पार पडले. त्यावेळेस उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजविल्या. ते पाहून अटलजी लगेच म्हणाले की, या ठिकाणी स्वयंसेवकांची संख्या खूप कमी आहे. बिगरस्वयंसेवक जास्त आहेत. कारण, स्वयंसेवक शाखेत कधीच टाळ्या वाजवत नाहीत.

कार्यकर्ते विसरून जातात म्हणून...विदेशमंत्री असताना अटलजी विमानाने सकाळी शहरात आले. नेहमीप्रमाणे त्यांची व्यवस्था सुभेदारी गेस्ट हाऊसवर करण्यात आली होती. दयाराम बसैये म्हणाले की, त्यादिवशी सकाळी अटलजी सुभेदारी गेस्ट हाऊसवर पोहोचल्यावर फ्रेश होऊन आले आणि शालिग्राम बसैये यांना म्हणाले की, मेरा कल का हवाईजहाज का तिकीट किधर है. त्यावेळेस बंधूंनी लगेच तिकीट त्यांच्याकडे सुपूर्द केले. मी म्हटले की, ‘अटलजी असे का? तेव्हा त्यांनी उत्तर दिले की, ‘कार्यकर्ते कार्यक्रमाच्या आधी व पश्चात नियोजनात असतात. जेव्हा विमानाने जायची वेळ येते तेव्हा तिकीट कोणत्या कार्यकर्त्याकडे दिले हे माहीत नसते. ज्याच्याकडे  असते तोही व्यस्त असतो. आपली अडचण होऊ नये, म्हणून मी आधीच तिकीट मागून घेत असतो. 

बदले नही अटलजी जगन्नाथ बसैये यांनी सांगितले की, भाजपच्या प्रदेश अधिवेशनाच्या निमित्ताने ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी शहरात आले होते. त्यावेळेस दयाराम बसैये यांनी हिंदीतून मराठीत अनुवाद केलेले ‘वंदले अटलजी’ हे पुस्तक मोठे बंधू शालिग्राम बसैये यांनी अडवाणींना दिले. त्यांनी दिल्लीमध्ये ते पुस्तक अटलजींकडे सुपूर्द केले. ‘वंदले अटलजी’ हे वाचून लगेच अटलजी अडवाणींना म्हणाले, ‘बदले नही अटलजी, मै तो वही हू, वंदले अटलजी,’ असे म्हणत त्यांनी कोटी केली. त्यावेळेस अडवाणीही मोठ्याने हसले. 

रात्रीच्या वेळी रंगणारी मैफलदयाराम बसैये यांनी सांगितले की, जेव्हा अटलजी औरंगाबादेत येत तेव्हा तेव्हा सुभेदारी गेस्ट हाऊस येथे त्यांचा मुक्काम असे. मग आमचे मोठे बंधू शालिग्राम बसैये, ओमप्रकाश बसैये, लहान बंधू जगन्नाथ बसैये, तसेच शहरातील जनसंघाचे व नंतर भाजपचे कार्यकर्ते असे काही जण यांची रात्री ८.३० वाजेनंतर मैफल रंगत असे. अटलजी म्हणायचे, ‘बसैय्ये बंधू आपने मेरा दूध और च्यवनप्राश लाया क्या.’ गरमागरम दूध पिल्यानंतर व च्यवनप्राश खाल्ल्यानंतर अटलजी संसदेतील तत्कालीन दिग्गज नेत्यांचे भाषण व तेथील गमती-जमती त्यांच्या स्टाईलमध्ये सांगत असत. अखेरीस स्वरचित काही ओळीही ते ऐकवत असत. अटलजींचा असा सहवास आम्हाला काही वेळा लाभला. 

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू