शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
2
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
3
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
4
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
5
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
6
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
7
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
8
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
9
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
10
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
11
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
12
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
14
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
15
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
16
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
17
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
18
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
19
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
20
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई

मराठवाड्यात झालेल्या कृत्रिम पावसाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2017 7:40 PM

मराठवाड्यात जून ते सप्टेंबर २०१५ या काळात करण्यात आलेल्या कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. जपानमध्ये झालेल्या एका परिषदेत त्या प्रयोगावर सादर करण्यात आलेला रिसर्च पेपर (शोधनिबंध) प्रकाशित झाला आहे.

ठळक मुद्देपुढच्या वर्षी हवामान खाते स्वत:चे विमान घेणारते कायमस्वरूपी तंत्रज्ञान राज्यभरात दुष्काळी भागात कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी वापरण्यात येणार 

- विकास राऊत 

औरंगाबाद : मराठवाड्यात जून ते सप्टेंबर २०१५ या काळात करण्यात आलेल्या कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. जपानमध्ये झालेल्या एका परिषदेत त्या प्रयोगावर सादर करण्यात आलेला रिसर्च पेपर (शोधनिबंध) प्रकाशित झाला आहे. त्या प्रयोगानंतर हवामान खाते पुढच्या वर्षी कृत्रिम पावसासाठी स्वत:चे विमान खरेदी करणार आहे. ते कायमस्वरूपी तंत्रज्ञान राज्यभरात दुष्काळी भागात कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी वापरण्यात येणार आहे. 

रडारच्या साहाय्याने तयार करण्यात आलेला डाटा हवामान खात्याला देण्यात आला आहे. त्याचे विश्लेषण करण्यात आल्यानंतर विमान खरेदी करण्याबाबत निर्णय झाला आहे. पुढच्या वर्षी त्याचा फायदा होईल. जून २०१८ मध्ये कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी शासनाची स्वत:ची यंत्रणा तयार असेल. सी-बॅण्ड डॉप्लर रडार, विमान व इतर साम्रगी शासन खरेदी करण्याच्या तयारीत आहे. २७ कोटी रुपये खर्चातून हाती घेण्यात आलेला कृत्रिम पावसाचा प्रयोग १४ दिवस करण्यात आला होता. १०० तासांवर १०० तास मोफत असा करार ख्याती वेदर मॉडिफिकेशन या कंपनीसोबत करण्यात आला होता.

११० तासांच्या आसपास विमानाने प्रयोग करून ९५० मि.मी.पर्यंत पाऊस पाडल्याचा दावा प्रशासनाने केला होता. कराराच्या ५० टक्केच उड्डाण झाले होते, तरीही १३ कोटी ५० लाख रुपयांचा जास्तीचा खर्च कंपनीला द्यावा लागला होता. २७ कोटींमध्ये ९० दिवस क्लाऊड सीडिंगचा प्रयोग करण्याचे कंत्राट देण्यात आले होते. विमान पार्किंग, शास्त्रज्ञ, पायलटस्, तंत्रज्ञांचे आवास, निवास खर्चासह ते कंत्राट होते. ४ आॅगस्ट रोजी प्रयोगाला सुरुवात झाली होती.

फ्लेअर्स गेले कुठे...२०१५ आॅगस्टमध्ये ३४८, सप्टेंबरमध्ये २०१ असे ५४९ फ्लेअर्स ढगांमध्ये सोडण्यात आले होते. ३ हजार फ्लेअर्सचा साठा करून ठेवण्यात आला होता. विमान गेल्यानंतर चिकलठाणा विमानतळावरील तो साठा कुठे गेला, याबाबत नायब तहसीलदार बी.डी. म्हस्के यांना विचारले असता ते म्हणाले, याबाबत आपल्याला काहीही माहिती नाही.तत्कालीन आपत्तीव्यवस्थापन संचालक तथा भंडारा जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, फोडून शिल्लक राहिलेले फ्लेअर्स विमानासोबतच नेण्यात आले. त्यामुळे त्यांचा साठा शिल्लक राहिला नाही. 

जपानच्या परिषदेत शोधनिबंधजपानच्या एका परिषदेत तत्कालीन आपत्तीसंचालक सुहास दिवसे यांनी शोधनिबंध सादर केला. तो निबंध प्रकाशित झाला आहे. दिवसे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, ‘आंतरराष्ट्रीय स्तरावर कृत्रिम पावसाबाबत मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. चीनने या प्रयोगात मोठे यश मिळविले आहे. राज्य शासन पुढच्या वर्षात कृत्रिम पावसाची पूर्ण यंत्रणा खरेदी करण्याच्या तयारीत आहे.’ 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRainपाऊस