शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

औरंगाबादेत साधू-संतांच्या आगमनाने चैैतन्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 11:53 PM

इमारतीवरून होणारी पुष्पवृष्टी... रांगोळीने सजविलेले रस्ते... विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकांनी आणलेली रंगत... रविवारी (दि.२२) सकाळी अशा मंगलमय वातावरणात अध्यात्मयोगी आचार्य विशुद्धसागरजी गुरुदेव यांनी शहरात प्रवेश केला तेव्हा उपस्थित शेकडो श्रावक-श्राविकांनी ‘जयकारा गुरुदेव का जय जय गुरुदेव’ असा गगनभेदी जयघोष केला.

ठळक मुद्देचातुर्मास प्रवेश : पुष्पवृष्टी, जयजयकाराने शोभायात्रा लक्षवेधी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : इमारतीवरून होणारी पुष्पवृष्टी... रांगोळीने सजविलेले रस्ते... विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकांनी आणलेली रंगत... रविवारी (दि.२२) सकाळी अशा मंगलमय वातावरणात अध्यात्मयोगी आचार्य विशुद्धसागरजी गुरुदेव यांनी शहरात प्रवेश केला तेव्हा उपस्थित शेकडो श्रावक-श्राविकांनी ‘जयकारा गुरुदेव का जय जय गुरुदेव’ असा गगनभेदी जयघोष केला. चातुर्मासानिमित्ताने १९ साधू-संतांच्या आगमनाने सकल जैन समाजात नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले. एक अभूतपूर्व शोभायात्रा अनुभवल्याच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया प्रत्येक जण व्यक्त करीत होते.खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्वनाथ मंदिर राजाबाजारतर्फे चातुर्मास सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हजारो कि.मी.चा पायी प्रवास करून आचार्य विशुद्धसागरजी गुरुदेव ससंघ शहरात पोहोचले. त्यांच्या स्वागतासाठी सकाळी ६ वाजेपासून जैन समाजबांधव जमा झाले होते. महाराज ससंघाचे आगमन झाले तेव्हा सर्वांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. आकाशवाणी चौकात सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा यांनी गुरुदेव ससंघाचे स्वागत केले. यावेळी खा.चंद्रकांत खैरे, आ. अतुल सावे, महापौर नंदकुमार घोडेले, प्रफुल्ल मालाणी आदींची उपस्थिती होती. यावेळी जालना रोडवरील इमारतीवरून साधू-संतांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. ‘कोण आये भाई कोण आये... जैन धर्म के वीर आये’, ‘जयकारा गुरुदेव का जयजय गुरुदेव’ असा जयघोष केला जात होता. सुवासिनी मंगलकलश डोक्यावर घेऊन अग्रभागी चालत होत्या. काही महिलांनी हाती पंचरंगी ध्वज घेतला होता. तर काही महिला टाळ वाजवीत भजन म्हणत नृत्य करीत होत्या. पी. यू. जैन विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट लेझीम पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. युवकांच्या ढोल पथकाने ढोलवादन करून परिसर दणाणून सोडला होता. बँड पथकांनी धार्मिक, देशभक्तीपर गीत सादर करून शोभायात्रेची रंगत आणखी वाढविली. शोभायात्रेत आचार्य विशुद्धसागरजी गुरुदेव सर्वात पुढे, त्यांच्या मागे १९ साधू-संत व त्यांच्या मागे सर्व श्रावक-श्राविका चालत होते. शोभायात्रा मार्गावर जागोजागी सुरेख रांगोळी काढण्यात आल्या होत्या. जागोजागी गुरुदेवांचे पादप्रक्षालन केले जात होते. रस्त्याच्या कडेला थांबून भाविक गुरुदेव ससंघाचे दर्शन घेत होते.शोभायात्रा मोंढानाका, लक्ष्मण चावडी, गांधीनगर, मोतीकारंजा, चौराहा, किराणा चावडीमार्गे राजाबाजारातील जैन मंदिरात पोहोचली. येथे पार्श्वनाथ भगवंतांचे दर्शन घेऊन शोभायात्रा नवाबपुरा येथील हिराचंद कस्तुरचंद कासलीवाल प्रांगणात पोहोचली. येथे १०८ दाम्पत्यांनी साधू-संतांचे पादप्रक्षालन केले तेव्हा हे दृश्य हजारो भाविकांनी ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवले. येथे आयोजित कार्यक्रमात जैन पंचायतचे अध्यक्ष ललित पाटणी, हिराचंद कासलीवाल परिवार यांनी गुरुदेवाचे पादप्रक्षालन केले. सूत्रसंचालन प्रवीण लोहाडे यांनी केले. यावेळी सकल जैन समाजाचे महावीर पाटणी, मिठालाल कांकरिया, तसेच अशोक अजमेरा, अ‍ॅड. एम. आर. बडजाते, विनोदकुमार लोहाडे, माणिकचंद गंगवाल, अ‍ॅड. डी. बी. कासलीवाल, अ‍ॅड. प्रमोदकुमार कासलीवाल, प्रकाश पाटणी, विजयकुमार पाटणी यांच्यासह सर्व श्रावक-श्राविका उपस्थित होत्या.अंतरात्म्यातील भगवंताला प्रकट करा - आचार्य विशुद्धसागरजीहिराचंद कस्तुरचंद कासलीवाल मैदानावरील भव्य धर्मपीठावर कमळाच्या सजावटीत आचार्य विशुद्धसागरजी गुरुदेव व १९ साधू-संत विराजमान झाले होते. यावेळी औरंगाबादपर्यंतच्या पायी प्रवासात साधू-संतांची सेवा करणारे संघपती, संजय कासलीवाल परिवार व अशोककुमार गंगवाल परिवाराचा गुरुदेव यांनी गौरव केला.प्रवचनात गुरुदेव म्हणाले की, आज शहरात तीर्थंकर महावीरांचे प्रतिनिधी म्हणून आलो आहोत. ज्यांना मंदिरात जावे वाटते, साधू-संतांचे प्रवचन ऐकावे वाटते ते सर्व श्रावक-श्राविका भविष्यातील भगवंत आहेत. आपल्या अंतरात्म्यातील भगवंताला प्रगट करा, असे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमAurangabadऔरंगाबाद