शहरं
Join us  
Trending Stories
1
'वक्फ बोर्डाच्या जमिनी मूळ मालकांना परत मिळाव्या'; चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
4
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
5
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
6
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
7
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
8
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
9
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
10
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
11
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
12
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
13
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
14
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
15
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
17
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
18
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
19
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"
20
माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डींच्या बेकायदा बांधकामावर बुलडोझर; तक्रारीनंतर महापालिकेची कारवाई!

पैसे देऊन लग्न जुळवले; लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी दागिन्यांसह नवरीने ठोकली धूम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 11:24 AM

बनावट टोळीमधील पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

वैजापूर, शिऊर : लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी अंगावरील दागिन्यांसह नवरीने धूम ठाेकल्याची घटना वैजापूर तालुक्यातील मनूर येथे गुरुवारी सकाळी दहा वाजता उघडकीस आली आहे. दरम्यान, याप्रकरणी नवरीसह लग्न लावून देणाऱ्या बनावट टोळीमधील पाच जणांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवरी नंदिनी राजू गायकवाड (रा. गांधीनगर, अकोट फैल, जि. अकोला), अनिल दिगंबर जोशी (रा. जवळी खुर्द, ता. कन्नड), मनीषा गजानन मानवते(रा. खामगाव, जि. बुलढाणा), पूजा विजय माने (रा. महाडीकवाडी, लिंगीवरे, जि. सांगली), रणजित (रा. हिंगोली, पूर्ण नाव माहीत नाही) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सहा जणांची नावे आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार मनूर येथील अंबादास विश्वनाथ दवंगे (वय २९ वर्षे) हा तरुण गेल्या अनेक महिन्यांपासून लग्नासाठी मुलीचा शोध घेत होता. परंतु त्याला मुलगी मिळत नव्हती. दरम्यान, नात्यामधील एका व्यक्तीने लग्न जुळवून देणाऱ्या रणजित नामक व्यक्तीशी अंबादास याचा संपर्क करून दिला. योग्य मुलगी मिळेल, परंतु त्यासाठी १ लाख ८१ हजार रुपये लागतील, असे रणजितने सांगितल्यानंतर अंबादासने होकार दिला. त्यानंतर दलालानेही नंदिनीची अंबादाससोबत भेट घालून दिली. १० एप्रिल रोजी दुपारी मनूर येथील एका मंदिरात या दोघांचा विवाहही पार पडला. लग्न लागताच रणजितने ठरलेली रक्कम अंबादासकडून घेऊन तो त्या सहकाऱ्यांसोबत तेथून निघून गेला.

मोटारसायकलवरून नवरी मध्यरात्री झाली गायबयाच दिवशी रात्री नवरदेव अंबादास घराच्या छतावर तर नववधू अंबादासची मावशी व इतर नातेवाईक महिलांसोबत घरात झोपली होती. दरम्यान, नवरी घरात नसल्याची ओरड मध्यरात्री सुरू झाली. गुरुवारी सकाळी नंदिनी अंगावरील दागिन्यांसह एका अनोळखी व्यक्तीच्या मोटारसायकलवर बसून निघून गेल्याचे तरुणाला समजले. याप्रकरणी दुपारी अंबादासने शिऊर पोलिस ठाणे गाठून पोलिसांना आपबिती कथन केली. त्यानुसार पोलिसांनी त्या सहा आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी