शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही पिताय ते पाणी फिल्टरचे की विहिरीचे ? प्रत्येक वसाहतीमध्ये एक जार सेंटर, नियम धाब्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2022 15:18 IST

बहुतांश विक्रेते विंधन विहिरीच्या पाण्याचा वापर करतात. ग्राहक संख्या जास्त आहे, तेथे विहिरीच्या पाण्याचा वापर केला जातो.

औरंगाबाद : महापालिकेकडून पाणीपुरवठा होत नसलेल्या वसाहतींसह प्रत्येक व्यापाऱ्याकडे दुकानात पाण्याच्या जारचा वापर सुरू आहे. नेमके हे पाणी आहे तरी कुठले, याची साधी चौकशीही कोणी करीत नाही. नागरिकांना अवघ्या २० रुपयांमध्ये मिळणारे जारचे पाणी विहिरीचे आहे का विंधन विहिरीचे, हेसुद्धा शासकीय यंत्रणा तपासायला तयार नाही.

शहरात पाणी विक्रीचा व्यवसाय हळूहळू मोठ्या प्रमाणात वाढतोय. प्रत्येक वसाहतीमध्ये किमान एका ठिकाणी तरी जारची विक्री होते. बहुतांश विक्रेते विंधन विहिरीच्या पाण्याचा वापर करतात. ग्राहक संख्या जास्त आहे, तेथे विहिरीच्या पाण्याचा वापर केला जातो. मात्र, हे पाणी पिण्यासाठी योग्य आहे किंवा नाही, याची तपासणी अनेकजण प्रयोगशाळेमार्फत करीत नाहीत. पाणी शुद्ध करून विकणे हा एकमेव उपक्रम त्यांचा सध्या सुरू आहे.

पाण्यावर कमवतात पाण्यासारखा पैसा...शहरात पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. महापालिकेकडे जास्तीचे पाणी नाही. त्यामुळे पाण्याचा व्यवसाय करणाऱ्या मंडळींचे फावते. शहराच्या आसपास तयार होणाऱ्या नवीन वसाहती, व्यावसायिक अशा मंडळींनाच जार चालक पाणी विकतात. या व्यवसायात दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.

‘लोकमत’ने काय पाहिले?१) मुकुंदवाडी, गणेश कॉलनी, सिडको- एन-७, जटवाडा रोड आदी भागात विंधन विहिरीचे पाणी थेट जारमध्ये भरून विकायला नेण्यात येते. कुठेही पाणी शुद्ध करण्याची यंत्रणा नाही.२) चिकलठाणा, गुलमंडी आदी भागात काही मंडळी सामाजिक दायित्व म्हणून ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर पाण्याची विक्री करतात.

एक जार २० रुपयांना२० लिटरचा एक जार २० रुपयांना देण्यात येतो. व्यापाऱ्यांना दुकानावर दररोज एक किंवा त्यापेक्षा जास्त जार दिले जातात. अनेक वसाहतींमध्ये जार घरपोच दिले जातात. अनेक नागरिक स्वत: दुकानांवरून हे पाणी घरी नेतात.

जार व्यवसायावर नियंत्रण कोणाचे?अन्न व औषध प्रशासनाने पाण्याची गुणवत्ता तपासली पाहिजे. मात्र, या विभागाकडून आजपर्यंत दुर्लक्ष करण्यात आले. नियम धाब्यावर बसवून पाण्याची विक्री सुरू असल्याबद्दल एकाही जार चालकावर कारवाई झालेले नाही.

या पाण्याची कधी तपासणी होते का?महापालिका पाणीपुरवठा करण्यासाठी किमान चार ते पाच ठिकाणी पाण्याची तपासणी करते. खासगी जार चालक अजिबात तपासणी करीत नाहीत. संबंधित यंत्रणाही गांभीर्याने लक्ष देत नाही.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी