शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
5
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
6
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
7
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
8
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
9
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
10
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
11
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
12
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
13
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
14
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
15
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
16
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
17
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
18
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
19
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
20
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!

‘कमान’ गायब, गोंधळ कायम! छत्रपती संभाजीनगरातील शिवाजीनगर भुयारी मार्गात खोळंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 19:18 IST

वऱ्हाडींच्या दोन ट्रॅव्हल्समुळे दोन्ही बाजूंनी तासभर वाहने अडकली, भुयारी मार्गातून ‘राँग साईड’ वाहने घुसली

छत्रपती संभाजीनगर : शिवाजीनगर भुयारी मार्गासाठी एका बाजूने बसवण्यात आलेली एक लोखंडी कमानच गायब असल्याने रोजच वाहतुकीचा खेळखंडोबा होत आहे.

मंगळवारीदेखील लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या दोन ट्रॅव्हल्सने भर दुपारी १२ वाजता भुयारी मार्गात बस घुसवली. परिणामी, वाहतुकीत अडकलेले नागरिक घामाने ओलेचिंब होत कर्णकर्कश आवाजाने हैराण झाले. तरीही संबंधित शासकीय यंत्रणांना गांभीर्य नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.

रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शिवाजीनगरच्या भुयारी मार्गाच्या बांधकामादरम्यान अभियंत्यांनी केलेला बेजबाबदारपणा उघडा पडला. यामुळे शहरासोबत शासकीय विभागांची नाचक्की झाली. लोकार्पणावेळी श्रेयासाठी उपस्थित नेत्यांनी भुयारी मार्गातील चुका उघड झाल्यानंतर मात्र पाठ फिरवली. पाण्याच्या निचऱ्यासोबतच या भुयारी मार्गाच्या लांबी, रुंदी व उंचीवरून गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. वाहनांबाबत कुठलीच स्पष्टोक्ती नसल्याने नागरिकांना रोज येथे वाहतूक खोळंब्याच्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे.

कमान एक; बसवणार कोण व कधी?जड, अवजड वाहनांना प्रवेशबंदीसाठी भुयारी मार्गाच्या दोन्ही बाजूंनी ३.४ मीटरची अभियंत्यांनी मोठ्या आकाराची लोखंडी कमान बसवली. मात्र, शिवाजीनगर चौकातील कमान अनेक दिवसांपूर्वी अपघातामुळे काढण्यात आली. त्यानंतर ती बसवण्याचे कष्ट संबंधित विभागाने घेतलेच नाहीत. या कमानीची उंची कमी करून तत्काळ बसवावी, असे पत्रही वाहतूक पोलिसांनी काढले. मात्र नियमांवर बोट ठेवत सा. बां. व रेल्वे विभागाचे नाव सांगत हात वर केले.

रोजच डोक्याला ताप? सांगावे कोणाला?मंगळवारी दुपारी १२ वाजता लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हल्स शिवाजीनगरकडून देवळाईच्या दिशेने जात भुयारी मार्गात गेल्या. तोपर्यंत चालकाला देवळाई चौकातील प्रवेशबंदीची लोखंडी कमान दिसली नाही. शिवाय भुयारी मार्गाच्या उंचीचा अंदाजही आला नाही. त्यामुळे तासभर वाहतूक खोळंबली. स्थानिक व्यापारी, रहिवाशांनी मात्र रोजच हा डोक्याला ताप झालाय, सांगावे कोणाला, असा संतप्त प्रश्न केला.

वाहतूक पाेलिसांच्या मते-भुयारी मार्गाच्या दोन्ही बाजूंना प्रवेशबंदीचे दोन मोठे फलक अपेक्षित.-गती, कुठल्या वाहनांना प्रवेश, हे स्पष्ट सांगणारे फलक लावावेत.-देवळाई, शिवाजीनगर चौकातील रिक्षाचालकांसाठी जागा निश्चित करावी.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाTrafficवाहतूक कोंडीrailwayरेल्वे