शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
4
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
5
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
7
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
8
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
9
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
10
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
11
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
12
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
13
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
14
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
15
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
16
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
17
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
18
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
19
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
20
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर

निलंबितांना बसणार चाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 00:53 IST

प्रशासकीय कारणास्तव निलंबित झालेले जिल्हा परिषदेतील सुमारे ४० कर्मचारी घरी बसून ५० ते ७५ टक्के वेतन उचलतात. यापुढे अशा प्रकारे फुकटचे वेतन उचलणाऱ्या कर्मचा-यांना आवर घालण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी घेतला असून, लवकरच यासंबंधीचा आढावा घेतला जाणार आहे.

ठळक मुद्देसमिती घेणार आढावा : औरंगाबाद जि.प.चे ४० निलंबित कर्मचारी घेतात घरी बसून पगार

विजय सरवदे ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : प्रशासकीय कारणास्तव निलंबित झालेले जिल्हा परिषदेतील सुमारे ४० कर्मचारी घरी बसून ५० ते ७५ टक्के वेतन उचलतात. यापुढे अशा प्रकारे फुकटचे वेतन उचलणाऱ्या कर्मचा-यांना आवर घालण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी घेतला असून, लवकरच यासंबंधीचा आढावा घेतला जाणार आहे.प्रशासकीय कामात हलगर्जीपणा केल्यामुळे अथवा विविध प्रकारची अनियमितता करणाºया कर्मचाºयांना जि. प. प्रशासनाने निलंबित केले आहे. मागील काही वर्षांपासून निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाºयांची संख्या सुमारे ३५ ते ४० एवढी आहे. एकीकडे, नोकर भरती बंद आहे, तर दुसरीकडे नियमित सेवानिवृत्त होणाºया कर्मचाºयांची संख्याही मोठी आहे. परिणामी, जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागांत सध्या कर्मचाºयांच्या अनेक जागा रिक्त आहेत. त्यामुळे आहेत त्या कर्मचाºयांकडून प्रशासकीय कामकाज करून घेण्याची अधिकाºयांना मोठी कसरत करावी लागत आहे.या पार्श्वभूमीवर शासनाच्या सूचना आहेत की, प्रशासकीय कारणास्तव निलंबित कर्मचाºयांचे विनाविलंब दोषारोप सादर करावेत, त्यांची विभागीय चौकशी करून त्यात ते दोषी आढळल्यास वेतनवाढी कमी करून अथवा त्या रोखून निलंबित कर्मचाºयांची सेवा पुनर्स्थापित करावी. ज्यामुळे काम न करता निलंबित कर्मचाºयांना वेतन द्यावे लागणार नाही. प्रशासकीय कारणास्तव निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाºयांना नियमानुसार पहिले तीन महिने ५० टक्के व तीन महिन्यांनंतर ७५ टक्के वेतन दिले जाते.जिल्हा परिषदेत ५-६ वर्षांपासून काही निलंबित कर्मचारी घरी बसूनच ७५ टक्के वेतन उचलत असल्याच्या बाबी प्रशासनाच्या निदर्शनास आल्या असून, शासनाच्या सूचनेनुसार निलंबित कर्मचाºयांच्या सेवा पुनर्स्थापित करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये सदस्य म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतील व संबंधित निलंबित कर्मचाºयांचे विभागप्रमुख हे सचिव असणार आहेत. समितीमार्फत किती वर्षांपासून कर्मचारी निलंबित आहे. त्या कर्मचाºयाची विभागीय चौकशी केली आहे का. विभागीय चौकशी केली नसेल, तर का केली नाही, त्या कर्मचाºयावर दोषारोप ठेवले आहेत का, विभागीय चौकशी झाली असेल, तर मग अशा निलंबित कर्मचाºयांच्या सेवा पुनर्स्थापित करण्यास एवढा विलंब का लागला, असा सर्वांगीण आढावा घेऊन त्यांच्या सेवा पुनर्स्थापनेसंबंधी निर्णय घेतले जाणार आहेत.माहिती संकलित करणे सुरूयासंदर्भात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे यांनी सांगितले की, पोलीस गुन्ह्यातील निलंबित कर्मचाºयांच्या सेवा पुनर्स्थापित करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती आढावा घेते.प्रशासकीय कारणास्तव निलंबित कर्मचाºयांसंबंधी निर्णय घेण्यासाठी अशी समिती कार्यरत नव्हती. ती आता मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली आहे. लवकरच ही समिती आढावा घेऊन निलंबितांच्या सेवापुनर्स्थापनेबाबत निर्णय घेईल.

टॅग्स :zpजिल्हा परिषदAurangabadऔरंगाबादEmployeeकर्मचारी