शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
6
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
7
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
8
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
9
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
10
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
11
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
12
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
13
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
14
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
15
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
17
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
18
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
19
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
20
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी

‘उर्दू माध्यमा’च्या शाळांमध्ये ‘उर्दू’ येत नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्त्या; खंडपीठाची राज्य शासनास नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 19:55 IST

शिक्षकाला भाषेचे ज्ञान नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

छत्रपती संभाजीनगर : ‘उर्दू माध्यमा’च्या शाळांमध्ये ‘उर्दू’ अवगत नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्त्यांबाबत आक्षेप घेणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. याचिकेच्या अनुषंगाने न्या. एस. जी. मेहरे आणि न्या. शैलेष ब्रह्मे यांनी राज्य शासन, शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद, विभागीय आयुक्त जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक) या प्रतिवाद्यांना नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे. त्यांना ५ मार्चपर्यंत उत्तर दाखल करावयाचे आहे.

काय आहे याचिका?अमानुल्ला खान हारुन खान, रईस इद्रिस शेख व शाहिद खान पाशा खान यांनी ॲड. संभाजी मुंडे यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेनुसार जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील नेर, दानापूर आणि वालसावंगी या गावातील ‘उर्दू माध्यमा’च्या शाळांमध्ये ती भाषाच अवगत नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ‘त्या’ शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द करून उर्दूचे ज्ञान असलेल्या शिक्षकांच्या नियुक्त्या करण्याची विनंती करणारी निवेदने पालक आणि ग्रामस्थांनी शिक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना देऊनही कारवाई झाली नाही. म्हणून त्यांनी खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

आक्षेप काय?नियुक्त केलेल्या शिक्षकांना उर्दू भाषेत शिकविले जाणारे सर्व विषय शिकवावे लागतात. पाठ्यपुस्तके उर्दू भाषेत आहेत. शिक्षकाला भाषेचे ज्ञान नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. दानापूर येथील शाळेत इंग्रजी भाषा विषय असलेल्या शिक्षकाची नियुक्ती केली आहे.

कोण आहेत पात्र?उमेदवाराने दहावी आणि बारावीपर्यंतचे शिक्षण ज्या माध्यमातून घेतले असेल किंवा अध्यापन पदविका ज्या माध्यमातून उत्तीर्ण केली असेल, त्यापैकी एका माध्यमाच्या प्राथमिक शाळेत उमेदवार अध्यापन करण्यास पात्र असेल, असे २८ ऑगस्ट २००१च्या शासनच्या परिपत्रकात म्हटले आहे. तसेच दहावीच्या शालांत परीक्षेतील प्रथम भाषेसाठी असलेले माध्यम नियुक्तीसाठी विचारात घेतले जाणार नाही, असे दि. १८ सप्टेंबर २०२३ च्या परिपत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठEducationशिक्षण