शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
2
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
3
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा
4
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
5
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
6
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
7
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
8
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
9
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
10
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
11
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
12
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
13
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
14
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
15
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
16
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
17
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
18
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
19
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
20
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'

निवडणुकीदरम्यान काहीही होऊ शकते; गुप्तचर संस्थांच्या अहवालानंतर प्रशासन अलर्ट: कलेक्टर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 12:44 PM

कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होणार नाही, यासाठी अलर्ट राहण्याच्या सूचना आहेत.

छत्रपती संभाजीनगर : गुप्तचर संस्थांच्या अहवालानुसार होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत काहीही होऊ शकते. त्यामुळे पोलिसांसह सर्व प्रशासकीय यंत्रणेला अलर्ट रहावे लागणार आहे, असे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत नमूद केले. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता १६ मार्चपासून लागू झाली असून जिल्ह्यातील आदर्श आचारसंहिता कशी असेल, याची माहिती देताना जिल्हाधिकारी बोलत होते. 

यावेळी पोलिस आयुक्त मनोज लोहिया, पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके, प्रभोदय मुळे आदींची उपस्थिती होती. निरीक्षक आल्यानंतर वेबकास्ट व्होटिंग सेंटरचा निर्णय होणार आहे. याबाबत आयोगाने मार्गदर्शन केले आहे. जी संवेदनशील मतदान केंद्रे आहेत त्यावर सूक्ष्म निरीक्षण असतील, अशी काही केंद्रे आहेत. ज्या ठिकाणी येथून मागे काही झाले नाही, परंतु यावेळी काहीही होऊ शकते, असे अहवाल आमच्याकडे गुप्तचर संस्थांकडून आले आहेत.

अंडरकरंट पोलिस आणि जिल्हा प्रशासनापर्यंत येत नाही काय, या प्रश्नाचे उत्तर देताना जिल्हाधिकारी म्हणाले, कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होणार नाही, यासाठी अलर्ट राहण्याच्या सूचना आहेत. सोशल मीडियाबाबत सेल सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये सूक्ष्म निरीक्षण करण्यासाठी टीम असणार आहे. सोशल मीडियात कुणीही प्रक्षोभक, धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट केल्यास कडक कारवाई होईल.

अशी असेल आचारसंहिता.....प्रचार साहित्य छापून देणाऱ्यांना मुद्रक, प्रकाशक, बिल रकमेची माहिती देणे बंधनकारक.नवीन कुठलाही परवाना प्रशासकीय पातळीवरून मिळणार नाही.कुणाच्याही मालमत्तेवर एनओसीविना झेंडे, पोस्टर, स्टिकर लावता येणार नाही.फेक न्यूज व्हायरल करणाऱ्यांवर बारकाईने लक्ष असेल.जिल्ह्यात आणि शहरातील सीमांवर चेकपोस्ट असणार.

उमेदवार वाढल्यास काय करणार...ईव्हीएमद्वारे ३८४ उमेदवारांपर्यंत मतदान घेता येते. यापेक्षा जास्त उमेदवार असतील तर आयोगाने याबाबत सूचना दिल्या आहेत. उमेदवार जास्त आल्यास बॅलेट पेपर मतदान घेण्याची तयारी देखील प्रशासन ठेवून आहे. परंतु, तशी वेळ येणार नाही. ग्रामीण भागासह शहरी भागातून आढावा घेण्यात येत आहे.

शहर संवेदनशील आहे....पोलिस आयुक्त लोहिया म्हणाले, शहर संवदेनशील आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी एसआरपीच्या ३ व सीआरपीएफच्या दोन तुकड्या मिळाव्यात, अशी मागणी केली आहे. शहरात ६० पोस्ट असातील . ५४ इमारतीतील ६६ संवदेनशील बूथ आहेत. ४ डीसीपी, ८ एसीपी, १४७ एपीआय, सुमारे ३ हजार पोलिस कर्मचारी बंदेाबस्तात असतील. शहरातील १२०० हत्यार परवाने जमा केले आहेत. तर, ग्रामीण भागातील ५५० परवाने जमा केले आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद