शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

कोणताही पदवीधर घेऊ शकेल तत्त्वज्ञानामध्ये उच्चशिक्षण

By admin | Updated: July 28, 2014 01:05 IST

औरंगाबाद : पुढील शैक्षणिक वर्षापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात तत्त्वज्ञान हा स्वतंत्र पदव्युत्तर विभाग सुरू केला जाणार आहे;

औरंगाबाद : पुढील शैक्षणिक वर्षापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात तत्त्वज्ञान हा स्वतंत्र पदव्युत्तर विभाग सुरू केला जाणार आहे; पण महाविद्यालयीन स्तरावर हा अभ्यासक्रम कुठे शिकविला जातो, याबाबत विद्यापीठातील कोणताही अधिकारी ठोसपणे सांगू शकत नाही. त्यामुळे या विषयाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी विद्यापीठाला विद्यार्थी मिळतील का, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. पदवी अभ्यासक्रमामध्ये तत्त्वज्ञान विषय असला तरच तो या विषयाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पात्र असेल, हा गैरसमज दूर करावा. तत्त्वज्ञान विषयाला जागतिक पातळीवर फार महत्त्व आहे. कोणताही पदवीधर या विषयाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पात्र असेल. आंतरविद्या शाखेच्या माध्यमातून कोणत्याही शाखेचा पदवीधर या विषयात उच्चशिक्षण घेऊ शकतो, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. धनराज माने यांनी सांगितले. या विद्यापीठाला नॅकचा ‘अ’ दर्जा प्राप्त झाल्यापासून येथे विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील शिक्षण मिळावे, असा कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांचा आग्रह आहे. त्या अनुषंगानेच त्यांनी तत्कालीन कुलगुरूंनी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात असलेला नॅनो टेक्नॉलॉजी हा विषय जवळपास बंदच केला होता. तो विद्यमान कुलगुरूंनी केवळ सुरूच केला नाही, तर त्यासाठी स्वतंत्र विभाग निर्माण केला. या विभागांतर्गत आता विद्यापीठ परिसरातील भौतिक संपदेची माहिती अपडेट करून ती जतन केली जाणार आहे. याशिवाय तत्त्वज्ञान या विषयात पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रमाची विद्यापीठात सुविधा नव्हती. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत विद्यापीठ परिसरात आगामी शैक्षणिक वर्षापासून स्वतंत्रपणे तत्त्वज्ञान विभाग सुरू करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. त्यासाठी प्राध्यापक, कर्मचारी, इमारत व अन्य पायाभूत सुविधांसाठी विद्यापीठामार्फत शासनाकडे पाठपुरावा केला जाणार आहे. पायाभूत सुविधांसाठी पाठपुरावा करणारव्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत विद्यापीठ परिसरात आगामी शैक्षणिक वर्षापासून स्वतंत्रपणे तत्त्वज्ञान विभाग सुरू करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. त्यासाठी प्राध्यापक, कर्मचारी, इमारत व अन्य पायाभूत सुविधांसाठी विद्यापीठामार्फत शासनाकडे पाठपुरावा केला जाणार आहे.