शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

औरंगाबादेत २४ कोटींच्या निधीत आणखी एका रस्त्याचा घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 17:22 IST

महाराष्ट्र शासनाने तीन वर्षांपूर्वी शहरातील सहा रस्त्यांसाठी २४ कोटींचा निधी दिला होता. या निधीतील कोट्यवधींचा घोटाळा गाजत असतानाच पुन्हा एक नवीन घोटाळा समोर आला.

ठळक मुद्देतीन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २४ कोटींचा निधी दिला होता. या निधीतून पाच रस्त्यांची कामे करण्यात आली.या कामांमध्येही प्रचंड भ्रष्टाचार झाला. चौकशी समितीनेही या घोटाळ्यावर शिक्कामोर्तब केले.

औरंगाबाद : महाराष्ट्र शासनाने तीन वर्षांपूर्वी शहरातील सहा रस्त्यांसाठी २४ कोटींचा निधी दिला होता. या निधीतील कोट्यवधींचा घोटाळा गाजत असतानाच पुन्हा एक नवीन घोटाळा समोर आला. विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वाखालील समितीची  परवानगी न घेता मोंढा नाका ते बालाजीनगर या रस्त्याचे काम करण्यात आले. कंत्राटदाराला १ कोटींहून अधिक रक्कमही दिली. उर्वरित रकमेसाठी फाईल आल्यावर हा अडीच कोटींचा घोटाळा समोर आला आहे.

तीन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २४ कोटींचा निधी दिला होता. या निधीतून पाच रस्त्यांची कामे करण्यात आली. या कामांमध्येही प्रचंड भ्रष्टाचार झाला. चौकशी समितीनेही या घोटाळ्यावर शिक्कामोर्तब केले.  हे प्रकरण  न्यायप्रविष्ट आहे. २४ कोटींतील ६ कोटी रुपये शिल्लक होते. यातील दोन कोटी रुपयांचा निधी माजी महापौर बापू घडमोडे यांनी पळविला. त्यानंतर माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी अडीच कोटी रुपये घेतले. या निधीतून निविदा काढण्यात आली. कंत्राटदार डी.व्ही. मोहिते यांना काम देण्यात आले.  अर्धे काम झाल्यावर कंत्राटदाराने १ कोटीहून अधिक रक्कमही उचलली. आता काम अंतिम टप्प्यात पोहोचले असताना उर्वरित निधीसाठी फाईल दाखल केली, यावेळी अधिकाऱ्यांचे डोळे उघडले.  

एमजीएम लक्ष्मण चावडी रस्त्याचे काय

महापालिकेने १४ कोटी रुपये खर्च करून एमजीएम ते लक्ष्मण चावडी रस्त्याचे काम सुरू केले आहे. या कामात २४ कोटींतील उर्वरित ६ कोटी रुपये टाकण्यात येतील, असे मनपातर्फेच जाहीर करण्यात आले होते. ६ कोटीतील साडेचार कोटींचा तर चुराडा झाला. आता १४ कोटी रुपये कोठून देणार, हा महत्त्वाचा विषय आहे.

शासन आदेश धाब्यावरराज्य शासनाने २४ कोटींचा निधी देताना विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमली आहे. या समितीमध्ये जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त सदस्य आहेत. या समितीने निधीचा वापर कसा करावा याचा निर्णय घ्यावा, असे म्हटले आहे. निधीतील एक रुपयाचीही रक्कम वापरायची असल्यास विभागीय आयुक्तांसह समिती सदस्यांची परवानगी आवश्यक आहे. मोंढा नाका ते बालाजीनगर रस्त्याच्या कामासाठी समितीची परवानगीच घेतलेली नाही. माजी महापौर बापू घडमोडे यांनी आपल्या वॉर्डातील रस्त्याचे काम सुरू केले. या कामापूर्वी त्यांनी समितीची मंजुरी घेतली होती. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाhighwayमहामार्गChief Ministerमुख्यमंत्रीfundsनिधी