संतप्त विद्यार्थ्यांचा
By Admin | Updated: April 1, 2015 01:04 IST2015-04-01T00:14:52+5:302015-04-01T01:04:12+5:30
औरंगाबाद : मराठवाडा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या जवळपास २०० विद्यार्थ्यांनी मंगळवारी सायंकाळी परीक्षा भवनसमोर ठिय्या मांडला.

संतप्त विद्यार्थ्यांचा
औरंगाबाद : मराठवाडा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या जवळपास २०० विद्यार्थ्यांनी मंगळवारी सायंकाळी परीक्षा भवनसमोर ठिय्या मांडला. लेखी परीक्षा तोंडावर आली तरी तोंडी परीक्षा घेण्यात आलेल्या नाहीत. तोंडी परीक्षेसाठी उर्दूचे ज्ञान असणारा परीक्षक पाठवा, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आजचे हे आंदोलन
केले.
दरम्यान, उर्दूचे परिपूर्ण ज्ञान असणारा परीक्षक तोंडी परीक्षेसाठी उद्यापर्यंत महाविद्यालयात पाठविला जाईल, असे परीक्षा नियंत्रक डॉ. वाल्मीक सरवदे यांच्याकडून आश्वासन मिळाल्यानंतर मराठवाडा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक परतले. दरम्यान, परीक्षा विभागातील बैठकीस उपस्थित राहण्यासाठी कुलगुरू डॉ. चोपडे परीक्षा भवनमध्ये गेले असता प्रवेशद्वारातच विद्यार्थ्यांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तत्पूर्वीच तेथे बेगमपुरा ठाण्याचे पोलीस आले. त्यांनी विद्यार्थ्यांना निघून जा, अन्यथा अटक केली जाईल, अशी धमकी देताच विद्यार्थ्यांनी तेथून काढता पाय घेतला.
या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा ६ एप्रिलपासून सुरू होत आहे. तरीदेखील या विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षा अद्यापही घेण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थी तणावाखाली आहेत. २३ मार्चपासून तोंडी परीक्षा घेण्याचे वेळापत्रक विद्यापीठाने दिलेले होते; पण उर्दूचे ज्ञान नसणारे परीक्षा तोंडी परीक्षेसाठी गेल्यामुळे वाद उद्भवला.