शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

इतर कामे बाजूला ठेवून जायकवाडीत पंप हाऊसला परवानगी द्या; मुख्य न्यायमुर्तींचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 19:10 IST

पिण्याच्या पाण्याच्या ज्वलंत समस्येला शहरवासीय २० वर्षांपासून तोंड देताहेत

औरंगाबाद : इतर कामे बाजूला ठेवून औरंगाबाद शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी जायकवाडीत नवीन पंप हाऊस उभारण्याची परवानगी १९ ऑगस्टपूर्वी देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तीं दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती रवींद्र व्ही. घुगे यांनी शुक्रवारी (दि.८) केंद्र शासनाच्या अखत्यारीमधील ‘राष्ट्रीय वन्य जीव परिषदेच्या स्थायी समितीला दिले. तसेच या परिषदेला प्रतिवादी करण्याची मुभा खंडपीठाने दिली आहे.

परिषदेने कुठल्याही परिस्थितीत ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत परवानगी देऊन त्यानंतर एक आठवड्यात राज्य शासनाला निर्णय कळवावा. त्याचप्रमाणे निर्णयाची प्रत २६ ऑगस्ट रोजी खंडपीठात सादर करावी, असे आदेशात म्हटले आहे. खंडपीठाने विद्युत महामंडळ आणि बीएसएनएल यांना प्रतिवादी करण्याची मुभा दिली, तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने कामाची गती वाढवावी, असेही निर्देश खंडपीठाने दिले आहेत. जलवाहिन्या टाकण्याच्या कामात अडथळा निर्माण करणारे विद्युत खांब आणि बीएसएनएलचे टेलिफोनचे ऑप्टिक फायबर केबल स्थलांतरित (हटविण्याबाबत) करण्यासंदर्भात २२ जुलैरोजी या जनहित याचिकेवर सुनावणी होणार आहे. न्यायालयाचे मित्र सचिन देशमुख, मुख्य सरकारी वकील डी. आर. काळे, मनपाकडून ॲड. संभाजी टोपे, याचिकाकर्ते अमित मुखेडकर व केंद्राकडून असिस्टंट सॉलिसिटर जनरल अजय तल्हार काम पाहात आहेत.

औरंगाबादवासीयांना योग्य वागणूक द्याप्रशासनातर्फे औरंगाबादवासीयांना बेजबाबदारपणाची वागणूक दिली जाते, हे धक्कादायक आहे. ऐतिहासिक वेरुळ आणि अजिंठ्याच्या लेण्या व शिर्डी येथील साईबाबा मंदिरामुळे पर्यटकांचे आकर्षण स्थळ असलेल्या औरंगाबादमधील नागरिकांना केंद्र आणि राज्य शासनाने योग्य वागणूक द्यावी, अशी अपेक्षा खंडपीठाने व्यक्त केली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी