शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

इतर कामे बाजूला ठेवून जायकवाडीत पंप हाऊसला परवानगी द्या; मुख्य न्यायमुर्तींचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 19:10 IST

पिण्याच्या पाण्याच्या ज्वलंत समस्येला शहरवासीय २० वर्षांपासून तोंड देताहेत

औरंगाबाद : इतर कामे बाजूला ठेवून औरंगाबाद शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी जायकवाडीत नवीन पंप हाऊस उभारण्याची परवानगी १९ ऑगस्टपूर्वी देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तीं दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती रवींद्र व्ही. घुगे यांनी शुक्रवारी (दि.८) केंद्र शासनाच्या अखत्यारीमधील ‘राष्ट्रीय वन्य जीव परिषदेच्या स्थायी समितीला दिले. तसेच या परिषदेला प्रतिवादी करण्याची मुभा खंडपीठाने दिली आहे.

परिषदेने कुठल्याही परिस्थितीत ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत परवानगी देऊन त्यानंतर एक आठवड्यात राज्य शासनाला निर्णय कळवावा. त्याचप्रमाणे निर्णयाची प्रत २६ ऑगस्ट रोजी खंडपीठात सादर करावी, असे आदेशात म्हटले आहे. खंडपीठाने विद्युत महामंडळ आणि बीएसएनएल यांना प्रतिवादी करण्याची मुभा दिली, तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने कामाची गती वाढवावी, असेही निर्देश खंडपीठाने दिले आहेत. जलवाहिन्या टाकण्याच्या कामात अडथळा निर्माण करणारे विद्युत खांब आणि बीएसएनएलचे टेलिफोनचे ऑप्टिक फायबर केबल स्थलांतरित (हटविण्याबाबत) करण्यासंदर्भात २२ जुलैरोजी या जनहित याचिकेवर सुनावणी होणार आहे. न्यायालयाचे मित्र सचिन देशमुख, मुख्य सरकारी वकील डी. आर. काळे, मनपाकडून ॲड. संभाजी टोपे, याचिकाकर्ते अमित मुखेडकर व केंद्राकडून असिस्टंट सॉलिसिटर जनरल अजय तल्हार काम पाहात आहेत.

औरंगाबादवासीयांना योग्य वागणूक द्याप्रशासनातर्फे औरंगाबादवासीयांना बेजबाबदारपणाची वागणूक दिली जाते, हे धक्कादायक आहे. ऐतिहासिक वेरुळ आणि अजिंठ्याच्या लेण्या व शिर्डी येथील साईबाबा मंदिरामुळे पर्यटकांचे आकर्षण स्थळ असलेल्या औरंगाबादमधील नागरिकांना केंद्र आणि राज्य शासनाने योग्य वागणूक द्यावी, अशी अपेक्षा खंडपीठाने व्यक्त केली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी