शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

नानांच्या साऱ्या बैठका ठरल्या निष्फळ; बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी निधी देण्यास शासनाची असमर्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 14:08 IST

जलसंधारण मंत्रालयाकडून निधी मागण्यासाठी मंगळवारी मुंबईत विधानसभा अध्यक्षांच्या दालनात हरिभाऊ बागडे ऊर्फ नाना यांनी बैठक बोलावली होती.

ठळक मुद्दे कोल्हापुरी बंधाऱ्यांना केवळ गेट बसवून उपयोग नाही, तर जिल्ह्यातील २५३ बंधाऱ्यांची अगोदर दुरुस्ती करावी लागणार आहे. जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनी गेट खरेदी व कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेला निधी देण्यास स्पष्ट नकार

औरंगाबाद : कोल्हापुरी बंधाऱ्यांना केवळ गेट बसवून उपयोग नाही, तर जिल्ह्यातील २५३ बंधाऱ्यांची अगोदर दुरुस्ती करावी लागणार आहे. याचे सादरीकरण करून जलसंधारण मंत्रालयाकडून निधी मागण्यासाठी मंगळवारी मुंबईत विधानसभा अध्यक्षांच्या दालनात हरिभाऊ बागडे ऊर्फ नाना यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीत जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनी गेट खरेदी व कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेला निधी देण्यास स्पष्ट नकार दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. बागडे यांनी आजपर्यंत सलग तीन वेळा बैठका बोलावल्या. एकाही बैठकीत बंधाऱ्यांसाठी एक रुपयाचाही निधी मिळू शकला नाही, हे विशेष!

जिल्ह्यातील कोल्हापुरी बंधाऱ्यांसाठी गेट बसविणे व बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी जलसंधारण मंत्रालयाकडून निधी प्राप्त करून घेण्यासाठी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मंगळवारी त्यांच्या दालनात बैठक आयोजित केली होती. बैठकीस जलसंधारणमंत्री राम शिंदे, जलसंधारण विभागाचे सचिव, तसेच औरंगाबादहून गेलेले जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे, जि.प. सिंचन विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता राठोड, जिल्हा जलसंधारण विभागाचे अधीक्षक अभियंता आदी उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील कोल्हापुरी बंधाऱ्यांची सद्य:स्थिती सादर केली.

जिल्ह्यात एकूण ५८५ कोल्हापुरी बंधाऱ्यांपैकी १४२ बंधाऱ्यांच्या बाजू भराव, माती भराव अशा किरकोळ दुरुस्तीसाठी २ कोटी ८४ लाख ६६ हजार रुपयांच्या निधीची गरज असून, १११ बंधाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती करण्यासाठी ११ कोटी ७० लाख ८० हजार रुपये असे एकूण २५३ बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी १४ कोटी ५५ लाख ४६ हजार रुपयांची गरज असल्याची मागणी बैठकीत करण्यात आली. 

याशिवाय, जिल्ह्यात २२८ कोल्हापुरी बंधाऱ्यांना ७ हजार २८७ नवीन लोखंडी गेटची आवश्यकता आहे. यापैकी जि.प. उपकरातील पावणेदोन कोटी रुपयांच्या निधीतून यंदा १८०० गेट खरेदी करण्याचे नियोजन आहे. दरम्यान, ४ कोटी ९३ लाख ८३ हजार रुपयांचा निधी मिळाल्यास त्यातून जिल्हा परिषदेला ५ हजार ४८७ गेटची खरेदी करणे शक्य होईल. तेव्हा उपस्थित जलसंधारण मंत्री व सचिवांनी निधी देता येणार नसल्याचे स्पष्ट शब्दांत सांगितले. त्यामुळे अधिकाऱ्यांना आजच्या या बैठकीतून रिकाम्या हातीच औरंगाबादकडे परतावे लागले. यापूर्वीही बंधाऱ्यांची दुरुस्ती व गेटसाठी विधानसभा अध्यक्ष बागडे यांनी दोन वेळा मंत्रालयात बैठका घेतल्या होत्या. त्याही बैठकातून काहीच निष्पन्न झाले नव्हते. आजच्या बैठकीतूनही काहीच हाती लागले नाही. 

बैठकीत मिळाला फुकटचा सल्लामंत्रालयात विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्या दालनात मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत शासनाकडून निधी मिळण्याची अपेक्षा होती; पण बैठकीत उपस्थित जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतूनच कोल्हापुरी बंधाऱ्यांची जिल्हा परिषदेने दुरुस्ती करावी व गेटही खरेदी करावे, असा सल्ला दिला. दरम्यान, जिल्हा नियोजन समितीकडून बंधाऱ्यांच्या नवीन कामांसाठीच निधी दिला जातो. यंदा ३ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. एवढ्याशा निधीतून बंधाऱ्यांची नवीन कामे, दुरुस्तीची कामे व गेटची खरेदी कशी करावी, असा पेच अधिकाऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

टॅग्स :Aurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदWaterपाणीHaribhau Bagadeहरिभाऊ बागडेfundsनिधीRam Shindeराम शिंदेIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प