शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

दीडपट पावसामुळे शेती पाण्यात; तब्बल ४ लाख हेक्टरवर पिकांचा चिखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 13:25 IST

यंदा खरीप हंगामाचे जिल्ह्यातील क्षेत्र सहा लाख ७० हजार हेक्टरच्या आसपास आहे.  

ठळक मुद्दे १९२ कोटींच्या मदतीचा प्रस्ताव शासनाकडे१५५ टक्क्यांच्या आसपास पूर्ण जिल्ह्यात पाऊस झाला आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यातील सुमारे ४ लाख हेक्टरवरील पिकांचा चिखल झाला असून, शेतात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पीक नुकसानीच्या पंचनाम्याचा अहवाल शासनाकडे पाठविला असून, शेतकऱ्यांना सुमारे १९२ कोटी रुपयांची मदत लागेल, असे अहवालात नमूद केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

यंदा खरीप हंगामाचे जिल्ह्यातील क्षेत्र सहा लाख ७० हजार हेक्टरच्या आसपास आहे.  भात, ज्वारी, बाजरी, मका मिळून १ लाख ९९ हजार हेक्टर, तूर, मूग, उडीद हे कडधान्य मिळून ४८ हजार हेक्टर, भुईमूग, तीळ, कारळ, सूर्यफूल, सोयाबीन २ लाख हेक्टरवर, तर  ३ लाख ९९ हजार हेक्टरवर कापूस आणि ३ हजार ६५२ हेक्टवर ऊस होता. सुमारे ७० टक्के पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. ७ जून ते २३ ऑक्टोबरपर्यंत सरासरीच्या तुलनेने ५५ टक्के अधिक पाऊस  झाला. औरंगाबाद तालुका २०० टक्के पाऊस होण्याच्या उंबरठ्यावर आहे. गेल्या वर्षीच्या सरासरीइतकीच पावसाची नोंद यंदा झाली होती. औरंगाबाद तालुका १९४ टक्के, फुलंब्री १३० टक्के,  पैठण १८० टक्के, सिल्लोड १६० टक्के, सोयगाव १४२ टक्के, कन्नड १३५ टक्के, वैजापूर १८६ टक्के, गंगापूर १६७ टक्के, खुलताबादमध्ये १२२ टक्के पावसाची नोंद झाली आहे. 

दीडपट पावसामुळे नुकसान१५५ टक्क्यांच्या आसपास पूर्ण जिल्ह्यात पाऊस झाला आहे. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या तुलनेत आजवर ६६० मि.मी. पाऊस होणे अपेक्षित होते. आजवर १०५१ मि.मी. पाऊस झाला आहे. मागच्या वर्षी २२ ऑक्टोबरपर्यंत १०४५ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. पावसाचे हे प्रमाण पाहता जिल्ह्यातील खरीप हंगामातील कापूस आणि कडधान्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट होत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरी