शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

दीडपट पावसामुळे शेती पाण्यात; तब्बल ४ लाख हेक्टरवर पिकांचा चिखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 13:25 IST

यंदा खरीप हंगामाचे जिल्ह्यातील क्षेत्र सहा लाख ७० हजार हेक्टरच्या आसपास आहे.  

ठळक मुद्दे १९२ कोटींच्या मदतीचा प्रस्ताव शासनाकडे१५५ टक्क्यांच्या आसपास पूर्ण जिल्ह्यात पाऊस झाला आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यातील सुमारे ४ लाख हेक्टरवरील पिकांचा चिखल झाला असून, शेतात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पीक नुकसानीच्या पंचनाम्याचा अहवाल शासनाकडे पाठविला असून, शेतकऱ्यांना सुमारे १९२ कोटी रुपयांची मदत लागेल, असे अहवालात नमूद केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

यंदा खरीप हंगामाचे जिल्ह्यातील क्षेत्र सहा लाख ७० हजार हेक्टरच्या आसपास आहे.  भात, ज्वारी, बाजरी, मका मिळून १ लाख ९९ हजार हेक्टर, तूर, मूग, उडीद हे कडधान्य मिळून ४८ हजार हेक्टर, भुईमूग, तीळ, कारळ, सूर्यफूल, सोयाबीन २ लाख हेक्टरवर, तर  ३ लाख ९९ हजार हेक्टरवर कापूस आणि ३ हजार ६५२ हेक्टवर ऊस होता. सुमारे ७० टक्के पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. ७ जून ते २३ ऑक्टोबरपर्यंत सरासरीच्या तुलनेने ५५ टक्के अधिक पाऊस  झाला. औरंगाबाद तालुका २०० टक्के पाऊस होण्याच्या उंबरठ्यावर आहे. गेल्या वर्षीच्या सरासरीइतकीच पावसाची नोंद यंदा झाली होती. औरंगाबाद तालुका १९४ टक्के, फुलंब्री १३० टक्के,  पैठण १८० टक्के, सिल्लोड १६० टक्के, सोयगाव १४२ टक्के, कन्नड १३५ टक्के, वैजापूर १८६ टक्के, गंगापूर १६७ टक्के, खुलताबादमध्ये १२२ टक्के पावसाची नोंद झाली आहे. 

दीडपट पावसामुळे नुकसान१५५ टक्क्यांच्या आसपास पूर्ण जिल्ह्यात पाऊस झाला आहे. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या तुलनेत आजवर ६६० मि.मी. पाऊस होणे अपेक्षित होते. आजवर १०५१ मि.मी. पाऊस झाला आहे. मागच्या वर्षी २२ ऑक्टोबरपर्यंत १०४५ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. पावसाचे हे प्रमाण पाहता जिल्ह्यातील खरीप हंगामातील कापूस आणि कडधान्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट होत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरी