शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
3
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
4
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
5
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
6
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
7
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
8
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
9
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
10
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
11
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले
12
यूएई सामन्याआधी केलेलं नाटक पाकिस्तानच्या अंगलट, आयसीसीनं पाठवला ईमेल!
13
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
14
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
15
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
16
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
18
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
19
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
20
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!

एकरात नव्हे गुंठ्यात राहिली शेतजमीन; कामाच्या शोधात शेतकरी शहरात!

By विकास राऊत | Updated: October 11, 2023 12:26 IST

भूमिहीन होताहेत शेतकरी : रोजगारासाठी स्थलांतर होण्याचे प्रमाणही वाढले

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडील शेतजमीन कमी होत चालली आहे. भूसंपादन, कौटुंबिक वादातून होणाऱ्या वाटण्या, विविध कारणांमुळे शेतीची होणारी विक्री. या व इतर अनेक कारणासंह नापिकी, कर्जबाजारीपणामुळे शेती एकरातून गुंठ्यांवर आली. वाढलेल्या कुटुंबांचे त्यात भागत नाही. त्यामुळे कामाच्या शोधात शेतकरी शहरात येण्याचे प्रमाणही वाढले आहे. रोहयो कामांवर देखील शेतकरी जास्त आहेत.

तज्ज्ञांच्या मते शेतीक्षेत्र का घटतेय?वाटण्या वाढल्या : घराघरात वाटण्या झाल्यामुळे शेतजमिनीचे क्षेत्र कमी होत आहे. जास्तीची जमीन असलेल्या शेतकऱ्यांचा आकडा आता कमी आहे. शेतकरी भूमिहीनदेखील होत आहेत.

विविध प्रकल्पांसाठी भूसंपादन : महामार्ग, जलप्रकल्प, उद्योग, अंतर्गत रस्त्यांसाठी भूसंपादनामुळे जमिनी कमी होत चालल्या आहेत. जिल्ह्यात अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात भूसंपादन झाले.

शेतविक्री वाढली : तुकडाबंदीमुळे दोन वर्षांपासून १ एकरच्या पुढेच जमिनीची विक्री वेगवेगळ्या कारणांसाठी होत आहे. कुटुंबे वाढल्यामुळे शेती विकून जबाबदारी पूर्ण करण्याचे प्रमाण वाढले आहे.

भूसंपादन वाढले...सोलापूर-धुळे महामार्गासाठी भूसंपादन : १ हजार हेक्टरसमृद्धी महामार्गासाठी भूसंपादन : १२०० हेक्टरडीएमआयसीसाठी भूसंपादन : ४ हजार हेक्टर

जिल्ह्यात शेतकऱ्यांकडे किती आहे जमीन....?शेतजमीन (हेक्टरमध्ये)... भूधारक .... एकूण क्षेत्रातील वाटा (टक्के)० ते २....१,५२०३४.५७ ...२,९३,७१६.........२१ टक्के२ ते ५....२३८२१४.७८...१,८५,३७३.......३२ टक्के५ ते १०...३५७१७६.१९...१०६६७६......४७ टक्के

शेतीचे क्षेत्र कमी होणे घातकशेतकरी, शेतमजूर शेतीवर अवलंबून आहे. शेतीचे क्षेत्र कमी होणे हे घातक आहे. भूमिहीन होणाऱ्यांची संख्या वाढते आहे. रोहयोवर शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. नागरीकरण वाढणे, सिंचन, उद्योग, रस्ते प्रकल्पांसाठी जमिनी घेण्यामुळे शेतीवर अवलंबून असणाऱ्यांचे हाल होऊ लागले आहेत. त्यातच वाटण्यांमुळे शेतीचे क्षेत्र कमी होत आहे. यावर वेळीच उपाय आवश्यक आहेत.-प्रा. राम बाहेती, कार्याध्यक्ष शेतमजूर युनियन

शेतकरी शेतीतून बाहेर पडत आहेत...शासनाचे फुकट वाटप हे धोरण चुकीचे आहे. हे धोरण शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे. शेतकरी शहरात येण्याचे प्रमाण वाढले आहे. उद्योगांसाठी जमिनी घेतल्या. ज्यांच्या जमिनी गेल्या, ते आता बेरोजगार आहेत. भूसंपादनाचे आलेले पैसेही संपले आहेत. भूमिहीन शेतकरी पर्यायाने शहराकडेच येणार हे स्पष्ट आहे. भांडवलदारांकडे जमिनी गेल्या आहेत.-जयाजी सूर्यवंशी, अध्यक्ष अन्नदाता शेतकरी संघटना

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रAurangabadऔरंगाबाद