शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

एकरात नव्हे गुंठ्यात राहिली शेतजमीन; कामाच्या शोधात शेतकरी शहरात!

By विकास राऊत | Updated: October 11, 2023 12:26 IST

भूमिहीन होताहेत शेतकरी : रोजगारासाठी स्थलांतर होण्याचे प्रमाणही वाढले

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडील शेतजमीन कमी होत चालली आहे. भूसंपादन, कौटुंबिक वादातून होणाऱ्या वाटण्या, विविध कारणांमुळे शेतीची होणारी विक्री. या व इतर अनेक कारणासंह नापिकी, कर्जबाजारीपणामुळे शेती एकरातून गुंठ्यांवर आली. वाढलेल्या कुटुंबांचे त्यात भागत नाही. त्यामुळे कामाच्या शोधात शेतकरी शहरात येण्याचे प्रमाणही वाढले आहे. रोहयो कामांवर देखील शेतकरी जास्त आहेत.

तज्ज्ञांच्या मते शेतीक्षेत्र का घटतेय?वाटण्या वाढल्या : घराघरात वाटण्या झाल्यामुळे शेतजमिनीचे क्षेत्र कमी होत आहे. जास्तीची जमीन असलेल्या शेतकऱ्यांचा आकडा आता कमी आहे. शेतकरी भूमिहीनदेखील होत आहेत.

विविध प्रकल्पांसाठी भूसंपादन : महामार्ग, जलप्रकल्प, उद्योग, अंतर्गत रस्त्यांसाठी भूसंपादनामुळे जमिनी कमी होत चालल्या आहेत. जिल्ह्यात अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात भूसंपादन झाले.

शेतविक्री वाढली : तुकडाबंदीमुळे दोन वर्षांपासून १ एकरच्या पुढेच जमिनीची विक्री वेगवेगळ्या कारणांसाठी होत आहे. कुटुंबे वाढल्यामुळे शेती विकून जबाबदारी पूर्ण करण्याचे प्रमाण वाढले आहे.

भूसंपादन वाढले...सोलापूर-धुळे महामार्गासाठी भूसंपादन : १ हजार हेक्टरसमृद्धी महामार्गासाठी भूसंपादन : १२०० हेक्टरडीएमआयसीसाठी भूसंपादन : ४ हजार हेक्टर

जिल्ह्यात शेतकऱ्यांकडे किती आहे जमीन....?शेतजमीन (हेक्टरमध्ये)... भूधारक .... एकूण क्षेत्रातील वाटा (टक्के)० ते २....१,५२०३४.५७ ...२,९३,७१६.........२१ टक्के२ ते ५....२३८२१४.७८...१,८५,३७३.......३२ टक्के५ ते १०...३५७१७६.१९...१०६६७६......४७ टक्के

शेतीचे क्षेत्र कमी होणे घातकशेतकरी, शेतमजूर शेतीवर अवलंबून आहे. शेतीचे क्षेत्र कमी होणे हे घातक आहे. भूमिहीन होणाऱ्यांची संख्या वाढते आहे. रोहयोवर शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. नागरीकरण वाढणे, सिंचन, उद्योग, रस्ते प्रकल्पांसाठी जमिनी घेण्यामुळे शेतीवर अवलंबून असणाऱ्यांचे हाल होऊ लागले आहेत. त्यातच वाटण्यांमुळे शेतीचे क्षेत्र कमी होत आहे. यावर वेळीच उपाय आवश्यक आहेत.-प्रा. राम बाहेती, कार्याध्यक्ष शेतमजूर युनियन

शेतकरी शेतीतून बाहेर पडत आहेत...शासनाचे फुकट वाटप हे धोरण चुकीचे आहे. हे धोरण शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे. शेतकरी शहरात येण्याचे प्रमाण वाढले आहे. उद्योगांसाठी जमिनी घेतल्या. ज्यांच्या जमिनी गेल्या, ते आता बेरोजगार आहेत. भूसंपादनाचे आलेले पैसेही संपले आहेत. भूमिहीन शेतकरी पर्यायाने शहराकडेच येणार हे स्पष्ट आहे. भांडवलदारांकडे जमिनी गेल्या आहेत.-जयाजी सूर्यवंशी, अध्यक्ष अन्नदाता शेतकरी संघटना

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रAurangabadऔरंगाबाद