शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

एकरात नव्हे गुंठ्यात राहिली शेतजमीन; कामाच्या शोधात शेतकरी शहरात!

By विकास राऊत | Updated: October 11, 2023 12:26 IST

भूमिहीन होताहेत शेतकरी : रोजगारासाठी स्थलांतर होण्याचे प्रमाणही वाढले

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडील शेतजमीन कमी होत चालली आहे. भूसंपादन, कौटुंबिक वादातून होणाऱ्या वाटण्या, विविध कारणांमुळे शेतीची होणारी विक्री. या व इतर अनेक कारणासंह नापिकी, कर्जबाजारीपणामुळे शेती एकरातून गुंठ्यांवर आली. वाढलेल्या कुटुंबांचे त्यात भागत नाही. त्यामुळे कामाच्या शोधात शेतकरी शहरात येण्याचे प्रमाणही वाढले आहे. रोहयो कामांवर देखील शेतकरी जास्त आहेत.

तज्ज्ञांच्या मते शेतीक्षेत्र का घटतेय?वाटण्या वाढल्या : घराघरात वाटण्या झाल्यामुळे शेतजमिनीचे क्षेत्र कमी होत आहे. जास्तीची जमीन असलेल्या शेतकऱ्यांचा आकडा आता कमी आहे. शेतकरी भूमिहीनदेखील होत आहेत.

विविध प्रकल्पांसाठी भूसंपादन : महामार्ग, जलप्रकल्प, उद्योग, अंतर्गत रस्त्यांसाठी भूसंपादनामुळे जमिनी कमी होत चालल्या आहेत. जिल्ह्यात अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात भूसंपादन झाले.

शेतविक्री वाढली : तुकडाबंदीमुळे दोन वर्षांपासून १ एकरच्या पुढेच जमिनीची विक्री वेगवेगळ्या कारणांसाठी होत आहे. कुटुंबे वाढल्यामुळे शेती विकून जबाबदारी पूर्ण करण्याचे प्रमाण वाढले आहे.

भूसंपादन वाढले...सोलापूर-धुळे महामार्गासाठी भूसंपादन : १ हजार हेक्टरसमृद्धी महामार्गासाठी भूसंपादन : १२०० हेक्टरडीएमआयसीसाठी भूसंपादन : ४ हजार हेक्टर

जिल्ह्यात शेतकऱ्यांकडे किती आहे जमीन....?शेतजमीन (हेक्टरमध्ये)... भूधारक .... एकूण क्षेत्रातील वाटा (टक्के)० ते २....१,५२०३४.५७ ...२,९३,७१६.........२१ टक्के२ ते ५....२३८२१४.७८...१,८५,३७३.......३२ टक्के५ ते १०...३५७१७६.१९...१०६६७६......४७ टक्के

शेतीचे क्षेत्र कमी होणे घातकशेतकरी, शेतमजूर शेतीवर अवलंबून आहे. शेतीचे क्षेत्र कमी होणे हे घातक आहे. भूमिहीन होणाऱ्यांची संख्या वाढते आहे. रोहयोवर शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. नागरीकरण वाढणे, सिंचन, उद्योग, रस्ते प्रकल्पांसाठी जमिनी घेण्यामुळे शेतीवर अवलंबून असणाऱ्यांचे हाल होऊ लागले आहेत. त्यातच वाटण्यांमुळे शेतीचे क्षेत्र कमी होत आहे. यावर वेळीच उपाय आवश्यक आहेत.-प्रा. राम बाहेती, कार्याध्यक्ष शेतमजूर युनियन

शेतकरी शेतीतून बाहेर पडत आहेत...शासनाचे फुकट वाटप हे धोरण चुकीचे आहे. हे धोरण शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे. शेतकरी शहरात येण्याचे प्रमाण वाढले आहे. उद्योगांसाठी जमिनी घेतल्या. ज्यांच्या जमिनी गेल्या, ते आता बेरोजगार आहेत. भूसंपादनाचे आलेले पैसेही संपले आहेत. भूमिहीन शेतकरी पर्यायाने शहराकडेच येणार हे स्पष्ट आहे. भांडवलदारांकडे जमिनी गेल्या आहेत.-जयाजी सूर्यवंशी, अध्यक्ष अन्नदाता शेतकरी संघटना

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रAurangabadऔरंगाबाद