शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

बाद मतांमुळे झाला दिग्गजांचा पराभव

By admin | Updated: September 20, 2014 23:40 IST

अभिमन्यू कांबळे, परभणी जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघात आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत बाद मतांमुळे सात दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला

अभिमन्यू कांबळे, परभणीजिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघात आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत बाद मतांमुळे सात दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला असून, चारही मतदार संघात प्रत्येकी दोन निवडणुकींचा यामध्ये समावेश आहे़ परभणी विधानसभेच्या १९६७ मध्ये झालेल्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार ए़ आऱ गव्हाणे यांनी काँग्रेसचे उमेदवार एम. एस. राव यांचा १ हजार ३०५ मतांनी पराभव केला होता़ या निवडणुकीत तब्बल २ हजार ५७९ मते बाद झाली होती़ १९७८ मध्ये काँग्रेसच्या रावसाहेब जामकर यांनी शेकापचे अण्णासाहेब गव्हाणे यांचा २ हजार ८४ मतांनी पराभव केला होता़ या निवडणुकीत २ हजार १४९ मते बाद झाली होती़ पाथरी विधानसभा मतदारसंघात १९६२ मध्ये झालेल्या निवडणुकीत शेकापचे उमेदवार बबन सोपानराव यांनी काँग्रेसचे उमेदवार सखाराम गोपाळराव यांचा केवळ १४२ मतांनी पराभव केला होता़ या निवडणुकीत १ हजार ९४३ मते बाद झाली होती़ १९७८ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या सखाराम नखाते यांनी यु काँग्रेसचे बाबासाहेब डख यांचा १ हजार ६१० मतांनी पराभव केला होता़ या निवडणुकीत २ हजार ५१४ मते बाद झाली होती़ गंगाखेड विधानसभा मतदार संघात १९९५ मध्ये झालेल्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार सीताराम घनदाट यांनी भाजपाचे ज्ञानोबा हरी गायकवाड यांचा ४७६ मतांनी पराभव केला़ या निवडणुकीत २ हजार ६४३ मते बाद झाली होती़ १९९९ मध्येही घनदाट यांनीच गायकवाड यांचाच ६ हजार ७९६ मतांनी पराभव केला होता़ या निवडणुकीत तब्बल १३ हजार ९७१ मते बाद झाली होती़ जिंतूर विधानसभा मतदार संघाच्या १९७८ मध्ये झालेल्या निवडणुकीत शेकापचे गुलाबचंद राठी यांनी काँग्रेसचे माणिकराव भांबळे यांचा ६२६ मतांनी पराभव केला होता़ या निवडणुकीत १ हजार ९७१ मते बाद झाली होती़ १९९९ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे कुंडलिकराव नागरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे रामप्रसाद बोर्डीकर यांचा ३ हजार २८१ मतांनी पराभव केला होता़ या निवडणुकीत तब्बल ७ हजार ९४२ मते बाद झाली होती़ज्ञानोबा गायकवाड यांचा विक्रम हुकलाविधानसभा निवडणुकीतील बाद मतांमुळे या सात दिग्गजांना पराभव पहावा लागला़ विशेष म्हणजे गंगाखेड विधानसभा मतदार संघातून तब्बल चार वेळा निवडून आलेल्या ज्ञानोबा गायकवाड यांचा दोन वेळा बाद मतांमुळे पराभव झाला़ अन्यथा त्यांच्या नावावर जिल्ह्यात वेगळाच विक्रम नोंदवला गेला असता़ कारण जिल्ह्यात आतापर्यंत सहा वेळा निवडून येणारा एकही विधानसभा सदस्य नाही़ १७६ मते हरवलीपरभणी जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत एक वेगळाच विक्रम नोंदविला गेला़ परभणी विधानसभा मतदार संघात १९९५ मध्ये झालेल्या निवडणुकीत १७६ मते गहाळ झाली़ तशी नोंद निवडणूक आयोगाकडे आहे़ ही मते कोठे गायब झाली, याचा पत्ताच निवडणूक आयोगाला लागला नाही़ परंतु, या बाद मतांचा निवडणुकीच्या निकालावर परिणाम झाला नाही़ कारण या निवडणुकीत शिवसेनेचे तुकाराम रेंगे यांनी काँग्रेसचे उमेदवार शमीम अ. खान यांचा तब्बल १९ हजार ३५४ मतांनी पराभव केला होता़ २००४ पूर्वी मतपत्रिकेवर शिक्का मारून मतदान करण्याची पद्धत होती़ त्यामुळे काही मतदार एकपेक्षा अधिक उमेदवारांच्या चिन्हासमोर शिक्का मारत असत़ त्यामुळे त्यांची मते बाद ठरविली जात होती; परंतु, २००४ मध्ये निवडणूक आयोगाने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे मतदानास सुरुवात केली़ त्यामुळे शिक्का मारून बाद होणारी मतांची प्रक्रियाच हद्दपार झाली़