शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

‘अ‍ॅडमिशन फुल’; महापालिकेच्या 'या' शाळेत प्रवेश घेण्यासाठी लागतात चक्क रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 18:54 IST

सर्वसाधारणपणे खाजगी इंग्रजी शाळांच्या बाबतीत दिसणारे चित्र १९७० ची स्थापना असलेल्या औरंगाबाद महानगरपालिकेच्या नारेगाव येथील शाळेत दिसते

ठळक मुद्दे शाळेतील मुलांची एकूण संख्या २५२५ असून, यापैकी १३२६ मुले आणि ११९९ मुली आहेत.शाळेतील बहुतांश मुले कष्टकरी वर्गातील आहेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वावविज्ञान प्रदर्शन दरवर्षी 

- रुचिका पालोदकर

औरंगाबाद : शाळेत प्रवेश मिळावा म्हणून पालकांच्या लागलेल्या रांगा आणि काही दिवसांतच ‘अ‍ॅडमिशन फुल’, ‘प्रवेश बंद’ अशा शाळेच्या प्रवेशद्वारावर झळकणाऱ्या पाट्या, हे सर्वसाधारणपणे खाजगी इंग्रजी शाळांच्या बाबतीत दिसणारे चित्र १९७० ची स्थापना असलेल्या औरंगाबाद महानगरपालिकेच्या नारेगाव येथील शाळेत दिसू लागते, तेव्हा साहजिकच पाहणाऱ्यांचे डोळे विस्फारतात. एकीकडे मनपाच्या इतर शाळा ओस पडत असताना या शाळेत दिसणारे चित्र मात्र साहजिकच सुखावणारे ठरते. 

नारेगावच्या महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात इयत्ता १ ली ते १० वी असे वर्ग चालतात. शाळेतील मुलांची एकूण संख्या २५२५ असून, यापैकी १३२६ मुले आणि ११९९ मुली आहेत. शाळेतील बहुतांश मुले कष्टकरी वर्गातील आहेत. ही मुले इतर मुलांच्या स्पर्धेत कुठेही कमी पडू नयेत, यासाठी शिक्षकांकडून कसोशीने प्रयत्न केले जातात. यामुळेच सातत्याने दहावी बोर्डात शाळेच्या विद्यार्थ्यांचा निकाल उत्तम लागत असून, यामुळे दरवर्षी शाळेच्या विद्यार्थिसंख्येतही वाढ होते.

मुख्याध्यापक अंकुश लाडके म्हणाले की, शाळेत बहुसंख्य मुले अशी आहेत, जी बाहेर शिकवणी लावू शकत नाहीत. त्यामुळे शिक्षकांनाच विद्यार्थ्यांकडे जास्त लक्ष द्यावे लागते. यासाठी आम्ही एक विशिष्ट पद्धत बनवली असून, याअंतर्गत एका शिक्षकाकडे १२ विद्यार्थी याप्रमाणे दहावीच्या मुलांची विभागणी केली आहे. हे शिक्षक आपल्या गटातील विद्यार्थ्यांचा अभ्यास, दर आठवड्याला त्यांची होणारी प्रगती याचा बरोबर आढावा घेतात. काही पालक मुलांना शाळेत नियमितपणे पाठवीत नाहीत. अशा पालकांना शाळेत बोलावून शिक्षक त्यांना समजावून सांगतात आणि शिक्षणाचे महत्त्व पटवून देतात. 

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वावनारेगाव शाळेतील मुले केवळ अभ्यासातच हुशार आहेत, असे नाही, तर या शाळेत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल, याकडे लक्ष दिले जाते. शहरात किंवा शहराबाहेर होणाऱ्या प्रत्येक स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थ्यांना आवर्जून पाठविले जाते. त्यामुळे वक्तृत्व असो किंवा नृत्य, चित्रकला विद्यार्थ्यांना प्रत्येक स्पर्धेच्या दृष्टीने तयारी करावी लागते. याशिवाय शाळेत संगणक खोली आणि अत्याधुनिक विज्ञान प्रयोगशाळा असून, प्रत्येकाला विद्यार्थ्याला संगणक शिकविले जाते.

विज्ञान प्रदर्शन दरवर्षी नारेगाव माध्यमिक विद्यालयाचा असा नियम आहे, की शाळेचा दैनंदिन परिपाठ झाल्यावर एका वर्गाने एक विज्ञान प्रयोग सादर करायचा. यामुळे वर्षभर मुले या उपक्रमांतर्गत आपल्याला काय नवीन देता येईल याचा विचार करतात. त्यानंतर या प्रयोगांपैकी काही उत्तम प्रयोगांची निवड केली जाते आणि डिसेंबर-जानेवारी या काळात दरवर्षी एक विज्ञान प्रदर्शन आयोजित केले जाते. या प्रदर्शनात विद्यार्थी विज्ञान प्रयोग सादर करतात. यासाठी बाहेरच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनाही प्रयोग पाहण्यासाठी आमंत्रित केले जाते.

शाळेची इमारत आम्हाला पुरत नाही दोन वर्षांपासून आम्ही नववी आणि दहावीचे बाहेरून होणारे प्रवेश पूर्णपणे बंद केले आहेत. कारण आमचेच विद्यार्थी खूप आहेत. शाळेची इमारत अतिशय मोठी असूनही ती आम्हाला पुरत नाही. त्यामुळे आम्ही गावातील दुसरी जागादेखील घेतली असून, त्याठिकाणीही वर्ग भरवतो. शिक्षकांची मेहनत आणि विद्यार्थ्यांची साथ यामुळे शाळेचा निकाल दरवर्षी उत्तम लागतो. यावर्षीही दहावीत आमचा विद्यार्थी ९५ टक्के नक्की घेणार, असा आम्हाला विश्वास आहे. - अंकुश लाडके, मुख्याध्यापक 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाStudentविद्यार्थीSchoolशाळाTeacherशिक्षक