शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

लाचेच्या आरोपातून उत्पादन शुल्क विभागाच्या २ अधिकाऱ्यांची निर्दोष सुटका; काय आहे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 12:56 IST

मागणी केल्याचे व लाच घेतल्याचे सिद्ध झाले नसल्याने खंडपीठाने केली सुटका

छत्रपती संभाजीनगर : राज्य उत्पादन शुल्क विभागाचे तत्कालीन उपनिरीक्षक कैलाश गोविंदराव कांबळे आणि दशरथ संभाजी शिंदे यांचे अपील मंजूर करून दोघांचीही लाचेच्या आरोपातून सुटका करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. अभय वाघवसे यांनी दिला आहे.

भूम येथील दारूचे दुकान बंद करण्यासाठी ग्रामसभेच्या प्रस्तावाच्या अनुषंगाने दुकानदाराच्या बाजूने जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल पाठविण्यासाठी लाच घेतल्याचा दोघांवर आरोप होता. उस्मानाबाद येथील विशेष न्यायालयाने दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये शिक्षा सुनावली होती. त्यांनी शिक्षेच्या आदेशाला खंडपीठात आव्हान दिले होते.

आरोपीने जिल्हाधिकाऱ्यांना अनुकूल अहवाल देण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती २५ रुपये देण्याचे ठरले. त्यापैकी १५ हजार रुपये घेतल्यानंतर कांबळेच्या सांगण्यावरून उर्वरित १० हजार रुपये घेताना शिंदेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती, असे दुकानदार राजेंद्र याची तक्रार होती. तर यापूर्वी तक्रारदारास अनेकदा दंड आकारण्यात आला होता. घटनेच्या दिवशी सुद्धा त्याला दंडाच्या रकमेची मागणी केली होती, लाचेची मागणी केली नव्हती, असा आरोपीचा बचाव होता.

सुनावणीअंती लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा सिद्ध होण्यासाठी आवश्यक असलेल्या लाचेची मागणी केल्याचे व लाच घेतल्याचे स्पष्ट करणाऱ्या तांत्रिक बाबी सिद्ध न झाल्यामुळे खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला. अपिलार्थीतर्फे ॲड. एन. एल. चौधरी यांनी काम पाहिले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठCrime Newsगुन्हेगारी