शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

छत्रपती संभाजीनगराजवळील ३५ गावांना येणार ‘अच्छे दिन’; मनपा देणार मूलभूत सोयीसुविधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 16:24 IST

शहराला ज्या दिवशी अतिरिक्त पाणी होईल, त्या दिवशी आम्ही मनपा हद्दीला लागून असलेल्या गावांना पाणी देणार आहोत. हा शासनाचाच निर्णय आहे.

छत्रपती संभाजीनगर : मनपा हद्दीच्या बाहेरील गावांमध्ये झपाट्याने लोकसंख्या वाढत आहे. शहराजवळील ३५ गावांमध्ये पिण्याचे शुद्ध पाणी, कचऱ्यावर प्रक्रिया, ड्रेनेजच्या पाण्यावर प्रक्रिया होत नाही. आता महापालिका प्रशासन या गावांना मूलभूत सोयीसुविधा देण्यासाठी सामंजस्य करार करणार आहे. त्यामुळे या गावांना लवकरच ‘अच्छे दिन’ येणार आहेत.

मनपा प्रशासक जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या संकल्पनेतून शहराजवळील ३५ गावांमध्ये घनकचरा, पाणीपुरवठा आणि मलजल निस्सारण प्रक्रिया योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी मंगळवारी सकाळी स्मार्ट सिटी कार्यालयात सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवकांची बैठक घेण्यात आली. झालर पट्ट्यातील २६ आणि यात समावेश नसलेल्या ९, अशा एकूण ३५ गावांची निवड करण्यात आली. या गावांमध्ये ग्रामपंचायतींमार्फत पाहिजे तसा विकास झाला नाही. त्यामुळे मनपाने आता विकासाच्या कक्षा रुंदावत या गावांना मूलभूत सोयीसुविधा देण्याचा निर्णय घेतला. बैठकीस मनपाचे अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, संतोष वाहुळे, उपायुक्त रवींद्र जोगदंड, जि. प. जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले, कार्यकारी अभियंता अजित वाघमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, विस्तार अधिकारी, तज्ज्ञ सल्लागार आदींची उपस्थिती होती.

कचरा मनपाला आणून द्या३५ ग्रामपंचायतींनी गावातील ओला व सुका कचरा वर्गीकरण करून महापालिकेच्या चिकलठाणा, पडेगाव, हर्सूल येथील कचरा प्रक्रिया केंद्रावर आणून दिल्यास त्यावर प्रक्रिया केली जाईल, असे प्रशासक जी. श्रीकांत यांनी सांगितले. तर जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना म्हणाले की, गावात कचऱ्याचे नियंत्रण करणे अत्यंत सोपे आहे. मुख्य रस्त्यावरील दुकाने, हॉटेल, गृहनिर्माण सोसायटी व परिसरातील रहिवाशांनी आपला कचरा वर्गीकरण करून देण्याची सवय लावावी. नागरिक कचरा वर्गीकरण करून देत नसतील तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, अशी सूचना प्रशासकांनी केली. मांडकीच्या सरपंचाने नारेगाव येथील कचरा डेपो हटविण्याची मागणी केली. यावर मनपा प्रशासकांनी लवकरच संपूर्ण कचरा नष्ट होईल, असे सांगितले.

प्रत्येक गावात ड्रेनेजच्या पाण्यावर प्रक्रिया३५ गावांमध्ये मलजल निस्सारण प्रक्रिया प्रकल्प राबविण्यात येत असले तरी ड्रेनेजच्या पाण्यावर प्रक्रिया होत नाही. महापालिका छोटे ट्रिटमेंट प्लान्ट उभारण्यासाठी तांत्रिक सहकार्य करेल. ट्रिटमेंट केलेले पाणी शेतीसाठी वापरता येणार असल्याचे प्रशासकांनी सांगितले.

विहिरींचे पाणी दूषित

चिकलठाणा येथील मनपाच्या सिवरेज ट्रिटमेंट प्लांटमधून वाहणाऱ्या अतिरिक्त पाण्यामुळे झाल्टा, हिरापूर येथील विहिरींचे पाणी दूषित झाल्याची तक्रार सरपंचांनी केली. त्यावर प्रशासकांनी लक्ष घालतो असे सांगितले. स्मार्ट सिटीने उभारलेल्या ७०० सीसीटीव्ही कॅमेरे प्रकल्पाच्या कंट्रोल रूमची सरपंचांनी पाहणी केली.

शुद्ध पिण्याचे पाणी देणारकेंद्र शासन ‘हर घर जलमिशन’ अभियान राबवत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यामार्फत ३५ गावांत जलकुंभ उभारण्याचे सुरू आहे. शहरासाठी राबविण्यात येत असलेल्या ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीद्वारे भविष्यात पाणीपुरवठा केला जाईल. २०५४ पर्यंत ३५ गावांच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी आराखडा तयार असल्याचे मनपा प्रशासकांनी सांगितले.

अगोदर शहर नंतर झालरची गावेशहराला ज्या दिवशी अतिरिक्त पाणी होईल, त्या दिवशी आम्ही मनपा हद्दीला लागून असलेल्या गावांना पाणी देणार आहोत. हा शासनाचाच निर्णय आहे. पाणी मोफत दिले जाणार नाही. आसपासच्या गावांचा कचरा मनपा हद्दीत आणून टाकला जातो. हे बरोबर नाही. त्यांनी घंटागाडीद्वारे कचरा आमच्या प्रक्रिया केंद्रात आणून द्यावा. आम्ही प्रक्रिया करू, त्यासाठीही शुल्क आकारले जाईल. ज्या गावांजवळ मनपाची ड्रेनेज यंत्रणा आहे, तेथे त्यांनी जोडावी. त्याचेही युजर चार्ज मनपा कराराद्वारे घेईल. जिथे ड्रेनेज यंत्रणा नाही, त्या गावात छोटासे ३० ते ४० लाखांत ड्रेनेज ट्रिटमेंट प्लँट उभारावे. त्याचा खर्च ग्रामपंचायत करेल, असे मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न