महामार्गावरील अपघातास प्रशासनच जबाबदार!
By Admin | Updated: June 9, 2014 00:06 IST2014-06-08T23:22:38+5:302014-06-09T00:06:37+5:30
सोमनाथ खताळ , बीड शहरातील वाढते अतिक्रमण पुन्हा एकदा बीडकरांच्या अपघातास निमंत्रण देत आहे़

महामार्गावरील अपघातास प्रशासनच जबाबदार!
सोमनाथ खताळ , बीड
शहरातील वाढते अतिक्रमण पुन्हा एकदा बीडकरांच्या अपघातास निमंत्रण देत आहे़ शहरातून जाणाऱ्या धुळे-सोलापुर या राष्ट्रीय महामार्गाने पोलिस कर्मचाऱ्यापासून विद्यार्थी, पादचारी यांचा जीव घेतला आहे़ केवळ अपघातानंतर हे अतिक्रमण हटवून बीडकरांची समजूत काढण्याचे काम प्रशासन करीत आहे़ महामार्गावर पुन्हा अतिक्रमणे थाटल्याने यापुढे होणाऱ्या अपघातास जबाबदार कोण? असा प्रश्न नक्कीच उपस्थित होईल आणि या प्रश्नाचे उत्तर असेल ते म्हणजे प्रशासनच! ‘लोकमत’ ने रविवारी शहरातून जाणाऱ्या महामार्गाची पाहणी केली असता, महामार्गावर अतिक्रमणे, अवैध वाहतूक, हातगाडे, वाहनांची पार्किंग सर्रास केली जात आहे़
शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाने अनेक बळी घेतले आहेत़ आगोदरच बीड शहराला बायपास आणि उड्डाणपुल नसल्याने शहरातून अवजड वाहनांची वाहतूक असते़ या मोठ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीही होते़ वाहतूक कोंडी मोकळी करताना वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या नाकीनऊ येते़ काही महिन्यापूर्वीच शिक्षकासह मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या तरूणाला भरधाव ट्रकने चिरडले होते़ याचे तीव्र पडसाद अपघातानंतर अवघ्या काही तासातच बीड शहरात उमटले़ अनेकांनी मोर्चे काढले, नेत्यांचे पुतळे जाळले, पे्रत यात्रा काढल्या यासरखे अनेक कुटाने केले़ याची दखलही घेण्यात आली आणि दुपारनंतर महामार्गावरील अतिक्रमणे पोलिस बंदोबस्तात हटविण्यात आले़ त्यांनतर अवघा महिनाभरच महामार्गाने मोकळा श्वास घेतला़ मात्र नंतर पुन्हा अतिक्रमणे थाटण्यास सुरूवात झाली़
याकडे ना प्रशासनाचे लक्ष आहे, ना अपघात झाल्यानंतर मोर्चे, आंदोलन, निदर्शने करणाऱ्या साामाजिक, राजकीय संघटनांचे़ यावरून एवढेच दिसून येत आहे की, प्रशासन बीडकरांचा राग शांत करण्यासाठी तात्पुरती समजूत काढत आहे़
साठे चौक, शिवाजी चौक, नगर नाका या वर्दळीच्या भागात अवैध वाहतूक करणारे वाहने वाहतूकीस अडथळा निर्माण करीत आहेत़ याकडे मात्र संबंधीत विभाग जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा अरोप नागरिकांमधून केला जात आहे़
याबाबत ऩप़चे मुख्याधिकारी व्ही़बी़ निलावाड म्हणाले, हे अतिक्रमण हटवुन अतिक्रमणधारकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील़