शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

अबब ! ओढ्यातच अनधिकृत टोलेजंग इमारती !

By admin | Updated: February 22, 2015 00:38 IST

बीड पालिकेतील नगररचना विभागातील अधिकाऱ्यांंच्या ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्षामुळे शहरातील अनेक भागात अनधिकृत बांधकामे सुरू असून अनेकांनी शुक्रवारपेठ,

 बीडपालिकेतील नगररचना विभागातील अधिकाऱ्यांंच्या ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्षामुळे शहरातील अनेक भागात अनधिकृत बांधकामे सुरू असून अनेकांनी शुक्रवारपेठ, विप्रनगर भागातील ओढ्यातच अनधिकृतपणे टोलेजंग इमारती उभारल्या आहेत. याबाबतच्या तक्रारी आल्यानंतर पाहणी करून अनधिकृत इमारती पाडाव्यात, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. मात्र, पालिकेने त्यांच्या आदेशालाही केराची टोपली दाखविली आहे.शहरात सध्या गल्लीबोळात अनधिकृत बांधकामे करून जागा बळकावण्यात येत आहेत. अशा प्रकरणांच्या तक्रारी वाढल्या असताना यावर तोडगा काढण्यास पालीका उदासीन आहे. उलट आलेल्या तक्रारदारांनाच उडवाउडवीची उत्तरे देऊन अनाधिकृत बांधकाम करणाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम पालिकेतील नगररचना विभागातील कर्मचारी करीत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते रामनाथ खोड यांनी केला आहे.शहरातील शुक्रवार पेठ, विप्रनगर भागातून एक ओढा जातो; मात्र आता या ओढ्याचा नाला झाल्याचे दिसून येत आहे. या ओढ्यातच अनेकांनी मोठ मोठ्या इमारती बांधल्या असून सध्याही अनेक कामे सुरू आहेत. हा ओढा नाळवंडी नाका भागापासून सुरू होतो आणि बिंदुसरेत विसर्जीत होतो. दरम्यानच्या भागात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. या इमारतींमुळे आसपासच्या घरांना पुराचा धोका संभवतो. मोठा पाऊस झाल्यावर ओढ्यातील पाणी विप्रनगर, शुक्रवार पेठ मध्ये जाऊन मोठी हानी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.आठ दिवसांत अहवाल सादर कराया अतिक्रमणांबाबत १८ आॅगस्ट २००७ ला तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी या अनधिकृत बांधकामांची पाहणी करून त्याचा अहवाल आठ दिवसांत सादर करावा, असे आदेश दिले होते, मात्र या आदेशाला संबंधीत विभागाने केराची टोपली दाखविली. ना अहवाल सादर केला ना कारवाई.