शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: हवेतच एकमेकांना धडकले अमेरिकेचे दोन फायटर जेट्स! एअर शो दरम्यान थरार; ४ पायलट चमत्कारीकरित्या बचावले
2
Earthquake In china : चीनमध्ये ५.२ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप! भीषण हादऱ्यांनी इमारती जमीनदोस्त, दोघांचा मृत्यू
3
'लग्नात स्कॉर्पिओ दिली, आता फॉर्च्युनर मागत होते'; सासरच्यांचा जाच! लग्नाच्या १४ महिन्यातच दीपिकाने संपवलं आयुष्य
4
Crime News: रेल्वेत सापडलेली पत्र्याची पेटी उघडताच दिसला तरुणीचा शीर नसलेला मृतदेह, अनेक तुकडे; रेल्वे स्थानकात खळबळ
5
NEET Paper Leak : पेपर विकणारेच नाही तर, लाखो रुपये खर्च करून विकत घेणारे पालकही सीबीआयच्या निशाण्यावर!
6
बापरे! मेक्सिकोमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार, ६ पुरुष आणि एका लहान मुलासह १० जणांचा मृत्यू
7
प्रीती झिंटा-श्रेयस अय्यर यांच्यात गंभीर चर्चा; पाँटिंगही हताश! PBKS च्या ताफ्यात नेमकं काय घडलं?
8
LPG Gas Crisis : एलपीजी सिलिंडरची परिस्थिती तशीच राहणार का? पुरवठा आणि दरांबाबत आली सर्वात मोठी अपडेट
9
अभिमानास्पद! कान्सच्या रेड कार्पेटवर अशोक-निवेदिता सराफ यांनी जपली मराठी संस्कृती, अशोकमामांच्या 'त्या' कृतीने जिंकली मनं
10
थेट टीव्ही स्टुडिओत एके-४७ ने गोळीबार! इराणच्या वृत्तवाहिनीवर थरार; 'युएई'च्या झेंड्यावर केला गोळीबार
11
​अमरावती हादरली! जुन्या वादातून तेजसची सपासप वार करत हत्या; गुन्हा दाखल होण्यापूर्वीच गुन्हे शाखेकडून ३ आरोपींना २ तासांत बेड्या
12
आजचे राशीभविष्य, १८ मे २०२६: आर्थिक लाभाचा योग, पण आर्थिक व्यवहार सावधपणे करा; काय सांगतेय तुमची राशी?
13
दरवाढीनंतर आज किती रुपयांना मिळतंय पेट्रोल-डिझेल? जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...
14
"लवकर निर्णय घ्या, नाहीतर काहीच शिल्लक राहणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी
15
पेट्रोल-डिझेल खिसा कापणार?- आकड्यांचं गणित पाहा!
16
कसली आलीय मंदी... कोल्हापुरात जावयाच्या चप्पलसाठी वापरली चक्क दीड किलोची चांदी
17
मान्सून उंबरठ्यावर तरी महाराष्ट्र अजून तापलेलाच! १५ शहरांत पारा ४० पार
18
'केमिस्ट्री'च्या गुणांचे भाकीत नडणार; क्लासेस, पालक, विद्यार्थीही रडारवर!
19
सीबीएसईचा विद्यार्थ्यांना दिलासा; पुनर्मूल्यांकन शुल्कात मोठी कपात
20
यूएईमध्ये अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला; युद्ध भडकण्याची चिन्हे
Daily Top 2Weekly Top 5

आजी,माजी आमदार आयुक्तांच्या बाजूने

By admin | Updated: May 30, 2014 01:03 IST

औरंगाबाद : धार्मिक स्थळांच्या कारवाईवरून आजी-माजी आमदारांनी विकास आराखड्यातील रस्त्यांत येणारी धार्मिक स्थळे हटविण्याची मागणी करून आयुक्तांची बाजू लावून धरली.

 औरंगाबाद : शहरातील धार्मिक स्थळांच्या कारवाईवरून खा.चंद्रकांत खैरे यांनी मनपा व आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्यावर आगपाखड केली, तर आजी-माजी आमदारांनी विकास आराखड्यातील रस्त्यांत येणारी धार्मिक स्थळे हटविण्याची मागणी करून आयुक्तांची बाजू लावून धरली. आज सकाळी धार्मिक स्थळांच्या कारवाईनंतर महापौर कला ओझा यांच्या दालनात दुपारी पदाधिकार्‍यांची तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीला खा.खैरे यांच्यासह आ.जैस्वाल, माजी आ. तनवाणी, सहसंपर्कप्रमुख सुहास दाशरथे, सभागृह नेता सुशील खेडकर, गटनेता गजानन बारवाल, अफसर खान, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, आयुक्त डॉ.कांबळे, अधिकारी शिवाजी झनझन आदींची उपस्थिती होती. खा. खैरे यांनी आज पुन्हा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्यावर आगपाखड करून राग व्यक्त केला, तर आ.जैस्वाल आणि माजी आ. तनवाणी यांनी रस्त्यांतील धार्मिक स्थळे हटविण्याची गरज व्यक्त केली. त्या दोघांनीही विकास आराखड्यातील रस्त्यांत येणारी धार्मिक स्थळे हटविण्याची मागणी लावून धरली. खा.खैरे यांनी कारवाईवरून संताप केला, तर आजी-माजी आमदारांनी मनपाचा अप्रत्यक्षरीत्या सन्मान केला. तत्कालीन आयुक्त डॉ.भापकर यांनी केलेल्या पाडापाडीत नागरिकांना मालमत्तेचा मावेजा मिळालेला नाही. रस्त्यांतून जीटीएलचे खांबही हटविण्यात आलेले नाहीत. मनपाने ती कामे आधी केली पाहिजेत, असे खा.खैरे म्हणाले. आयुक्त म्हणाले, ही कारवाई कोर्टाच्या आदेशानुसार केली जात आहे. त्यात पालिका, पोलीस, जिल्हाधिकारी कार्यालयाचा सहभाग आहे. नागरिकांनी शांततेने सहकार्य केले. काही ठिकाणी तर नागरिकांनी स्वत:हून धार्मिक स्थळे काढून घेतली. शांतता आणि संयमाने ही कारवाई झाली. कारवाईतून संदेश... पालिकेने धार्मिक स्थळे हटविण्यास प्रारंभ केल्यामुळे त्या कारवाईतून प्रशासन काहीही निर्णय घेऊ शकते, असा संदेश गेला आहे. कुठल्याही राजकीय दबावाला न जुमानता मनपा, पोलीस, जिल्हाधिकारी कार्यालयाने केलेल्या कारवाईमुळे नागरिकांची मानसिकता बदलली आहे. कुठूनही दबाव आला तरी कारवाई होणारच हे लोकांना पटल्याने कुठेही तणाव निर्माण झाला नाही. शांतता आणि संयम... शहर संवेदनशील असल्यामुळे धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचा प्रयत्न जरी झाला, तर मोठा राडा होईल, असे वाटायचे. मात्र, तत्कालीन आयुक्त डॉ.भापकर यांच्यानंतर आयुक्त डॉ.कांबळे यांनी शांतता आणि संयमाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. कुठेही भेदभाव न होता ही कारवाई व्हावी, अशी नागरिकांची मागणी आहे.