शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

अबब...वैजापूरकर घेतात ८० लाखांचे विकत पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 01:10 IST

शहरासह ग्रामीण भागात पाणीटंचाईचे चटके जाणवायला लागल्याने नागरिकांचे पाण्यासाठी अतोनात हाल होत असून त्यांना शासनाच्या टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. पण या टँकरमुळे गावकऱ्यांची तहान भागत नसल्याने त्यांच्यावर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. यातून खासगी टँकरवाल्यांची चांदी होत असून दरमहा ७० ते ८० लाख रुपयांची उलाढाल या धंद्यातून होत आहे.

मोबीन खानवैजापूर : शहरासह ग्रामीण भागात पाणीटंचाईचे चटके जाणवायला लागल्याने नागरिकांचे पाण्यासाठी अतोनात हाल होत असून त्यांना शासनाच्या टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. पण या टँकरमुळे गावकऱ्यांची तहान भागत नसल्याने त्यांच्यावर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. यातून खासगी टँकरवाल्यांची चांदी होत असून दरमहा ७० ते ८० लाख रुपयांची उलाढाल या धंद्यातून होत आहे.सध्या वैजापूर तालुक्यात जवळपास ८० ते ९० खासगी टँकरने पाणीपुरवठा केला जात असून कमीत कमी टँकर सुरू करण्याचे शासनाचे धोरण टँकर लॉबीच्या पथ्यावर पडल्याचे चित्र तालुक्यात निर्माण झाले आहे. त्यामुळे टँकरची मागणी करणारे प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल होत असून कासवगतीने त्यांना मंजुरी मिळत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे.तालुक्यात यंदा जलयुक्त शिवार योजनेचे यश दाखविण्यासाठी प्रशासन टँकरच्या प्रस्तांवाना प्रलंबित ठेवत टँकर नाकारत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी दुष्काळाची दाहकता जाणवायला लागली आहे. पाण्यासाठी महिलांची पायपीट सुरु झाली असली तरी प्रशासनातील अधिकाºयांना त्याचे कोणतेही सोयरसूतक नसल्याचेच दिसते. वैजापूर तालुक्यात ही योजनाच संशयाच्या गर्तेत सापडली आहे. त्यामुळे एकाही ठिकाणी योजनेतून फारसे काही हाती आल्याचे दिसत नाही. प्रशासकीय पातळीवरदेखील या योजनांसंदर्भात माध्यमांना माहिती देण्यासाठी अधिकारी उत्सुक नाहीत. अधिकारी कार्यालयात बसून दुष्काळ निवारण करत आहेत. ग्रामसेवक, गटविकास अधिकारी, तहसीलदार आणि प्रांताधिकारी सर्वच पातळ्यांवर टंचाईच्या प्रस्तावाच्या फायलींचा प्रवास संथगतीने सुरु आहे.पाणीटंचाईसारख्या विषयातदेखील प्रशासन अध्याप गंभीर नाही. चार ते पाच वर्षांपूर्वी टंचाईग्रस्त गावात लोकसहभागातील पाणीपुरवठा नळयोजना राबविण्यात आल्या. मात्र त्या योजना अर्धवट अवस्थेत असल्यामुळे कायमस्वरूपी पाणीटंचाईवर मात करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. ‘नेमेचि भासते पाणीटंचाई’ अशी वैजापूर तालुक्याची अवस्था झाली असून यंदाच्या उन्हाळ्यातही जवळपास ८० ते ९० खासगी टँकरने ग्रामीण भागात पाणीपुरवठा केला जात आहे. यातून टँकरवाल्यांची महिन्याला ८० लाख रुपयांची मोठी कमाई होत आहे. गावातील लोकांना खासगी टँकरने नाईलाजस्तव पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. त्यातच सदोष पाणीपुरवठा योजनेमुळे व पाणी पुरवठा करणाºया पाईपलाईन गंजून गेल्याने नागरिकांना अनेक वेळा दूषित पाणीपुरवठा होतो. आधीच कडक उन्हाळा, त्यातच अत्यंत अपुरा पाणीपुरवठा आणि मिळणारे पाणीही पिण्याला योग्य नाही, अशा परिस्थितीमुळे वैजापूर तालुक्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत.चौकट...वैजापूर तालुक्यातील १६३ गावात पाण्याचे सुमारे ८० ते ९० खासगी टँकर चालतात. हे टँकर हजार आणि १२ हजार लिटर क्षमतेचे आहेत. हंडाभर पाण्यासाठी ५ रुपये, ५०० लिटरचे पाणी २०० रुपये, हजार लिटर पाणी ४०० रुपयात मिळते. हे टँकर शहरालगतच्या गावांमधील विहिरी, बावडी आणि बोअरमधून भरले जातात. शहरातही काही ठिकाणी बोअरद्वारे टँकर भरले जातात. यासाठी विहीर किंवा बोअर मालकाला २०० ते ५०० रुपये द्यावे लागतात. या सर्व टँकरची महिन्याला ८० लाख रुपयांची उलाढाल पाणी विक्रीतून होत असल्याचे टँकर मालकांनी सांगितले.

टॅग्स :water shortageपाणीकपातWaterपाणी