शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना मोठा झटका! मतदानाच्या आधीच राष्ट्रवादीचा उमेदवारच भाजपात; BJP ला दिला पाठिंबा
2
अंबरनाथमध्ये शिंदेसेनेची खेळी, भाजपाला बसला झटका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लागली लॉटरी
3
Pune Municipal Election: "...तर मला दिल्लीत जाऊन चर्चा करावी लागेल"; युती धर्माच्या विधानानंतर अजित पवारांचा इशारा
4
भाजपा-AIMIM युतीचा दुसरा अंक! एमआयएमच्या पाठिंब्यावर BJP नेत्याचा मुलगा बनला स्वीकृत नगरसेवक
5
सायबर हल्ल्यापासून बचावासाठी वापरा USB कंडोम, कुठे अन् कसा वापर करायचा? जाणून घ्या...
6
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची अचानक तब्येत बिघडली; दिल्लीतील AIIMS मध्ये दाखल
7
Crime: सेक्ससाठी नकार देणाऱ्या पत्नीची गळा आवळून हत्या, पोस्टमॉर्टम रिपोर्टमुळं फुटलं पतीचं पितळ!
8
Video: 'माझा काय संबंध, मला...', मुस्तफिजूर रहमानबाबत प्रश्न विचारताच नबी पत्रकारावर चिडला
9
Shikhar Dhawan And Sophie Shine Engagement : "आम्ही आयुष्यभरासाठी..." शिखर-सोफीनं शेअर केली साखरपुड्याची गोष्ट
10
Crime: रस्त्यातून अपहरण, जबरदस्तीनं दारू पाजली अन् रात्रभर सामूहिक अत्याचार; बिहार हादरलं!
11
TCS च्या नफ्यात १४ टक्क्यांची मोठी घट! तरी गुंतवणूकदारांना करणार मालामाल; लाभांश जाहीर
12
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता बदलणार; 'सेवा तीर्थ'साठी किती खर्च?
13
हत्येनंतर मृतदेह पाण्यानं स्वच्छ धुतला अन् त्यानंतर...; थरकाप उडवणारी घटना समोर, नरभक्षकाला अटक
14
अंघोळीसाठी गेलेली मुलं बाहेर येईना; ४ वर्षांच्या रयानचा मृत्यू, दरवाजा तोडताच दिसलं भयंकर
15
अमेरिकेने व्हेनेझुएलामध्ये 'सोनिक वेपन' वापरले? हे हत्यार कानातून रक्त काढते
16
सोन्याच्या दुकानात चोरी केली, परत जाताना गुटखा खाण्यासाठी मास्क काढला अन् सीसीटीव्हीत कैद झाला, पोहोचला तुरुंगात
17
Travel : २६ जानेवारीचा लॉन्ग वीकेंड आणि वृंदावनची वारी! कान्हाच्या नगरीत फिरण्यासाठी 'हे' आहे परफेक्ट प्लॅनिंग
18
आमचा अणुबॉम्ब भारत, इस्रायल, अमेरिकेच्या विरोधात...', अणु सिद्धांतावर पाकिस्तानचा मोठा दावा
19
"आम्ही कुणाला गुलाम बनवलं नाही, आम्ही तर...", काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ४० वर्षांनी 'ती' म्हणाली 'हो', तरुणपणी झालं नाही लग्न; आता जुळल्या रेशीमगाठी
Daily Top 2Weekly Top 5

अबब...वैजापूरकर घेतात ८० लाखांचे विकत पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 01:10 IST

शहरासह ग्रामीण भागात पाणीटंचाईचे चटके जाणवायला लागल्याने नागरिकांचे पाण्यासाठी अतोनात हाल होत असून त्यांना शासनाच्या टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. पण या टँकरमुळे गावकऱ्यांची तहान भागत नसल्याने त्यांच्यावर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. यातून खासगी टँकरवाल्यांची चांदी होत असून दरमहा ७० ते ८० लाख रुपयांची उलाढाल या धंद्यातून होत आहे.

मोबीन खानवैजापूर : शहरासह ग्रामीण भागात पाणीटंचाईचे चटके जाणवायला लागल्याने नागरिकांचे पाण्यासाठी अतोनात हाल होत असून त्यांना शासनाच्या टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. पण या टँकरमुळे गावकऱ्यांची तहान भागत नसल्याने त्यांच्यावर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. यातून खासगी टँकरवाल्यांची चांदी होत असून दरमहा ७० ते ८० लाख रुपयांची उलाढाल या धंद्यातून होत आहे.सध्या वैजापूर तालुक्यात जवळपास ८० ते ९० खासगी टँकरने पाणीपुरवठा केला जात असून कमीत कमी टँकर सुरू करण्याचे शासनाचे धोरण टँकर लॉबीच्या पथ्यावर पडल्याचे चित्र तालुक्यात निर्माण झाले आहे. त्यामुळे टँकरची मागणी करणारे प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल होत असून कासवगतीने त्यांना मंजुरी मिळत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे.तालुक्यात यंदा जलयुक्त शिवार योजनेचे यश दाखविण्यासाठी प्रशासन टँकरच्या प्रस्तांवाना प्रलंबित ठेवत टँकर नाकारत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी दुष्काळाची दाहकता जाणवायला लागली आहे. पाण्यासाठी महिलांची पायपीट सुरु झाली असली तरी प्रशासनातील अधिकाºयांना त्याचे कोणतेही सोयरसूतक नसल्याचेच दिसते. वैजापूर तालुक्यात ही योजनाच संशयाच्या गर्तेत सापडली आहे. त्यामुळे एकाही ठिकाणी योजनेतून फारसे काही हाती आल्याचे दिसत नाही. प्रशासकीय पातळीवरदेखील या योजनांसंदर्भात माध्यमांना माहिती देण्यासाठी अधिकारी उत्सुक नाहीत. अधिकारी कार्यालयात बसून दुष्काळ निवारण करत आहेत. ग्रामसेवक, गटविकास अधिकारी, तहसीलदार आणि प्रांताधिकारी सर्वच पातळ्यांवर टंचाईच्या प्रस्तावाच्या फायलींचा प्रवास संथगतीने सुरु आहे.पाणीटंचाईसारख्या विषयातदेखील प्रशासन अध्याप गंभीर नाही. चार ते पाच वर्षांपूर्वी टंचाईग्रस्त गावात लोकसहभागातील पाणीपुरवठा नळयोजना राबविण्यात आल्या. मात्र त्या योजना अर्धवट अवस्थेत असल्यामुळे कायमस्वरूपी पाणीटंचाईवर मात करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. ‘नेमेचि भासते पाणीटंचाई’ अशी वैजापूर तालुक्याची अवस्था झाली असून यंदाच्या उन्हाळ्यातही जवळपास ८० ते ९० खासगी टँकरने ग्रामीण भागात पाणीपुरवठा केला जात आहे. यातून टँकरवाल्यांची महिन्याला ८० लाख रुपयांची मोठी कमाई होत आहे. गावातील लोकांना खासगी टँकरने नाईलाजस्तव पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. त्यातच सदोष पाणीपुरवठा योजनेमुळे व पाणी पुरवठा करणाºया पाईपलाईन गंजून गेल्याने नागरिकांना अनेक वेळा दूषित पाणीपुरवठा होतो. आधीच कडक उन्हाळा, त्यातच अत्यंत अपुरा पाणीपुरवठा आणि मिळणारे पाणीही पिण्याला योग्य नाही, अशा परिस्थितीमुळे वैजापूर तालुक्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत.चौकट...वैजापूर तालुक्यातील १६३ गावात पाण्याचे सुमारे ८० ते ९० खासगी टँकर चालतात. हे टँकर हजार आणि १२ हजार लिटर क्षमतेचे आहेत. हंडाभर पाण्यासाठी ५ रुपये, ५०० लिटरचे पाणी २०० रुपये, हजार लिटर पाणी ४०० रुपयात मिळते. हे टँकर शहरालगतच्या गावांमधील विहिरी, बावडी आणि बोअरमधून भरले जातात. शहरातही काही ठिकाणी बोअरद्वारे टँकर भरले जातात. यासाठी विहीर किंवा बोअर मालकाला २०० ते ५०० रुपये द्यावे लागतात. या सर्व टँकरची महिन्याला ८० लाख रुपयांची उलाढाल पाणी विक्रीतून होत असल्याचे टँकर मालकांनी सांगितले.

टॅग्स :water shortageपाणीकपातWaterपाणी