शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

कोट्यवधीचा टॅक्स भरणारा ‘व्यापारी कधी लाडका’ होणार; व्यापाऱ्यांनी काढला जाहीरनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 19:45 IST

जनतेचा जाहीरनामा: राज्यात स्वतंत्र व्यापार मंत्रालय स्थापन करावे ; जीएसटी आला मग राज्यातील ‘व्यवसाय कर’ हटवा

छत्रपती संभाजीनगर : ग्राहकांकडून टॅक्स घेऊन तो सरकारच्या तिजोरीत भरतात. सरकार व ग्राहक यांच्यातील दूताचे काम व्यापारी वर्ग करीत असतो. देशात सर्वाधिक बेरोजगारांना नोकरी उपलब्ध करून देणारे ‘व्यापार क्षेत्र’च आहे. मात्र, हा व्यापारी वर्ग नेहमीच दुर्लक्षित राहिला आहे. कोणत्याही सरकारच्या काळात ‘लाडका व्यापारी’ झालाच नाही. विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा राज्यात झाली आहे. निवडून येणाऱ्या सरकारने राज्यात ‘स्वतंत्र व्यापार मंत्रालय’ स्थापन करावे. तसेच राज्यातील ‘व्यवसाय कर’ कायमस्वरुपी हटविण्यात यावा, असा जाहीरनामा व्यापारी संघटनांनी तयार केला आहे.

स्वतंत्र व्यापार मंत्रालय हवेदेशात सर्वात जास्त प्रमाणावर रोजगार निर्मिती लहान-मोठे व्यापारी बांधवांकडून होते. याकरिता उद्योग मंत्रालयाप्रमाणे एक राष्ट्रीय व्यापार निती आयोगाची स्थापना करावी व महाराष्ट्र राज्यात ‘स्वतंत्र व्यापार मंत्रालय’ स्थापन करण्यात यावे. यामुळे व्यापार क्षेत्रातील अडीअडचणी सोडवण्यास मदत होईल.-आदेशपालसिंग छाबडा, अध्यक्ष, मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्स

जीएसटी आहे व्यवसायकर रद्द कराजीएसटी ही करप्रणाली देशात लागू होऊन आता वर्ष पूर्ण झाले आहे. केंद्र सरकारने ‘ एक देश एक करप्रणाली’ अशी घोषणा केली होती. मात्र, अजूनही महाराष्ट्र राज्यात ‘व्यवसाय कर’ वसूल केला जात आहे. व्यापाऱ्यांच्या जाहीरनाम्यात हा कळीचा मुद्दा आम्ही घेतला आहे. व्यापाऱ्यांना अपेक्षा आहे की, राज्यातील व्यवसाय कर रद्द करण्यात यावा.-लक्ष्मीनारायण राठी, वरिष्ठ उपाध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ

औषधाची विक्री करणाऱ्या ई-कॉमर्सवर निर्बंध आणाऔषध विक्रेते सर्व सरकारी नियमाचे पालन करून जबाबदारीने औषध रुग्णांना विकत असतात. औषध व अन्न प्रशासनाचे असंख्य निर्बंध औषध विक्रेत्यांवर आहेत. मात्र, ऑनलाइन औषध विक्रीतून अनेक गैरप्रकार होत आहेत. त्यावर शासनाचे निर्बंध नाही. ई-कॉमर्सद्वारे जुनी, बनावट, दूषित किंवा मान्यता नसलेल्या औषधांची विक्रीचा धोका आहे. राज्य सरकारने ऑनलाईन औषध विक्रीवर कायमस्वरुपी बंदी आणावी. ही मागील अनेक वर्षांची मागणी आहे.-नितीन देशमुख (दांडगे), अध्यक्ष, डिस्टीक केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन

अवाजवी वीज दरवाढ रद्द करावीसर्व व्यापार-उद्योगांचा प्राण म्हणजे ‘वीज’ आहे. वीजपुरवठा असेल तर व्यवसाय, उत्पादन सुरळीत होत असते. उद्योजक असो वा व्यापारी नियमितपणे वीज बील भरत असतात. मात्र, महावितरण दरवर्षी ‘विजे’चे दर वाढवित आहेत. देशात सर्वात महाग वीज महाराष्ट्रात विकत घेतली जाते. महावितरणाने दर ५ वर्षाने वीज बिलात वाढ करावी. व्यापाऱ्यांना सवलतीच्या दरात वीज मिळावी. त्यासाठी राज्य सरकारने कायदा करावा.-संतोष कावले-पाटील, अध्यक्ष, कॅट, स्थानिक शाखा

राज्य शासनाकडे मागणी१) उत्तर प्रदेशच्या धर्तीवर राज्यात ज्येष्ठ व्यापाऱ्यांना पेन्शन योजना लागू करावी.२) व्यापाऱ्यांचा सुरक्षा विमा काढण्यात यावा.३) व्यापाऱ्यांना कमी व्याजदरात बँकेकडून कर्ज उपलब्ध करून द्यावे.४) एक देश एक कर यानुसार जीएसटी लागू झाला. आता व्यवसाय कर रद्द करावा.५) माळीवाडा येथे ‘सी अँड एफ’ हब सुरू करावे.६) करोडी शिवारात मालवाहतूक नगर उभारण्यात यावे.७) व्यावसायिकांना सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करून द्यावी.

७ लाख व्यापारी जिल्ह्यात६० हजार व्यापारी शहरात

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर