शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
3
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
4
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
5
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
6
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
7
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
8
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
9
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
10
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
11
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
12
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
13
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
14
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
15
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
16
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
17
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
18
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
19
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
20
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान

९० कोटींत भागेना; औरंगाबादमधील कचरा व्यवस्थापनाचा खर्च १२५ कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 15:51 IST

वर्षभरानंतर प्रत्यक्ष काम करताना घनकचरा व्यवस्थापनासाठी निधी अपुरा पडतो आहे.

ठळक मुद्देव्यवस्थापनासाठी आणखी ३५ कोटींची गरजशासनाला सुधारित ‘डीपीआर’ होणार सादर

औरंगाबाद : शहरात वर्षभरापूर्वी कचराकोंडी निर्माण झाल्यानंतर मनपाने घनकचरा व्यवस्थापनाचा डीपीआर शासनाकडे पाठविला होता. सादर केलेल्या ‘डीपीआर’नुसार तात्काळ ९० कोटींचा निधी मंजूर झाला; परंतु वर्षभरानंतर आता प्रत्यक्ष काम करताना घनकचरा व्यवस्थापनासाठी हा निधी अपुरा पडतो आहे. त्यामुळे सुधारित डीपीआर तयार केला असून, त्यात तब्बल ३५ कोटींची वाढ झाली आहे. शहरातील कचरा व्यवस्थापनाचा खर्च ९० कोटींवरून १२५ कोटींवर पोहोचला आहे.

गतवर्षी १६ फेब्रुवारी रोजी नारेगावसह परिसरातील आठ ते दहा गावांतील ग्रामस्थांनी आंदोलन केले. नारेगाव येथे कचरा टाकण्यात येऊ नये, अशी मागणी करीत आंदोलनकर्त्यांनी कचऱ्याचे एकही वाहन कचरा डेपोवर येऊ दिले नाही. त्यामुळे शहरात ऐतिहासिक कचराकोंडी निर्माण झाली. कचराकोंडीमुळे महापालिकेने घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रस्तावित प्रक्रिया प्रकल्पांचा डीपीआर तयार करून राज्य शासनाकडे सादर केला.

शहरातील परिस्थिती पाहून हा डीपीआर मंजूर करीत शासनाने मनपाला ९० कोटींचा निधी तात्काळ दिला; परंतु कचऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी हा डीपीआर गडबडीत तयार केल्याचे दिसते. प्रत्यक्ष काम करताना अधिक खर्च येत आहे. त्यामुळे सुधारित डीपीआर तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार इंदूर येथील प्रकल्प सल्लागार कंपनीने (पीएमसी) सुधारित डीपीआर तयार करण्याचे काम हाती घेतले. हा डीपीआर अंतिम टप्प्यात असून, मंगळवारपर्यंत सुधारित डीपीआर महापालिकेला सादर होणार आहे. यानंतर महापालिका हा डीपीआर सभागृहात मंजूर करून शासनाकडे पाठविणार असल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी शनिवारी दिली.

नारेगावचा प्रकल्प ५० कोटींवरनारेगाव कचरा डेपोतील कचऱ्याच्या डोंगरावर बायोमायनिंगची प्रक्रिया केली जाणार आहे. त्यासाठी पूर्वीच्या जुन्या ‘डीपीआर’मध्ये २५ कोटींची तरतूद होती. या कामाला अजूनही हात लागलेला नाही. असे असताना आता प्रत्यक्षात हा खर्च दुपटीने वाढला आहे. सुधारित डीपीआरमध्ये नारेगाव प्रकल्पाचा खर्च ५० कोटी इतका झाला आहे. चारही प्रकल्पांच्या बांधकामासह अन्य कामांसाठी वाढीव १० कोटी, अशी ३५ कोटींची वाढ झाली आहे.

दररोज आढावा घेऊन करणार पडताळणीशहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी आता कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. कचरा प्रक्रिया केंद्राचा विकास, तेथील बांधकाम, यंत्रांची परिस्थिती आदींसंदर्भात दररोज माहिती घेतली जाणार आहे. दिलेल्या माहितीनुसार काम सुरूआहे की नाही, याची पडताळणी केली जाईल, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.शहरात दररोज जमा होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी राज्य शासनाने ९० कोटी रुपये दिले. या निधीतून पडेगाव आणि चिकलठाणा येथे प्रत्येकी १५० मेट्रिक टन क्षमतेचे दोन कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्याची सूचना केली. सध्या चिकलठाण्यात शेड झाले आहे. बांधकाम५० टक्के पूर्ण झाले आहे. याठिकाणी तीन यंत्रे बसविण्यात आली आहेत. पडेगाव येथे काम सुरू करू नये म्हणून राज्य शासनातील एका मंत्र्याने स्थगिती आदेश दिला. परिणामी प्लॉटच्या वादामुळे काम अद्याप सुरूझालेले नाही. कांचनवाडी येथे रोज ३० टन कचऱ्यापासून गॅस निर्मिती केली जाणार आहे. कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश देण्यात आले. सध्या शहरात कुठेही कचरा साचत नाही, असा दावा महापालिकेकडून केला जातो; परंतु प्रक्रिया केंद्रावर कचरा पडून असल्याचे दिसते.

मंगळवारपासून अंमलबजावणीवर्षभरानंतरही कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागलेला नसल्याने आता त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार मंगळवारपासून केलेल्या कामाचा दररोज आढावा घेण्यात येणार आहे.

शासनाने दिले नाही, तर मनपाकडून तरतूदनिधी मिळण्यास काही अडचण येणार नाही. सध्याची हातातील कामे पूर्ण होतील. नारेगाव येथील कामाचीही सुरुवात होईल. शासनाने निधी दिला नाही, तर महापालिकेकडून तरतूद करता येईल. ९० कोटींतील कामांची प्रक्रिया सुरू आहे.  

- नंदकुमार घोडेले, महापौर

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाfundsनिधी