शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

९१ कोटी रुपये दिले; कचऱ्याचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 11:50 PM

शहरात मागील १६ महिन्यांपासून कचराकोंडी सुरू आहे. शहरात जमा होणारा कचरा चार वेगवेगळ्या भागांत नेऊन टाकण्याचे काम मनपा प्रशासन मागील वर्षभरापासून करीत आहे. चिकलठाणा वगळता कुठेच कचºयावर प्रक्रिया होत नाही. कचरा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाने महापालिकेला ९१ कोटी रुपयांचे भरघोस अनुदान दिले होते.

ठळक मुद्देशासनाकडून विचारणा : आयुक्त आज खुलासा करणार

औरंगाबाद : शहरात मागील १६ महिन्यांपासून कचराकोंडी सुरू आहे. शहरात जमा होणारा कचरा चार वेगवेगळ्या भागांत नेऊन टाकण्याचे काम मनपा प्रशासन मागील वर्षभरापासून करीत आहे. चिकलठाणा वगळता कुठेच कचºयावर प्रक्रिया होत नाही. कचरा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाने महापालिकेला ९१ कोटी रुपयांचे भरघोस अनुदान दिले होते. अनुदान मिळाल्यानंतरही प्रशासनाने नेमके काय केले? असा प्रश्न नगरविकास विभागाने उपस्थित केला आहे. प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्यासमोर मनपा आयुक्त बुधवारी खुलासा करणार आहेत.१६ फेब्रुवारी २०१८ रोजी शहरात कचरा कोंडीला सुरुवात झाली. शहरात रस्त्यांवर अक्षरश: कचºयाचे डोंगर साचले होते. या कचरा कोंडीत राज्य शासनाने महापालिकेला चांगलीच साथ दिली. नगरविकास विभागाच्या तत्कालीन सचिव मनीषा म्हैसकर यांनी स्वत: औरंगाबादेत येऊन कचरा प्रश्न सोडविण्यासाठी मार्गदर्शन केले होते. त्यानंतर लगेच शासनाने महापालिकेला कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी ९१ कोटी रुपयांचे अनुदान दिले. त्यानंतर महापालिकेने चिकलठाणा, हर्सूल, पडेगाव, कांचनवाडी येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला. चिकलठाणा येथील प्रकल्प दोन दिवसांपूर्वीच सुरू करण्यात महापालिकेला यश आहे. इतर प्रकल्प अद्याप रखडलेले आहेत, तर हर्सूलची निविदादेखील होऊ शकलेली नाही. १६ महिने उलटल्यानंतर राज्य शासनाने शहरातील कचºयाची नेमकी काय अवस्था आहे? अशी विचारणा महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्याकडे केली आहे. विशेष म्हणजे नगर विकास विभागात असलेल्या मनीषा म्हैसकर आता प्रधान सचिव आहेत. त्यांच्याकडे आयुक्त गुरुवारी सादरीकरण करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न