शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
5
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
6
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
7
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
8
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
9
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
10
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
11
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
12
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
13
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
14
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
15
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
16
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
17
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
18
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
19
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
20
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
Daily Top 2Weekly Top 5

किराडपुरा जाळपोळीतील ८६ आरोपी जामिनावर बाहेर; ५ सूत्रधार पसारच, यंदा पोलिस अलर्ट

By सुमित डोळे | Updated: April 16, 2024 18:53 IST

२०२३ च्या रामनवमीच्या आदल्या दिवशीची घटना; या प्रकरणातील मुख्य आरोपींना उद्या एक दिवसासाठी तडिपार करणार

छत्रपती संभाजीनगर : गेल्या वर्षी रामनवमीच्या आदल्या रात्री काही समाजकंटकांनी किराडपुरा राममंदिराबाहेर मोठ्या हिंसाचारासह जाळपोळ केली होती. पोलिसांवरच प्राणघातक हल्ला करून कोट्यवधींचे नुकसान केले. त्यातील सर्व ८६ आरोपी, समाजकंटकांची जामिनावर सुटका झाली. मात्र, या घटनेमधील मुख्य ५ सूत्रधार मात्र वर्षभरानंतरही पसारच आहेत. त्यामुळेच यंदा मात्र पोलिसांसह गुप्तचर यंत्रणादेखील अधिक सतर्क झाली आहे. या गुन्ह्यातील काही आरोपींना एक दिवसासाठी तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

३० मार्च २०२३ रोजी रामनवमीच्या मध्यरात्री १२:३० वाजता समाजकंटकांच्या दाेन गटांतील किरकोळ वादाचे पर्यवसान मोठ्या हिंसाचारात झाले होते. काही स्थानिकांकडून अधिक हिंसक वळण देऊन दगडफेक, तोडफोड सुरू करण्यात आली. मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलिस, भाविकांसह खासदार इम्तियाज जलीलदेखील अडकले होते. घटनास्थळी पोहोचलेल्या दंगा काबू पथकाने पळ काढल्याने पोलिसांवरच जमावाने प्राणघातक हल्ला केला होता. तत्कालिन निरीक्षक गीता बागवडे यांनी गोळीबार केल्यानंतर मात्र अनेकांचा जीव वाचून मोठी दुर्घटना टळली होती.

१४ वाहने बेचिराख, कोट्यवधींचे नुकसान-पेट्रोल बॉम्ब टाकून १४ वाहने जाळून खाक करण्यात आली होती. त्यात दंगाकाबू पथकाच्या दोन टाटा कंपनीच्या फायटनरसह १२ शासकीय वाहने व दोन पोलिस कर्मचाऱ्यांच्या खासगी दुचाकी जाळून बेचिराख करण्यात आल्या होत्या.-दोन डीपी बंद करून सीसीटीव्ही कॅमेरेदेखील फोडून अडीच ते तीन कोटी रुपयांचे नुकसान करण्यात आले. निरीक्षक अशोक भंडारे यांच्या फिर्यादीवरून जिन्सी पाेलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न करणे, सरकारी कामात हस्तक्षेप करण्याच्या कलमासह तब्बल १८ गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

अडीच हजार पानांचे दोषारोपपत्र वरिष्ठ निरीक्षक संभाजी पवार यांच्या एसआयटीने या संबंधित घटनेचा तपास केला. सुमारे तीन महिने सखोल तपास करून अडीच हजार पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले. त्यात प्रामुख्याने दोन तरुणांच्या वादानंतर झालेल्या घोषणाबाजीमुळे वाद वाढला. त्यानंतर काहींनी त्याचा दुरुपयोग करण्याच्या उद्देशाने अफवा पसरवून हा हिंसाचार घडवल्याचा ठपका दोषारोपपत्रात ठेवण्यात आला आहे.

गुप्तचर यंत्रणा सतर्कयंदाच्या रामनवमीच्या पार्श्वभूमीवर पोलिस उपायुक्त नवनीत काँवत यांनी सर्व पोलिस ठाण्यांना रेकॉर्डवरील गुन्हेगार, समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाईचे आदेश दिले, शिवाय, किराडपुऱ्यातील हिंसाचारातील मुख्य आरोपींना एक दिवसासाठी तडीपार करण्याच्या सूृचनादेखील केल्या आहेत. एकट्या मंदिराला २५० पोलिसांचा वेढा राहील, तर अन्य भागांमध्ये जवळपास १ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात असेल. सोमवारपासून पोलिस, विविध गुप्तचर यंत्रणांनी तत्कालीन संशयितांसह विविध सामाजिक घटकांवर लक्ष केंद्रित केले आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप ठरले होते मुख्य कारण३० मार्च २०२३ रोजी किरकोळ वादानंतर काही क्षणांत शेकडोंचा संतप्त जमाव जमला होता. तपासामध्ये हा सर्व जमाव केवळ काही व्हॉट्सॲप ग्रुपवरून बोलावण्यात आल्याचेही निष्पन्न झाले होते. काही ठराविक तरुणांच्या व्हॉटसॲप ग्रुपवर प्रक्षोभक मेसेज टाकण्यात आले होते. त्यामुळे यावेळी पोलिसांना अशा तरुणांचे ग्रुप, सोशल मीडियावरील पेजेसवर अधिक लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत अन्य तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस