शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठ्याचे ८२२ कोटी मनपाच्या मानगुटीवर! राज्यशासनही रक्कम देऊ शकत नाही

By मुजीब देवणीकर | Updated: January 6, 2024 12:23 IST

महापालिकेच्या तिजोरीत नेहमीप्रमाणे खडखडाट आहे. दर महिन्याला पगारासाठीही निधी नसतो.

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहराची २०५० पर्यंत तहान भागेल यादृष्टीने २,७४० कोटी रुपयांची महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या अमृत-२ योजनेत पाणीपुरवठ्याचा समावेश केला आहे. केंद्राकडून फक्त ६८५ कोटी १९ लाख, राज्य शासनाकडून १,२३३ कोटी ३४ लाख आणि मनपाला ८२२ कोटी २२ लाख रुपये टाकावे लागणार आहेत. मनपाची रक्कमही राज्य शासनाने द्यावी असे तोंडी आदेश खंडपीठाने दिले. मात्र, तांत्रिकदृष्ट्या ही रक्कम राज्य शासनाला देणे शक्य होणार नाही. त्यामुळे ८२२ कोटींचे भूत मनपाच्या मानगुटीवरच बसणार आहे.

नवीन पाणीपुरवठा योजनेत आतापर्यंत केंद्र आणि राज्य शासनाकडून मिळून ९८१ कोटी ६५ लाख रुपये मिळाले. योजना डिसेंबर २०२४ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण झालीच पाहिजे यासाठी भाजपा नेत्यांकडून वारंवार बैठकांचे सत्र सुरू आहे. योजनेला निधी कसा प्राप्त होईल, या दृष्टीने आजपर्यंत नेते बोलायला तयार नाहीत. जायकवाडी ते नक्षत्रवाडी आणि शहरात पाण्याच्या टाक्या, जलवाहिन्या टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. योजना अंतिम टप्प्यात आल्यानंतर निधीअभावी रखडण्याची दाट शक्यता आहे.

महापालिकेच्या तिजोरीत नेहमीप्रमाणे खडखडाट आहे. दर महिन्याला पगारासाठीही निधी नसतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन खंडपीठाने मागील वर्षी तोंडी स्वरूपात मनपाचा वाटा राज्य शासनाने भरावा असे नमूद केले. खंडपीठाच्या आदेशानुसार शासन रक्कम देईल, म्हणून महापालिका निवांत आहे. प्रत्यक्षात राज्य शासनाने केंद्राच्या एखाद्या योजनेत मनपाचा वाटा टाकला तर राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिकांनाही रक्कम द्यावी लागेल. छत्रपती संभाजीनगर महापालिकेला कर्ज उभारून हा वाटा टाकण्याशिवाय पर्याय नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

६०० कोटी जीएसटीकेंद्र शासन आपला वाटा म्हणून योजनेसाठी ६८५ कोटी रुपये देत आहे. योजनेला जीएसटी अंतर्गत आणले असल्याने ६०० कोटी रुपये तर जीएसटीची रक्कम केंद्राला परत जात आहे. मग केंद्राचा वाटा नेमका किती?

काम रखडण्याची शक्यतानिधीअभावी योजनेचे काम अंतिम टप्प्यात रखडण्याची शक्यता आहे. ऐन वेळी महापालिकेला ८२२ कोटींचा वाटा द्यायचा असेल तर कर्जरोखे उभारण्यासाठी अनेक मालमत्तांचे मूल्यांकन, गहाण इ. प्रक्रियेसाठी सहा ते आठ महिने लागू शकतात. स्मार्ट सिटीत २५० कोटींचा वाटा टाकण्यासाठी अगोदरच कर्ज घेतलेले आहे.

छोट्या योजनांचा वाटा वेगळाचअमृत-२ मधून सातारा-देवळाईत ड्रेनेज प्रकल्पाचे काम सुरू आहे. या योजनेत मनपाला ८० कोटी रुपये टाकावे लागणार आहेत. कमल तलावाच्या सौंदर्यीकरणात ९० लाख रुपये, पडेगाव-मिटमिटा येथील १९० कोटींचा ड्रेनेज प्रकल्प मंजूर झाल्यास ६३ कोटी, कचऱ्याचे डोंगर नष्ट करण्यासाठी २४ कोटींचा वाटा टाकावा लागणार आहे.

२७४०.७५ -कोटी योजनेची एकूण किंमतकेंद्राचा वाटा- ६८५.१९ कोटीराज्य शासन-१२३३.३४ कोटीमहापालिकेचा वाटा-८२२.२२ कोटीआतापर्यंत प्राप्त निधी- ९८१.६५ कोटी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका