शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
2
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
3
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
4
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
6
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
7
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
8
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
9
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
10
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
11
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
12
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
14
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
15
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
16
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
17
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
18
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
19
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
20
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले

पाणीपुरवठ्याचे ८२२ कोटी मनपाच्या मानगुटीवर! राज्यशासनही रक्कम देऊ शकत नाही

By मुजीब देवणीकर | Updated: January 6, 2024 12:23 IST

महापालिकेच्या तिजोरीत नेहमीप्रमाणे खडखडाट आहे. दर महिन्याला पगारासाठीही निधी नसतो.

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहराची २०५० पर्यंत तहान भागेल यादृष्टीने २,७४० कोटी रुपयांची महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या अमृत-२ योजनेत पाणीपुरवठ्याचा समावेश केला आहे. केंद्राकडून फक्त ६८५ कोटी १९ लाख, राज्य शासनाकडून १,२३३ कोटी ३४ लाख आणि मनपाला ८२२ कोटी २२ लाख रुपये टाकावे लागणार आहेत. मनपाची रक्कमही राज्य शासनाने द्यावी असे तोंडी आदेश खंडपीठाने दिले. मात्र, तांत्रिकदृष्ट्या ही रक्कम राज्य शासनाला देणे शक्य होणार नाही. त्यामुळे ८२२ कोटींचे भूत मनपाच्या मानगुटीवरच बसणार आहे.

नवीन पाणीपुरवठा योजनेत आतापर्यंत केंद्र आणि राज्य शासनाकडून मिळून ९८१ कोटी ६५ लाख रुपये मिळाले. योजना डिसेंबर २०२४ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण झालीच पाहिजे यासाठी भाजपा नेत्यांकडून वारंवार बैठकांचे सत्र सुरू आहे. योजनेला निधी कसा प्राप्त होईल, या दृष्टीने आजपर्यंत नेते बोलायला तयार नाहीत. जायकवाडी ते नक्षत्रवाडी आणि शहरात पाण्याच्या टाक्या, जलवाहिन्या टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. योजना अंतिम टप्प्यात आल्यानंतर निधीअभावी रखडण्याची दाट शक्यता आहे.

महापालिकेच्या तिजोरीत नेहमीप्रमाणे खडखडाट आहे. दर महिन्याला पगारासाठीही निधी नसतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन खंडपीठाने मागील वर्षी तोंडी स्वरूपात मनपाचा वाटा राज्य शासनाने भरावा असे नमूद केले. खंडपीठाच्या आदेशानुसार शासन रक्कम देईल, म्हणून महापालिका निवांत आहे. प्रत्यक्षात राज्य शासनाने केंद्राच्या एखाद्या योजनेत मनपाचा वाटा टाकला तर राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिकांनाही रक्कम द्यावी लागेल. छत्रपती संभाजीनगर महापालिकेला कर्ज उभारून हा वाटा टाकण्याशिवाय पर्याय नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

६०० कोटी जीएसटीकेंद्र शासन आपला वाटा म्हणून योजनेसाठी ६८५ कोटी रुपये देत आहे. योजनेला जीएसटी अंतर्गत आणले असल्याने ६०० कोटी रुपये तर जीएसटीची रक्कम केंद्राला परत जात आहे. मग केंद्राचा वाटा नेमका किती?

काम रखडण्याची शक्यतानिधीअभावी योजनेचे काम अंतिम टप्प्यात रखडण्याची शक्यता आहे. ऐन वेळी महापालिकेला ८२२ कोटींचा वाटा द्यायचा असेल तर कर्जरोखे उभारण्यासाठी अनेक मालमत्तांचे मूल्यांकन, गहाण इ. प्रक्रियेसाठी सहा ते आठ महिने लागू शकतात. स्मार्ट सिटीत २५० कोटींचा वाटा टाकण्यासाठी अगोदरच कर्ज घेतलेले आहे.

छोट्या योजनांचा वाटा वेगळाचअमृत-२ मधून सातारा-देवळाईत ड्रेनेज प्रकल्पाचे काम सुरू आहे. या योजनेत मनपाला ८० कोटी रुपये टाकावे लागणार आहेत. कमल तलावाच्या सौंदर्यीकरणात ९० लाख रुपये, पडेगाव-मिटमिटा येथील १९० कोटींचा ड्रेनेज प्रकल्प मंजूर झाल्यास ६३ कोटी, कचऱ्याचे डोंगर नष्ट करण्यासाठी २४ कोटींचा वाटा टाकावा लागणार आहे.

२७४०.७५ -कोटी योजनेची एकूण किंमतकेंद्राचा वाटा- ६८५.१९ कोटीराज्य शासन-१२३३.३४ कोटीमहापालिकेचा वाटा-८२२.२२ कोटीआतापर्यंत प्राप्त निधी- ९८१.६५ कोटी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका