शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

म्हणे श्वानांच्या नसबंदीवर ८२ लाखांचा खर्च; तरी मोकाट श्वान येतात थेट अंगावर, वाहनधारक त्रस्त

By मुजीब देवणीकर | Updated: May 3, 2023 12:56 IST

शहरात नेमके मोकाट श्वान किती, या प्रश्नाचे उत्तर महापालिकेस मागील दोन दशकांत तरी देता आले नाही.

छत्रपती संभाजीनगर : शहरात मोकाट श्वानांचा उच्छाद प्रचंड वाढला आहे. रात्री दुचाकीवर काही भागांत ये-जा करणे अत्यंत अवघड आहे. महापालिका मोकाट श्वानांच्या नसबंदीवर दरवर्षी लाखो रुपये खर्च करीत आहे. मागील वर्षभरात ८२ लाख ४५ हजार ३०० रुपये खर्च करण्यात आल्याची कागदोपत्री नोंद आहे. पण त्यानंतरही मोकाट श्वानांची संख्या वाढतच आहे. नागरिकांना होणारा त्रास काही कमी होत नाही.

शहरात नेमके मोकाट श्वान किती, या प्रश्नाचे उत्तर महापालिकेस मागील दोन दशकांत तरी देता आले नाही. किमान १० वर्षांपासून मोकाट श्वानांच्या नसबंदीचा उपक्रम राबविण्यात येताेय. दर दोन ते तीन वर्षांनी नसबंदी करणाऱ्या संस्था बदलण्यात येतात. सध्या मध्यवर्ती जकात नाका येथे मोकाट श्वान पकडून आणले जातात. याच ठिकाणी नसबंदी केली जाते. खूण म्हणून नसबंदी केलेल्या श्वानाचे कान थोडेसे कापण्यात येतात. एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ पर्यंत ९ हजार ५७८ श्वानांची नसबंदी करण्यात आली. यामध्ये ४ हजार ९१३ नर, ४ हजार ६७४ माद्यांची नसबंदी केली. यावर ८२ लाख रुपये खर्च करण्यात आले.

चार महिन्यांत ९०० जणांवर उपचारमोकाट श्वान चावल्यानंतर लस घेण्यासाठी नागरिकांना घाटी रुग्णालयात जावे लागते. दररोज किमान १० रुग्ण श्वानदंशाचे येतात. चार महिन्यांत किमान ९०० जणांना श्वानांनी चावे घेतले.

या परिसरात सर्वाधिक त्रासपडेगाव, आकाशवाणी, सिल्लेखाना, मध्यवर्ती जकात नाका, सेवन हिल अग्निशमन दल निवासस्थाने, सुराणानगर, नारेगाव इ. भागांत मोकाट श्वानांचा त्रास जास्त आहे.

रोज दहा जणांवर हल्लाशहर आणि परिसरात दररोज किमान १० जणांचे लचके मोकाट श्वान तोडतात. महापालिकेच्या आरोग्य केंद्रांवर श्वान चावल्यावर देण्यात येणारे दोन्ही लस उपलब्ध नसतात. त्यामुळे नागरिकांना घाटीत जावे लागते.

रात्री घराबाहेर पडणे अवघडदुचाकी, चारचाकी वाहनधारकांवर रात्री १२ ते २ या वेळेत श्वान धावून जातात. त्यामुळे अनेकदा अपघातही होतात. रात्री घराबाहेर पडणे अवघड बनले. अलीकडे काही सोसायट्यांपर्यंत मोकाट श्वानांचा त्रास सुरू झाला आहे. मनपाने यासंदर्भात ठोस उपाययोजना करायला हव्यात.- अय्युब खान, नागरिक

रेबीज बाधित घटले२०२१-२२ या आर्थिक वर्षात शहरात एकही रेबीजबाधित नागरिक आढळून आला नाही. पूर्वी दरवर्षी १० ते १७ नागरिकांचा मृत्यू होत होता. मृत्यूचे हे प्रमाण थांबले, ही शहरासाठी समाधानाची बाब म्हणावी लागेल. नसबंदी प्रभावीपणे सुरू आहे.- शाहेद शेख, पशुसंवर्धन अधिकारी, मनपा.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादdogकुत्राAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका