शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

८० वर्षांची आजी रिकामी घागर घेऊन मोर्चात, मुख्यमंत्र्यांनी त्यांनाही भेटावे, फडणवीसांचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 12:03 IST

महाविकास आघाडी सरकारने पाणी योजनांचा बट्ट्याबोळ केल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांची टीका; औरंगाबादेत भाजपचा जलआक्रोश मोर्चा

औरंगाबाद : महाविकास आघाडी सरकारने पाण्याच्या योजनांचा मुडदा पाडला. वैधानिक विकास मंडळ संपविले. मराठवाडा वॉटर ग्रीडची माती केली. दमणगंगेचे पाणी विभागाकडे येणाऱ्या योजनांचा अध्यादेश आमच्या सरकारच्या काळात झाला; परंतु, पुढे या सरकारने काही केले नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे केला. तसेच मुंबईतील फायर आजींच्या घरी जाऊन मुख्यमंत्री भेटले. मग, आज मोर्चात ८० वर्षे असलेल्या आजी रिकामी घागर घेऊन सहभागी झाल्या. या आजींच्या घरीही भेट द्यावी, असे आव्हान फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.

फडणवीस यांच्या नेतृत्वात महापालिकेवर धडकलेल्या जलआक्रोश मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टीकेचे लक्ष्य केले. महापालिका भ्रष्टाचाराचा अड्डा झाल्याचा आरोप करत १६८० कोटी रुपयांची शहर पाणीपुरवठा योजना महाविकास आघाडी सरकारच्या वाटाघाटींमुळे पुढील २५ वर्षेदेखील पूर्ण होणार नाही, अशी टीका फडणवीस यांनी यावेळी केली. भाजपने २०१३ नंतर प्रथमच स्वबळावर मोर्चा काढून शिवसेनेच्या गडात धुरळा उडविला. पैठण गेटपासून महापालिकेपर्यंत काढण्यात आलेल्या मोर्चात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, आ. गिरीश महाजन, आ. अतुल सावे यांच्यासह हजारो नागरिकांचा सहभाग होता.

पहिल्यांदाच भाजपचा महापालिकेवर मोर्चाशिवसेनेसोबत ३० वर्षांचा सत्तेच्या वाटाघाटी २०१९ मध्ये फिसकटल्या. दोन वर्षांपासून शिवसेना आणि भाजपत महापालिकेच्या राजकारणावरून कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरू असून सोमवारी भाजपाने शिवसेनेच्या गडात पूर्ण ताकदीने धुराळा उडवित जोरदार जलआक्रोश मोर्चा काढला. यापूर्वी विभागीय पातळीवरून गर्दी करण्याचे नियोजन केले जात असे, परंतु यावेळी शहरातील संघटनेवरच मोर्चा काढून भाजपाने स्वबळ आजमावले. २०१३ साली भाजपने लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढला होता. त्यानंतर ९ वर्षांनी भाजपाने मनपातील सत्ता परिवर्तनासाठी मोर्चातून रणशिंग फुंकले.

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड यांचे नियोजनमोर्चासाठी पूर्ण ताकद केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी लावली. गेल्या आठवडाभर ते मोर्चाच्या नियोजनासाठी शहरात होते. तसेच काही वॉर्डांमध्ये जाऊन त्यांनी बैठका घेत पाणीपुरवठ्याची समस्या जाणून घेतली. नागरिकांनी मोर्चात येण्याचे आवाहनही त्यांनी केले. निमित्ताने भाजपला साम, दाम, दंड, भेद या नीतीने मैदानात उतरण्याची संधी मिळाली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेwater scarcityपाणी टंचाई