शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
3
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
4
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
5
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
6
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
7
“मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है”; CM एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
8
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
9
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
10
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
11
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंना डच्चू?
12
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
13
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
14
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
15
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
16
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
17
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
18
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
19
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
20
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता

औरंगाबाद जिल्ह्यात एसटी करणार ८ हजार वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 3:17 PM

जिल्ह्यातील प्रत्येक आगार आणि बसस्थानक परिसरात जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे उद्दिष्ट ५ हजार ८०० दिले असले तरी ८ हजार वृक्षांची लागवड केली जाणार आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यातील प्रत्येक आगार आणि बसस्थानक परिसरात जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने वृक्षारोपण करण्यात येणार आहे. उद्दिष्ट ५ हजार ८०० दिले असले तरी ८ हजार वृक्षांची लागवड केली जाणार आहे. तसेच लागवड केलेल्या वृक्षांच्या संवर्धनाची जबाबदारी आगार प्रमुख वा बसस्थानक व्यवस्थापकांना देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने राज्यभर ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. उद्दिष्टपूर्तीसाठी विविध प्रशासकीय विभागांसह स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाणार आहे. प्रत्येक जिल्हा आणि विभागनिहाय वृक्ष लागवड केली जाणार आहे. त्यानुसार राज्य परिवहन महामंडळाच्या औरंगाबाद विभागाला ६ हजार ८०० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. औरंगाबाद  विभागांतर्गत ८ आगार येतात. या आगारांसह प्रमुख बसस्थानक व छोट्या मोठ्या बसस्थानकांवर वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. यानुसार प्रत्येक आगाराला एक हजार वृक्ष लागवडीचे व संवर्धनाचे उद्दिष्ट विभागामार्फत देण्यात आले आहे. या आगारांतर्गत येणारे बसस्थानक व छोटे मोठे स्थानक येथे वृक्ष लागवड करण्याचे आदेश आगार प्रमुखांना देण्यात आले आहेत.

यादृष्टीने आगार प्रमुखांना नियोजन करण्यास सांगण्यात आले असून, दरवर्षी एकाच खड्ड्यात वृक्ष लागवड करण्याची संस्कृती मोडीत काढून या वृक्षांच्या संवर्धनाची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार केवळ वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले नाही. लागवड केलेल्या वृक्षांचे संवर्धन केले जाणार आहे. 

आगारात उद्यानाची संकल्पना आहे

लागवड केलेल्या वृक्षांच्या संवर्धन करण्यासह ज्या आगारात जागा उपलब्ध असेल तेथे उद्यानाची संकल्पना आहे. यातून केवळ जनजागृतीच नव्हे तर पर्यावरण संवर्धनही होऊ शकणार आहे. त्याचप्रमाणे आगामी काळात आयएसओ ९००२ मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. याचे निकष पूर्ण करण्याच्या दिशेने काम सुरू केले आहे. - प्रशांत भुसारी, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, औरंगाबाद.

टॅग्स :state transportएसटीenvironmentपर्यावरणAurangabadऔरंगाबाद