शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

मराठवाड्यातील २९५८ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 23:19 IST

औरंगाबाद : मराठवाड्यातील खरीप हंगामाची पैसेवारी विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी जाहीर केली आहे. त्यांनी शासनाच्या मदत व पुनर्वसन ...

ठळक मुद्देआणेवारी जाहीर : औरंगाबाद, जालना, बीडमधील २१ लाख हेक्टवरील खरीप हंगामाचे दिवाळे

औरंगाबाद : मराठवाड्यातील खरीप हंगामाची पैसेवारी विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी जाहीर केली आहे. त्यांनी शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाकडे पाठविलेल्या अहवालात ८ हजार ५३३ पैकी २९५८ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असल्याचे म्हटले आहे. ५ हजार ५७५ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त असल्याचे अहवालात म्हटले आहे. यंदा मराठवाड्यात फक्त ६३ टक्के पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामातील उत्पादकता निम्म्यावर आली आहे.औरंगाबाद जिल्ह्यातील १३५५ पैकी १३३५ गावांतील खरीप हंगामाचे पावसाअभावी दिवाळे निघाले आहे. त्या गावांतील आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी आली आहे. याचा अर्थ त्या गावांतील पिकांची उत्पादकता ५० टक्क्यांहून कमी होणार आहे. त्यानंतर जालना जिल्ह्यातील ९७१ पैकी ९५२ गावांतील खरीप हंगामाची आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी आली आहे. बीड जिल्ह्यातील १४०२ गावांपैकी ६७१ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आली आहे. ७३१ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त आहे. परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांतील सर्व गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त असल्याचे आयुक्तांनी शासनाला पाठविलेल्या अहवालात म्हटले आहे. ३० सप्टेंबर रोजी पावसाळा संपतो. त्या धर्तीवर विभागातील प्रत्येक जिल्ह्यातून आयुक्तांनी खरीप हंगामाच्या परिस्थितीचा नजर आणेवारीचा अहवाल मागविला.विभागात ५० लाख हेक्टरवर खरीप पेरणीयंदाच्या खरीप हंगामात विभागामध्ये सुमारे ५० लाख हेक्टरवर पेरणी झाली. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात ६ लाख ९९ हजार हेक्टर, जालना जिल्ह्यात ६ लाख ३६ हजार हेक्टर, बीड जिल्ह्यात ७ लाख ९८ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. या तिन्ही जिल्ह्यांपैकी औरंगाबाद आणि जालन्यातील खरीप हंगाम पावसाअभावी १०० टक्के होरपळला आहे. २१ लाख हेक्टरवरील खरीप हंगाम पावसाअभावी पाहिजे त्या प्रमाणात शेतकऱ्यांना लाभ देणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील १०७, वडवणी ४९, शिरूर कासार ९५, गेवराई १९२, माजलगाव १२१ तर परळी तालुक्यातील १०७ गावांतील आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे. जालना जिल्ह्यातील जालना तालुका १३२, बदनापूर ९२, भोकरदन १५७, जाफ्राबाद १०१, परतूर ९७, मंठा ११७, अंबड १३८, घनसावंगी तालुक्यातील ११८ गावांतील हंगाम पावसाअभावी संपला. तर औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील ८४ गावे, कन्नड २०२, सिल्लोड १३२, खुलताबाद ७६, गंगापूर २२२, वैजापूर १६४, फुलंब्री ९१, पैठण १९१, औरंगाबाद तालुक्यातील १५३ गावे आणि अतिरिक्त ४० गावांतील हंगाम ५० पैशांपेक्षा खाली आला आहे.४ हजार कोटींहून अधिक गुंतवणूकऔरंगाबाद, जालना, बीड या जिल्ह्यांतील शेतकºयांनी खरीप हंगामासाठी अंदाजे ४ हजार कोटींहून अधिक गुंतवणूक नांगरणी, पेरणी, मजुरी, बियाणे व खत खरेदीसाठी केली होती. सरासरी २१ लाख हेक्टरच्या तुलनेत हेक्टरी २० हजारांचा खर्च गृहीत धरला तरी ४ हजार कोटींहून अधिक केलेल्या गुंतवणुकीतून शेतकºयांना काहीही हाती लागणार नाही हे स्पष्ट आहे. आता सरकार काय मदत करणार त्याकडे लक्ष आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीdroughtदुष्काळ