शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

११६ किमीचे ७२ नाले, १०० मजूर अन् ४३ दिवस शिल्लक! पावसाळ्यापूर्वी होणार का सफाई?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 19:58 IST

शहरातील दहा मोठ्या नाल्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. नाल्यांमध्ये प्रचंड गाळ, केरकचरा आणि नाल्यांवर झालेल्या मोठमोठ्या अतिक्रमणांनी पाण्याचा नैसर्गिक प्रवाहच बंद झाला आहे.

छत्रपती संभाजीनगर : शहरात लहान-मोठे मिळून तब्बल ७२ नाले असून, त्यांची लांबी ११६ किलोमीटर आहे. १०० मजुरांसह ९ जेसीबींच्या साह्याने ४३ दिवसांत नालेसफाईचे शिवधनुष्य मनपा उचलणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यंदाही पावसाळ्यात नागरिकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागणार, हे एखाद्या मोठ्या पावसात समोर येईल. मेअखेरपर्यंत कामे पूर्ण होतील, असा दावाच अधिकाऱ्यांनी केला. त्यामुळे नाले थातूरमातूर स्वरूपात तर स्वच्छ होणार नाहीत ना, अशी शंका आहे. कारण सफाईची पाहणी करण्यासाठी महापालिकेत ‘कारभारी’ही नाहीत.

नालेसफाईतील खाबूगिरी तत्कालीन आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी संपविली. त्यामुळे कोट्यवधींच्या उधळपट्टीला ब्रेक लागला. यंदाही मनपाकडून साफसफाई सुरू करण्यात आली. ज्या पद्धतीने नाले सफाई करायला हवी, त्या पद्धतीने होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. नाल्याच्या दर्शनी भागातील केरकचरा काढण्यात येतो. नाल्यातील एक इंचही गाळ काढण्यात येत नाही. गाळ काढण्यासाठी कोट्यवधी रुपये लागतील, असा दावा प्रशासनाकडून दरवर्षी करण्यात येतो. शहरात मोठा पाऊस झाल्यास उखळ नाल्यांमुळे सखल भागात हाहाकार उडतो. यापूर्वी अनेकदा मोठा पाऊस झाल्यावर शहराची अवस्था मुंबईप्रमाणे झाली होती. शहरातील दहा मोठ्या नाल्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. नाल्यांमध्ये प्रचंड गाळ, केरकचरा आणि नाल्यांवर झालेल्या मोठमोठ्या अतिक्रमणांनी पाण्याचा नैसर्गिक प्रवाहच बंद झाला आहे.

इमारती, अतिक्रमणेशहरातील विविध नाल्यांवर खासगी संस्था, बँकांना १५ ठिकाणी इमारती उभारण्यात आल्या आहेत. याशिवाय अतिक्रमणेही शेकडोंच्या संख्येने आहेत. ही अतिक्रमणे काढण्याची हिम्मत प्रशासनाने कधीच दाखवली नाही. कारण यामागेही अनेकदा राजकारण आडवे येते. इमारत मालकांनीच त्यांच्या नाल्याखालील गाळ काढावा, अशी अट टाकण्यात आलेली आहे. मात्र, काही वर्षांत एकाही इमारत मालकाने नाला साफ केला नाही. त्यामुळे काही इमारतीखालून पाणी वाहणेच बंद आहे. पावसाळ्यात दलालवाडी व पैठणगेट परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरते.

३० टक्के काम झाल्याचा दावामे महिन्यातच नालेसफाईची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. आठ दिवसांपूर्वी कामे सुरू करण्यात आली आहेत. आतापर्यंत ३० टक्के काम झाल्याचा दावा वॉर्ड अभियंत्यांनी बैठकीत केला. प्रत्येक प्रभागासाठी एक जेसीबी देण्यात आला आहे. ज्या नाल्यात जेसीबी जाऊ शकत नाही, अशा ठिकाणी मजुरांमार्फत कामे सुरू आहेत. सुमारे शंभर मजूर आहेत. शहरात ७२ नाले आहेत. पैकी मोठ्या नाल्यांची संख्या १८ आहे. सोमवारी शहर अभियंता ए. बी. देखमुख यांनी नालेसफाईचा आढावा घेतला.

तर पैशांची मोठी बचत होईल नालेसफाईचे ‘मॅनेजमेंट’ परिपूर्ण पाहिजे. कामात अळंटळं नको, ऊन खूप असल्याने सकाळी ६ ते ११ आणि दुपारी ४ ते ७ या वेळेत काम करावे. शहरात ७२ नाले असले, तरी मोठे नाले खूप कमी आहेत. आतील कचरा, गाळ गाठून तो लवकर उचलला पाहिजे. मान्सूनपूर्वी काम होईल. अनेक ठिकाणी चांगले काम सुरू असून, पैशांची मोठी बचत होईल.- सी. एस. सोनी, निवृत्त शहर अभियंता, मनपा.

मे अखेर सफाई पूर्ण 

मी अखेरपर्यंत काम संपविण्याचे नियोजन आहे. मनपा ही कामे करीत असल्याने ३ ते ४ कोटींची बचत होत आहे. कंत्राटीच्या तुलनेत हे काम अधिक चांगले होत आहे. मागील वर्षी कुटेही सखल भागात पाणी शिरल्याची तक्रार नव्हती.- बी. डी. फड, कार्यकारी अभियंता

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाRainपाऊस