शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
2
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
3
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
4
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
5
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
6
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
7
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
8
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
9
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
10
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
11
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
12
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
13
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
14
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
15
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
16
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
17
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
18
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
19
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
20
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
Daily Top 2Weekly Top 5

तंत्रनिकेतन महाविद्यालयात पहिल्या फेरीतच ७१ हजार जागा रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 23:53 IST

राज्यातील तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीतील प्रवेशाला बुधवारपासून सुरुवात झाली. पहिल्या यादीमध्ये अवघ्या ४३ हजार ७५४ विद्यार्थ्यांचा समावेश असून, त्यामुळे तब्बल ७१ हजार ८१ जागा रिक्त राहिल्या आहेत. राज्यातील एकूण तंत्रनिकेतन महाविद्यालयांमध्ये १ लाख १४ हजार ६५५ जागा उपलब्ध आहेत.

ठळक मुद्देमिशन अ‍ॅडमिशन : ४३ हजार ७५४ विद्यार्थी गुणवत्ता यादीत; रिक्त जागांची टक्केवारी ६२ टक्के

औरंगाबाद : राज्यातील तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीतील प्रवेशाला बुधवारपासून सुरुवात झाली. पहिल्या यादीमध्ये अवघ्या ४३ हजार ७५४ विद्यार्थ्यांचा समावेश असून, त्यामुळे तब्बल ७१ हजार ८१ जागा रिक्त राहिल्या आहेत. राज्यातील एकूण तंत्रनिकेतन महाविद्यालयांमध्ये १ लाख १४ हजार ६५५ जागा उपलब्ध आहेत.मागील ३ वर्षांपासून तंत्रनिकेतन महाविद्यालयांना घरघर लागली आहे. यावर्षी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आली. या फेरीतील प्रवेशाला बुधवारपासून सुरुवात झाली आहे. राज्यातील एकूण तंत्रनिकेतन महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी ५३ हजार ३९४ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले होते. यातील ४३ हजार ७५४ विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत महाविद्यालय बहाल केले आहे. त्यामुळे उपलब्ध जागेच्या ६२ टक्के जागा पहिल्या फेरीअखेर रिक्त राहिल्या आहेत. या फेरीतील प्रवेशाची मुदत संपल्यानंतर हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील ४३ शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयांत २० हजार २०६ जागा आहेत. यापैकी पहिल्या फेरीत १३ हजार ४४९ जागांवर विद्यार्थी अलॉट केले आहेत. यात ६ हजार ७५७ जागा रिक्त राहिल्या आहेत. अनुदानित तंत्रनिकेतन महाविद्यालयांमध्ये २ हजार ७८५ जागा असून, त्यात १ हजार ८३७ विद्यार्थी अलॉट केल्याची माहिती सूत्रांनी दिली. अनुदानितमध्ये ९४८ जागा रिक्त आहेत. खाजगी तंत्रनिकेतन महाविद्यालयांमध्ये ९१ हजार ११२ जागा उपलब्ध आहेत. यापैकी अवघ्या २७ हजार ९८७ जागांवर विद्यार्थी दिले आहेत. खाजगी तंत्रनिकेतनमध्ये रिक्त जागांचा आकडा ६३ हजार १२५ एवढा असून, टक्केवारीमध्ये हा आकडा ६९.२८ टक्के आहे. पहिल्या गुणवत्ता फेरीत स्थान मिळालेल्या विद्यार्थ्यांना १९ जुलैपर्यंत प्रवेशनिश्चिती करावी लागणार आहे. उपलब्ध जागा आणि प्रवेश होणाऱ्या जागांमध्ये तब्बल ७० हजारपेक्षा अधिकची तफावत राहण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducationशिक्षण