शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

तंत्रनिकेतन महाविद्यालयात पहिल्या फेरीतच ७१ हजार जागा रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 23:53 IST

राज्यातील तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीतील प्रवेशाला बुधवारपासून सुरुवात झाली. पहिल्या यादीमध्ये अवघ्या ४३ हजार ७५४ विद्यार्थ्यांचा समावेश असून, त्यामुळे तब्बल ७१ हजार ८१ जागा रिक्त राहिल्या आहेत. राज्यातील एकूण तंत्रनिकेतन महाविद्यालयांमध्ये १ लाख १४ हजार ६५५ जागा उपलब्ध आहेत.

ठळक मुद्देमिशन अ‍ॅडमिशन : ४३ हजार ७५४ विद्यार्थी गुणवत्ता यादीत; रिक्त जागांची टक्केवारी ६२ टक्के

औरंगाबाद : राज्यातील तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीतील प्रवेशाला बुधवारपासून सुरुवात झाली. पहिल्या यादीमध्ये अवघ्या ४३ हजार ७५४ विद्यार्थ्यांचा समावेश असून, त्यामुळे तब्बल ७१ हजार ८१ जागा रिक्त राहिल्या आहेत. राज्यातील एकूण तंत्रनिकेतन महाविद्यालयांमध्ये १ लाख १४ हजार ६५५ जागा उपलब्ध आहेत.मागील ३ वर्षांपासून तंत्रनिकेतन महाविद्यालयांना घरघर लागली आहे. यावर्षी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आली. या फेरीतील प्रवेशाला बुधवारपासून सुरुवात झाली आहे. राज्यातील एकूण तंत्रनिकेतन महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी ५३ हजार ३९४ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले होते. यातील ४३ हजार ७५४ विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत महाविद्यालय बहाल केले आहे. त्यामुळे उपलब्ध जागेच्या ६२ टक्के जागा पहिल्या फेरीअखेर रिक्त राहिल्या आहेत. या फेरीतील प्रवेशाची मुदत संपल्यानंतर हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील ४३ शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयांत २० हजार २०६ जागा आहेत. यापैकी पहिल्या फेरीत १३ हजार ४४९ जागांवर विद्यार्थी अलॉट केले आहेत. यात ६ हजार ७५७ जागा रिक्त राहिल्या आहेत. अनुदानित तंत्रनिकेतन महाविद्यालयांमध्ये २ हजार ७८५ जागा असून, त्यात १ हजार ८३७ विद्यार्थी अलॉट केल्याची माहिती सूत्रांनी दिली. अनुदानितमध्ये ९४८ जागा रिक्त आहेत. खाजगी तंत्रनिकेतन महाविद्यालयांमध्ये ९१ हजार ११२ जागा उपलब्ध आहेत. यापैकी अवघ्या २७ हजार ९८७ जागांवर विद्यार्थी दिले आहेत. खाजगी तंत्रनिकेतनमध्ये रिक्त जागांचा आकडा ६३ हजार १२५ एवढा असून, टक्केवारीमध्ये हा आकडा ६९.२८ टक्के आहे. पहिल्या गुणवत्ता फेरीत स्थान मिळालेल्या विद्यार्थ्यांना १९ जुलैपर्यंत प्रवेशनिश्चिती करावी लागणार आहे. उपलब्ध जागा आणि प्रवेश होणाऱ्या जागांमध्ये तब्बल ७० हजारपेक्षा अधिकची तफावत राहण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducationशिक्षण