शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

तंत्रनिकेतन महाविद्यालयात पहिल्या फेरीतच ७१ हजार जागा रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 23:53 IST

राज्यातील तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीतील प्रवेशाला बुधवारपासून सुरुवात झाली. पहिल्या यादीमध्ये अवघ्या ४३ हजार ७५४ विद्यार्थ्यांचा समावेश असून, त्यामुळे तब्बल ७१ हजार ८१ जागा रिक्त राहिल्या आहेत. राज्यातील एकूण तंत्रनिकेतन महाविद्यालयांमध्ये १ लाख १४ हजार ६५५ जागा उपलब्ध आहेत.

ठळक मुद्देमिशन अ‍ॅडमिशन : ४३ हजार ७५४ विद्यार्थी गुणवत्ता यादीत; रिक्त जागांची टक्केवारी ६२ टक्के

औरंगाबाद : राज्यातील तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीतील प्रवेशाला बुधवारपासून सुरुवात झाली. पहिल्या यादीमध्ये अवघ्या ४३ हजार ७५४ विद्यार्थ्यांचा समावेश असून, त्यामुळे तब्बल ७१ हजार ८१ जागा रिक्त राहिल्या आहेत. राज्यातील एकूण तंत्रनिकेतन महाविद्यालयांमध्ये १ लाख १४ हजार ६५५ जागा उपलब्ध आहेत.मागील ३ वर्षांपासून तंत्रनिकेतन महाविद्यालयांना घरघर लागली आहे. यावर्षी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आली. या फेरीतील प्रवेशाला बुधवारपासून सुरुवात झाली आहे. राज्यातील एकूण तंत्रनिकेतन महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी ५३ हजार ३९४ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले होते. यातील ४३ हजार ७५४ विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत महाविद्यालय बहाल केले आहे. त्यामुळे उपलब्ध जागेच्या ६२ टक्के जागा पहिल्या फेरीअखेर रिक्त राहिल्या आहेत. या फेरीतील प्रवेशाची मुदत संपल्यानंतर हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील ४३ शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयांत २० हजार २०६ जागा आहेत. यापैकी पहिल्या फेरीत १३ हजार ४४९ जागांवर विद्यार्थी अलॉट केले आहेत. यात ६ हजार ७५७ जागा रिक्त राहिल्या आहेत. अनुदानित तंत्रनिकेतन महाविद्यालयांमध्ये २ हजार ७८५ जागा असून, त्यात १ हजार ८३७ विद्यार्थी अलॉट केल्याची माहिती सूत्रांनी दिली. अनुदानितमध्ये ९४८ जागा रिक्त आहेत. खाजगी तंत्रनिकेतन महाविद्यालयांमध्ये ९१ हजार ११२ जागा उपलब्ध आहेत. यापैकी अवघ्या २७ हजार ९८७ जागांवर विद्यार्थी दिले आहेत. खाजगी तंत्रनिकेतनमध्ये रिक्त जागांचा आकडा ६३ हजार १२५ एवढा असून, टक्केवारीमध्ये हा आकडा ६९.२८ टक्के आहे. पहिल्या गुणवत्ता फेरीत स्थान मिळालेल्या विद्यार्थ्यांना १९ जुलैपर्यंत प्रवेशनिश्चिती करावी लागणार आहे. उपलब्ध जागा आणि प्रवेश होणाऱ्या जागांमध्ये तब्बल ७० हजारपेक्षा अधिकची तफावत राहण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducationशिक्षण