शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
3
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
4
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
5
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
6
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
7
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
8
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
9
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
10
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
11
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
12
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
13
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
14
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
15
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
16
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
17
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
18
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
19
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
20
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला

औरंगाबाद जिल्ह्यातील ७०० अंगणवाड्या भरतात इमारतीविनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 19:12 IST

शोध घेऊनही जागा मिळत नाही, जागा मिळालीच, तर हस्तांतरणाची डोकेदुखी कायम असल्याने जिल्ह्यातील तब्बल ७०० अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत उभारता आलेली नाही.

औरंगाबाद : शोध घेऊनही जागा मिळत नाही, जागा मिळालीच, तर हस्तांतरणाची डोकेदुखी कायम असल्याने जिल्ह्यातील तब्बल ७०० अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत उभारता आलेली नाही. त्यामुळे या अंगणवाड्यांना भाड्याच्या जागेत, ग्रामपंचायत कार्यालय परिसरात, जि.प. शाळांच्या व्हरांड्यात चालतात. विशेष म्हणजे, यापैकी ८२ अंगणवाड्या तर कुठे पारावर- मंदिरात भरवल्या जात आहेत.

अंगणवाड्यांच्या माध्यमातून ६ वर्षांपर्यंत बालकांना लसीकरण, पोषण आहार, आरोग्याच्या संदर्भ सेवा तसेच पूर्व प्राथमिक शिक्षण व बालसंस्काराचे धडे दिले जातात. अलीकडे तीव्र कुपोषित बालकांसाठी अंगणवाड्यांमध्ये ग्राम बालविकास केंद्र सुरू करण्यात आलेले आहेत. जवळपास ६०० अंगणवाड्यांमध्ये या केंद्रांच्या माध्यमातून बालकांना दर्जेदार पोषण आहार दिला जातो. त्यांच्यावर अंगणवाडी कार्यकर्ती- मदतनिसांच्या निगराणीत आरोग्य सेवा दिली जाते. आपल्या दर्जेदार सेवेच्या माध्यमातून जिल्ह्यात ११०० अंगणवाड्यांनी ‘आयएसओ’ मानांकनही पटकावले आहे, तर ८०० अंगणवाड्या अलीकडच्या काळात ‘स्मार्ट’ झाल्या आहेत. मात्र, असे असले तरी अजूनही ७०० अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत नसल्यामुळे त्यांची घुसमट चालू आहे. दुसरीकडे, औरंगाबाद तालुक्यातील ३०, कन्नड तालुक्यातील ४, सिल्लोड तालुक्यातील १०, गंगापूर तालुक्यातील ४, पैठण तालुक्यातील १०, फुलंब्री तालुक्यातील २१ आणि खुलताबाद तालुक्यातील ३ अशा ८२ अंगणवाड्या चक्क उघड्यावर भरतात.

यासंदर्भात जि.प.च्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले यांनी सांगितले की, निधी उपलब्ध असला तरी निर्विवाद जागेअभावी अंगणवाड्यांना इमारत बांधण्यास अडचणी येत आहेत. जिल्हा नियोजन समितीकडून सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात २ कोटी, तर २०१८-१९ मध्ये ३ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. या निधीतून २ कोटी ५० लाख रुपये नवीन इमारत बांधकामावर खर्च करण्याचे निर्देश आहेत. सध्या या दोन्ही आर्थिक वर्षात ५६ अंगणवाड्यांसाठी निर्विवाद जागा मिळाल्या आहेत. त्याठिकाणी लवकरच इमारत बांधकाम करण्यात येणार आहे. डिसेंबरअखेरपर्यंत आणखी निधी प्राप्त होणार आहे, असेही मिरकले यांनी सांगितले. 

धोकादायक अंगणवाडीजिल्ह्यात अनेक अंगणवाड्या मोडकळीस आलेल्या आहेत. काही अंगणवाड्यांच्या छताचे पोपडे कोसळले आहेत, तर काही अंगणवाड्यांच्या भिंती, फरशा खचल्या आहेत. यापैकी खुलताबाद तालुक्यातील गंदेश्वर येथील अंगणवाडी तर अगदी विहिरीच्या कडेवरच उभारण्यात आलेली आहे. सध्या या अंगणवाडीच्या फरशा पोखरलेल्या असल्याची बाब जि.प. सदस्य एल. जी. गायकवाड यांना भेटीच्यावेळी निदर्शनास. त्या अंगणवाडीला सध्या कुलूप लावण्यात आले असून स्ट्रक्चर आॅडिटनंतर ती पाडण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थीAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद