शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

औरंगाबाद जिल्ह्यातील ७०० अंगणवाड्या भरतात इमारतीविनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 19:12 IST

शोध घेऊनही जागा मिळत नाही, जागा मिळालीच, तर हस्तांतरणाची डोकेदुखी कायम असल्याने जिल्ह्यातील तब्बल ७०० अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत उभारता आलेली नाही.

औरंगाबाद : शोध घेऊनही जागा मिळत नाही, जागा मिळालीच, तर हस्तांतरणाची डोकेदुखी कायम असल्याने जिल्ह्यातील तब्बल ७०० अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत उभारता आलेली नाही. त्यामुळे या अंगणवाड्यांना भाड्याच्या जागेत, ग्रामपंचायत कार्यालय परिसरात, जि.प. शाळांच्या व्हरांड्यात चालतात. विशेष म्हणजे, यापैकी ८२ अंगणवाड्या तर कुठे पारावर- मंदिरात भरवल्या जात आहेत.

अंगणवाड्यांच्या माध्यमातून ६ वर्षांपर्यंत बालकांना लसीकरण, पोषण आहार, आरोग्याच्या संदर्भ सेवा तसेच पूर्व प्राथमिक शिक्षण व बालसंस्काराचे धडे दिले जातात. अलीकडे तीव्र कुपोषित बालकांसाठी अंगणवाड्यांमध्ये ग्राम बालविकास केंद्र सुरू करण्यात आलेले आहेत. जवळपास ६०० अंगणवाड्यांमध्ये या केंद्रांच्या माध्यमातून बालकांना दर्जेदार पोषण आहार दिला जातो. त्यांच्यावर अंगणवाडी कार्यकर्ती- मदतनिसांच्या निगराणीत आरोग्य सेवा दिली जाते. आपल्या दर्जेदार सेवेच्या माध्यमातून जिल्ह्यात ११०० अंगणवाड्यांनी ‘आयएसओ’ मानांकनही पटकावले आहे, तर ८०० अंगणवाड्या अलीकडच्या काळात ‘स्मार्ट’ झाल्या आहेत. मात्र, असे असले तरी अजूनही ७०० अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत नसल्यामुळे त्यांची घुसमट चालू आहे. दुसरीकडे, औरंगाबाद तालुक्यातील ३०, कन्नड तालुक्यातील ४, सिल्लोड तालुक्यातील १०, गंगापूर तालुक्यातील ४, पैठण तालुक्यातील १०, फुलंब्री तालुक्यातील २१ आणि खुलताबाद तालुक्यातील ३ अशा ८२ अंगणवाड्या चक्क उघड्यावर भरतात.

यासंदर्भात जि.प.च्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले यांनी सांगितले की, निधी उपलब्ध असला तरी निर्विवाद जागेअभावी अंगणवाड्यांना इमारत बांधण्यास अडचणी येत आहेत. जिल्हा नियोजन समितीकडून सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात २ कोटी, तर २०१८-१९ मध्ये ३ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. या निधीतून २ कोटी ५० लाख रुपये नवीन इमारत बांधकामावर खर्च करण्याचे निर्देश आहेत. सध्या या दोन्ही आर्थिक वर्षात ५६ अंगणवाड्यांसाठी निर्विवाद जागा मिळाल्या आहेत. त्याठिकाणी लवकरच इमारत बांधकाम करण्यात येणार आहे. डिसेंबरअखेरपर्यंत आणखी निधी प्राप्त होणार आहे, असेही मिरकले यांनी सांगितले. 

धोकादायक अंगणवाडीजिल्ह्यात अनेक अंगणवाड्या मोडकळीस आलेल्या आहेत. काही अंगणवाड्यांच्या छताचे पोपडे कोसळले आहेत, तर काही अंगणवाड्यांच्या भिंती, फरशा खचल्या आहेत. यापैकी खुलताबाद तालुक्यातील गंदेश्वर येथील अंगणवाडी तर अगदी विहिरीच्या कडेवरच उभारण्यात आलेली आहे. सध्या या अंगणवाडीच्या फरशा पोखरलेल्या असल्याची बाब जि.प. सदस्य एल. जी. गायकवाड यांना भेटीच्यावेळी निदर्शनास. त्या अंगणवाडीला सध्या कुलूप लावण्यात आले असून स्ट्रक्चर आॅडिटनंतर ती पाडण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थीAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद