शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

मराठवाड्यातील ५११ गावांना ६४६ टँकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 00:58 IST

मराठवाड्यातील सुमारे १० लाख ग्रामस्थांची तहान टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. ५११ गावांमध्ये ६४६ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

ठळक मुद्देटंचाई : मराठवाड्यातील १0 लाख ग्रामस्थ तहानलेले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाड्यातील सुमारे १० लाख ग्रामस्थांची तहान टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. ५११ गावांमध्ये ६४६ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात ५५६ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. या आठवड्यात ९० टँकर आणि ६० गावे टंचाईच्या रेट्याखाली आली आहेत. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वाधिक ३७७ गावे, ४४ वाड्यांना ४५३ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. ४०६ विहिरी पाणीपुरवठ्यासाठी प्रशासनाने अधिग्रहित केल्या आहेत. जिल्ह्यातील अंदाजे ६ लाख ग्रामस्थांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. २०१६ च्या एप्रिल अखेरीस ६०० टँकर औरंगाबादेत सुरू होते. त्यातून ९ लाख लोकांना पिण्याचे पाणी पुरविले जात होते.मे महिन्यात पारा ४२ डिग्री सेल्सिअसच्या आसपास पोहोचला आहे, त्यामुळे विभागातील सुमारे ५११ गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. ही गावे टंचाईग्रस्त असल्यामुळे तेथे टँकरशिवाय पाणीपुरवठा करणे शक्य नाही. टँकरशिवाय ग्रामस्थांना पाणीपुरवठ्याचा इतर कोणताही पर्याय नाही. टँकरच्या वेळा निश्चित नसल्यामुळे दिवसभर ग्रामस्थांना टँकर येण्याची वाट पाहावी लागते. नियमित पावसाळा जूनमध्ये सुरू झाला तरी जूनअखेरपर्यंत टँकरचे नियोजन प्रशासनाने केले आहे.उस्मानाबाद जिल्ह्यासाठी यंदाचा उन्हाळा पहिल्यांदाच टँकरमुक्त चालला आहे. नांदेड, परभणी, हिंगोली, जालना आणि औरंगाबाद या पाच जिल्ह्यांत गेल्या वर्षी सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला. त्यामुळे सुमारे ३२ तालुक्यांमध्ये पाणीटंचाईची समस्या जाणवत आहे.मराठवाड्यातीलटँकर पाणीपुरवठाजिल्हा गावे टँकरऔरंगाबाद ३७७ ४५३जालना ५३ ६१परभणी २० २६हिंगोली १३ १२नांदेड ४१ ८६बीड ०६ ०७लातूर ०१ ०१उस्मानाबाद ०० ००एकूण ५११ ६४६

टॅग्स :water shortageपाणीकपातMarathwadaमराठवाडाwater scarcityपाणी टंचाईwater transportजलवाहतूक