शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील ५११ गावांना ६४६ टँकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 00:58 IST

मराठवाड्यातील सुमारे १० लाख ग्रामस्थांची तहान टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. ५११ गावांमध्ये ६४६ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

ठळक मुद्देटंचाई : मराठवाड्यातील १0 लाख ग्रामस्थ तहानलेले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाड्यातील सुमारे १० लाख ग्रामस्थांची तहान टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. ५११ गावांमध्ये ६४६ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात ५५६ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. या आठवड्यात ९० टँकर आणि ६० गावे टंचाईच्या रेट्याखाली आली आहेत. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वाधिक ३७७ गावे, ४४ वाड्यांना ४५३ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. ४०६ विहिरी पाणीपुरवठ्यासाठी प्रशासनाने अधिग्रहित केल्या आहेत. जिल्ह्यातील अंदाजे ६ लाख ग्रामस्थांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. २०१६ च्या एप्रिल अखेरीस ६०० टँकर औरंगाबादेत सुरू होते. त्यातून ९ लाख लोकांना पिण्याचे पाणी पुरविले जात होते.मे महिन्यात पारा ४२ डिग्री सेल्सिअसच्या आसपास पोहोचला आहे, त्यामुळे विभागातील सुमारे ५११ गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. ही गावे टंचाईग्रस्त असल्यामुळे तेथे टँकरशिवाय पाणीपुरवठा करणे शक्य नाही. टँकरशिवाय ग्रामस्थांना पाणीपुरवठ्याचा इतर कोणताही पर्याय नाही. टँकरच्या वेळा निश्चित नसल्यामुळे दिवसभर ग्रामस्थांना टँकर येण्याची वाट पाहावी लागते. नियमित पावसाळा जूनमध्ये सुरू झाला तरी जूनअखेरपर्यंत टँकरचे नियोजन प्रशासनाने केले आहे.उस्मानाबाद जिल्ह्यासाठी यंदाचा उन्हाळा पहिल्यांदाच टँकरमुक्त चालला आहे. नांदेड, परभणी, हिंगोली, जालना आणि औरंगाबाद या पाच जिल्ह्यांत गेल्या वर्षी सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला. त्यामुळे सुमारे ३२ तालुक्यांमध्ये पाणीटंचाईची समस्या जाणवत आहे.मराठवाड्यातीलटँकर पाणीपुरवठाजिल्हा गावे टँकरऔरंगाबाद ३७७ ४५३जालना ५३ ६१परभणी २० २६हिंगोली १३ १२नांदेड ४१ ८६बीड ०६ ०७लातूर ०१ ०१उस्मानाबाद ०० ००एकूण ५११ ६४६

टॅग्स :water shortageपाणीकपातMarathwadaमराठवाडाwater scarcityपाणी टंचाईwater transportजलवाहतूक