शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सावकारी कर्जाचा विळखा; मराठवाड्यात ८ महिन्यांत ६२६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 13:10 IST

पीककर्ज वेळेत मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी सावकारांकडून कर्ज काढून शेतीमध्ये गुंतवणूक केली. त्यातही अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले

औरंगाबाद : मराठवाड्यात आठ महिन्यांत ६२६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून यातील बहुतांश आत्महत्या सावकारी कर्जाच्या जाचामुळे झाल्याचे बोलले जात आहे. तीन वर्षांपासून अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम वाया जात आहे. यंदाही तशीच अवस्था असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. सावकारी कर्जासह इतर अनेक बाबीही शेतकरी आत्महत्येस कारणीभूत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात १०९, जालना ७७, परभणी ५०, हिंगोली २४, नांदेड ८९, बीड १७०, लातूर ३६, तर उस्मानाबाद जिल्ह्यात ७१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

मागील दोन महिन्यांत १०० हून अधिक शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. पीककर्ज वेळेत मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी सावकारांकडून कर्ज काढून शेतीमध्ये गुंतवणूक केली. त्यातही अतिवृष्टीमुळे विभागातील सुमारे ८ लाख शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. अस्मानी संकटाचा सामना करण्यासह बँकांकडूनही शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्यामुळे शेतकरी नैराश्येच्या गर्तेत जात आहेत. पावसाळा सुरू झाल्यानंतर आत्महत्यांचे प्रमाण वाढले असून अतिवृष्टी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण हे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांसाठी उभारी २.० हा उपक्रम राबवित आहेत.

सरकारची भूमिका काय ?३१ जुलै रोजी मुख्यमंत्री औरंगाबाद दौऱ्यावर होते. त्या दिवशी त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत चिंता व्यक्त केली होती. याबाबत धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचेही जाहीर केले होते. त्यानंतर २३ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र थांबविण्यासाठी सर्वंकष कृती आराखडा शासनाच्या विविध विभागांच्या समन्वयाने तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याबाबत लवकरच धोरण जाहीर करण्यात येईल.

विभागात फक्त ६३ टक्के पीककर्ज वाटपमराठवाड्यात आजवर ६३ टक्के शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप झाले आहे, तर दुसरीकडे ९८ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. अद्याप ३७ टक्के पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही. पेरण्या मात्र पूर्ण झाल्या असून ज्या शेतकऱ्यांना बँकांनी कर्ज दिले नाही, त्यांनी सावकारांकडून कर्ज घेऊन पेरण्या केल्याचे यातून दिसते आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्याAurangabadऔरंगाबाद