शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

सावकारी कर्जाचा विळखा; मराठवाड्यात ८ महिन्यांत ६२६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 13:10 IST

पीककर्ज वेळेत मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी सावकारांकडून कर्ज काढून शेतीमध्ये गुंतवणूक केली. त्यातही अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले

औरंगाबाद : मराठवाड्यात आठ महिन्यांत ६२६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून यातील बहुतांश आत्महत्या सावकारी कर्जाच्या जाचामुळे झाल्याचे बोलले जात आहे. तीन वर्षांपासून अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम वाया जात आहे. यंदाही तशीच अवस्था असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. सावकारी कर्जासह इतर अनेक बाबीही शेतकरी आत्महत्येस कारणीभूत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात १०९, जालना ७७, परभणी ५०, हिंगोली २४, नांदेड ८९, बीड १७०, लातूर ३६, तर उस्मानाबाद जिल्ह्यात ७१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

मागील दोन महिन्यांत १०० हून अधिक शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. पीककर्ज वेळेत मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी सावकारांकडून कर्ज काढून शेतीमध्ये गुंतवणूक केली. त्यातही अतिवृष्टीमुळे विभागातील सुमारे ८ लाख शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. अस्मानी संकटाचा सामना करण्यासह बँकांकडूनही शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्यामुळे शेतकरी नैराश्येच्या गर्तेत जात आहेत. पावसाळा सुरू झाल्यानंतर आत्महत्यांचे प्रमाण वाढले असून अतिवृष्टी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण हे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांसाठी उभारी २.० हा उपक्रम राबवित आहेत.

सरकारची भूमिका काय ?३१ जुलै रोजी मुख्यमंत्री औरंगाबाद दौऱ्यावर होते. त्या दिवशी त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत चिंता व्यक्त केली होती. याबाबत धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचेही जाहीर केले होते. त्यानंतर २३ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र थांबविण्यासाठी सर्वंकष कृती आराखडा शासनाच्या विविध विभागांच्या समन्वयाने तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याबाबत लवकरच धोरण जाहीर करण्यात येईल.

विभागात फक्त ६३ टक्के पीककर्ज वाटपमराठवाड्यात आजवर ६३ टक्के शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप झाले आहे, तर दुसरीकडे ९८ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. अद्याप ३७ टक्के पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही. पेरण्या मात्र पूर्ण झाल्या असून ज्या शेतकऱ्यांना बँकांनी कर्ज दिले नाही, त्यांनी सावकारांकडून कर्ज घेऊन पेरण्या केल्याचे यातून दिसते आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्याAurangabadऔरंगाबाद