शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

‘समृद्धी’ला लागणार ६०० कोटी लिटर पाणी; कंत्राटदारानेच पाण्याचे नियोजन करण्याची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 13:32 IST

७० टक्के दुष्काळ असलेल्या भागातून जाणार मार्ग

ठळक मुद्देमहामार्गाच्या बांधकामासाठी २८ हजार कोटींचे कर्ज काढण्यात येणार आहे. पाण्यामुळे कामास विलंब झाला तर दंड लागणार नाही.

- विकास राऊत 

औरंगाबाद : मुंबई-नागपूर एक्स्प्रेस हायवे अर्थात समृद्धी महामार्गाच्या बांधणीला  तब्बल ६०० कोटी लिटर पाणी लागणार असून त्याची उपलब्धता संबंधित कंत्राटदाराला करावी लागणार आहे.

पाणी मिळण्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनादेखीलसंपर्क केला असल्याची माहिती एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांनी मंगळवारी येथे पत्रकार  परिषदेत दिली. ७० टक्के दुष्काळ असलेल्या भागातून महामार्ग बांधणीचे काम सुरू असून, या भागात पाणी नाही. असे असताना पाण्याविना काम थांबले तर कंत्राटदाराला दंड लावणार काय? यावर सहव्यवस्थापकीय संचालक गायकवाड म्हणाले, पाण्यामुळे कामास विलंब झाला तर दंड लागणार नाही. मात्र इतर कारणांमुळे जर कामाला विलंब झाला तर ०.०५ टक्के दंड कंत्राटदाराला आकारण्यात येईल. तसेच निर्धारित डेडलाईनपूर्वी काम केले तर ०.०३ टक्के बोनस कंत्राटदाराला देण्यात येईल. आजवर कुणालाही दंड आकारलेला नाही. समृद्धी महामार्ग ७०१ कि़ मी. लांबीचा असून, १० जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावांना जोडणार आहे. मुंबई ते नागपूर हे अंतर ७ ते ८ तासांवर येणार आहे. 

एका हंगामासाठी ९०० हेक्टरला पुरेल पाणी समृद्धीच्या बांधणीला लागणारे ६०० कोटी लिटर पाणी ९०० हेक्टर जमिनीला एका हंगामासाठी पुरू शकेल. महामार्ग बांधणीला मोठ्या प्रमाणात पाणी लागणार आहे. ६ दशलक्ष घनमीटर इतके पाणी लागणार आहे. जवळपास एक पाझर तलाव भरूनच हे पाणी लागणार आहे. पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे, असे मत मराठवाडा विकास मंडळाचे सदस्य शंकर नागरे यांनी सांगितले.

भूसंपादनासह ८ हजार कोटीभूसंपादनासह ८ हजार कोटी लागले आहेत. त्यात १६२७ कोटी कंत्राटदारावर आणि ईपीसी कन्सल्टंटवर व ६५०० कोटी रुपये भूसंपादनासाठी खर्च झाले आहेत. भूसंपादनाचा मुद्दा आता संपला आहे. औरंगाबाद तालुक्यातील ३५ गावे, गंगापूरमधील ११ गावांतील व वैजापूरमधील १५ गावांतील जमीन महामार्गासाठी संपादित केली आहे. जालना जिल्ह्यातील २५ गावांतील भूसंपादन झाले आहे. 

भूमिपूजन निश्चित नाहीमाईलस्टोनच्या पुढे महामार्गाचे काम सुरू झाले असले तरी भूमिपूजन अजून निश्चित झालेले नाही. भूमिपूजनाच्या तारखेबाबत अद्याप काहीही सांगता येणार नाही, असे सहव्यवस्थापकीय संचालक गायकवाड यांनी सांगितले. १६ पॅकेजस्मध्ये महामार्गाचे काम होणार असून ८, ९ आणि १० हे तीन पॅकेज औरंगाबाद-जालन्यातील आहेत. ८ व १० पॅकेजचे काम वेगाने सुरू आहे. पॅकेज क्र.९ उशिरा सुरू झाले आहे.

२८ हजार कोटींचे कर्जमहामार्गाच्या बांधकामासाठी २८ हजार कोटींचे कर्ज काढण्यात येणार आहे. २७ हजार कोटींची इक्विटी आहे, तर ६ हजार ३९६ कोटी रुपये सरकारी वाटा असणार आहे. ५५ हजार कोटींचा हा प्रकल्प असून, जुलै २०२१ पर्यंत त्याचे काम पूर्ण होईल, असा दावा गायकवाड यांनी केला. नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे जिल्ह्यांतून हा महामार्ग जाणार आहे.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAurangabadऔरंगाबादWaterपाणीdroughtदुष्काळ