शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
3
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
4
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
5
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
6
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
7
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
8
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
9
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
10
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
11
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
12
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
13
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
14
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
15
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
16
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
17
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
18
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
19
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
20
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा

‘समृद्धी’ला लागणार ६०० कोटी लिटर पाणी; कंत्राटदारानेच पाण्याचे नियोजन करण्याची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 13:32 IST

७० टक्के दुष्काळ असलेल्या भागातून जाणार मार्ग

ठळक मुद्देमहामार्गाच्या बांधकामासाठी २८ हजार कोटींचे कर्ज काढण्यात येणार आहे. पाण्यामुळे कामास विलंब झाला तर दंड लागणार नाही.

- विकास राऊत 

औरंगाबाद : मुंबई-नागपूर एक्स्प्रेस हायवे अर्थात समृद्धी महामार्गाच्या बांधणीला  तब्बल ६०० कोटी लिटर पाणी लागणार असून त्याची उपलब्धता संबंधित कंत्राटदाराला करावी लागणार आहे.

पाणी मिळण्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनादेखीलसंपर्क केला असल्याची माहिती एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांनी मंगळवारी येथे पत्रकार  परिषदेत दिली. ७० टक्के दुष्काळ असलेल्या भागातून महामार्ग बांधणीचे काम सुरू असून, या भागात पाणी नाही. असे असताना पाण्याविना काम थांबले तर कंत्राटदाराला दंड लावणार काय? यावर सहव्यवस्थापकीय संचालक गायकवाड म्हणाले, पाण्यामुळे कामास विलंब झाला तर दंड लागणार नाही. मात्र इतर कारणांमुळे जर कामाला विलंब झाला तर ०.०५ टक्के दंड कंत्राटदाराला आकारण्यात येईल. तसेच निर्धारित डेडलाईनपूर्वी काम केले तर ०.०३ टक्के बोनस कंत्राटदाराला देण्यात येईल. आजवर कुणालाही दंड आकारलेला नाही. समृद्धी महामार्ग ७०१ कि़ मी. लांबीचा असून, १० जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावांना जोडणार आहे. मुंबई ते नागपूर हे अंतर ७ ते ८ तासांवर येणार आहे. 

एका हंगामासाठी ९०० हेक्टरला पुरेल पाणी समृद्धीच्या बांधणीला लागणारे ६०० कोटी लिटर पाणी ९०० हेक्टर जमिनीला एका हंगामासाठी पुरू शकेल. महामार्ग बांधणीला मोठ्या प्रमाणात पाणी लागणार आहे. ६ दशलक्ष घनमीटर इतके पाणी लागणार आहे. जवळपास एक पाझर तलाव भरूनच हे पाणी लागणार आहे. पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे, असे मत मराठवाडा विकास मंडळाचे सदस्य शंकर नागरे यांनी सांगितले.

भूसंपादनासह ८ हजार कोटीभूसंपादनासह ८ हजार कोटी लागले आहेत. त्यात १६२७ कोटी कंत्राटदारावर आणि ईपीसी कन्सल्टंटवर व ६५०० कोटी रुपये भूसंपादनासाठी खर्च झाले आहेत. भूसंपादनाचा मुद्दा आता संपला आहे. औरंगाबाद तालुक्यातील ३५ गावे, गंगापूरमधील ११ गावांतील व वैजापूरमधील १५ गावांतील जमीन महामार्गासाठी संपादित केली आहे. जालना जिल्ह्यातील २५ गावांतील भूसंपादन झाले आहे. 

भूमिपूजन निश्चित नाहीमाईलस्टोनच्या पुढे महामार्गाचे काम सुरू झाले असले तरी भूमिपूजन अजून निश्चित झालेले नाही. भूमिपूजनाच्या तारखेबाबत अद्याप काहीही सांगता येणार नाही, असे सहव्यवस्थापकीय संचालक गायकवाड यांनी सांगितले. १६ पॅकेजस्मध्ये महामार्गाचे काम होणार असून ८, ९ आणि १० हे तीन पॅकेज औरंगाबाद-जालन्यातील आहेत. ८ व १० पॅकेजचे काम वेगाने सुरू आहे. पॅकेज क्र.९ उशिरा सुरू झाले आहे.

२८ हजार कोटींचे कर्जमहामार्गाच्या बांधकामासाठी २८ हजार कोटींचे कर्ज काढण्यात येणार आहे. २७ हजार कोटींची इक्विटी आहे, तर ६ हजार ३९६ कोटी रुपये सरकारी वाटा असणार आहे. ५५ हजार कोटींचा हा प्रकल्प असून, जुलै २०२१ पर्यंत त्याचे काम पूर्ण होईल, असा दावा गायकवाड यांनी केला. नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे जिल्ह्यांतून हा महामार्ग जाणार आहे.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAurangabadऔरंगाबादWaterपाणीdroughtदुष्काळ