शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’ला लागणार ६०० कोटी लिटर पाणी; कंत्राटदारानेच पाण्याचे नियोजन करण्याची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 13:32 IST

७० टक्के दुष्काळ असलेल्या भागातून जाणार मार्ग

ठळक मुद्देमहामार्गाच्या बांधकामासाठी २८ हजार कोटींचे कर्ज काढण्यात येणार आहे. पाण्यामुळे कामास विलंब झाला तर दंड लागणार नाही.

- विकास राऊत 

औरंगाबाद : मुंबई-नागपूर एक्स्प्रेस हायवे अर्थात समृद्धी महामार्गाच्या बांधणीला  तब्बल ६०० कोटी लिटर पाणी लागणार असून त्याची उपलब्धता संबंधित कंत्राटदाराला करावी लागणार आहे.

पाणी मिळण्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनादेखीलसंपर्क केला असल्याची माहिती एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांनी मंगळवारी येथे पत्रकार  परिषदेत दिली. ७० टक्के दुष्काळ असलेल्या भागातून महामार्ग बांधणीचे काम सुरू असून, या भागात पाणी नाही. असे असताना पाण्याविना काम थांबले तर कंत्राटदाराला दंड लावणार काय? यावर सहव्यवस्थापकीय संचालक गायकवाड म्हणाले, पाण्यामुळे कामास विलंब झाला तर दंड लागणार नाही. मात्र इतर कारणांमुळे जर कामाला विलंब झाला तर ०.०५ टक्के दंड कंत्राटदाराला आकारण्यात येईल. तसेच निर्धारित डेडलाईनपूर्वी काम केले तर ०.०३ टक्के बोनस कंत्राटदाराला देण्यात येईल. आजवर कुणालाही दंड आकारलेला नाही. समृद्धी महामार्ग ७०१ कि़ मी. लांबीचा असून, १० जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावांना जोडणार आहे. मुंबई ते नागपूर हे अंतर ७ ते ८ तासांवर येणार आहे. 

एका हंगामासाठी ९०० हेक्टरला पुरेल पाणी समृद्धीच्या बांधणीला लागणारे ६०० कोटी लिटर पाणी ९०० हेक्टर जमिनीला एका हंगामासाठी पुरू शकेल. महामार्ग बांधणीला मोठ्या प्रमाणात पाणी लागणार आहे. ६ दशलक्ष घनमीटर इतके पाणी लागणार आहे. जवळपास एक पाझर तलाव भरूनच हे पाणी लागणार आहे. पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे, असे मत मराठवाडा विकास मंडळाचे सदस्य शंकर नागरे यांनी सांगितले.

भूसंपादनासह ८ हजार कोटीभूसंपादनासह ८ हजार कोटी लागले आहेत. त्यात १६२७ कोटी कंत्राटदारावर आणि ईपीसी कन्सल्टंटवर व ६५०० कोटी रुपये भूसंपादनासाठी खर्च झाले आहेत. भूसंपादनाचा मुद्दा आता संपला आहे. औरंगाबाद तालुक्यातील ३५ गावे, गंगापूरमधील ११ गावांतील व वैजापूरमधील १५ गावांतील जमीन महामार्गासाठी संपादित केली आहे. जालना जिल्ह्यातील २५ गावांतील भूसंपादन झाले आहे. 

भूमिपूजन निश्चित नाहीमाईलस्टोनच्या पुढे महामार्गाचे काम सुरू झाले असले तरी भूमिपूजन अजून निश्चित झालेले नाही. भूमिपूजनाच्या तारखेबाबत अद्याप काहीही सांगता येणार नाही, असे सहव्यवस्थापकीय संचालक गायकवाड यांनी सांगितले. १६ पॅकेजस्मध्ये महामार्गाचे काम होणार असून ८, ९ आणि १० हे तीन पॅकेज औरंगाबाद-जालन्यातील आहेत. ८ व १० पॅकेजचे काम वेगाने सुरू आहे. पॅकेज क्र.९ उशिरा सुरू झाले आहे.

२८ हजार कोटींचे कर्जमहामार्गाच्या बांधकामासाठी २८ हजार कोटींचे कर्ज काढण्यात येणार आहे. २७ हजार कोटींची इक्विटी आहे, तर ६ हजार ३९६ कोटी रुपये सरकारी वाटा असणार आहे. ५५ हजार कोटींचा हा प्रकल्प असून, जुलै २०२१ पर्यंत त्याचे काम पूर्ण होईल, असा दावा गायकवाड यांनी केला. नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे जिल्ह्यांतून हा महामार्ग जाणार आहे.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAurangabadऔरंगाबादWaterपाणीdroughtदुष्काळ