शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
2
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
3
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
4
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
5
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
6
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
7
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
8
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
9
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
10
Marathi News LIVE: मुंबईकरांवर पाणीसंकट, १५ मेपासून १० टक्के पाणी कपातीचा निर्णय, जलाशयात घट
11
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा टोला
12
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
13
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
14
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
15
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
16
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
17
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
18
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
19
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
20
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
Daily Top 2Weekly Top 5

वीज जोडणी तोडल्यानंतरही दिले ५८ हजारांचे बिल !

By admin | Updated: July 22, 2014 00:17 IST

येरमाळा : घरगुती वीज धारकांची वीज जोडणी तोडून वर्ष झाले तरीही वीज वितरण कंपनीने त्या ग्राहकास ५८ हजार रुपयाचे वीज बिल देऊन गलथान कारभाराचा नमुना दाखवून दिला आहे.

येरमाळा : घरगुती वीज धारकांची वीज जोडणी तोडून वर्ष झाले तरीही वीज वितरण कंपनीने त्या ग्राहकास ५८ हजार रुपयाचे वीज बिल देऊन गलथान कारभाराचा नमुना दाखवून दिला आहे.
दहिफळ येथील चंद्रसेन तुकाराम लोहार यांचे (मीटर क्र. ७६१५५६१८४७) यांचे वीज कनेक्शन बिल थकल्यामुळे जून २०१३ मध्ये कट करण्यात आले. परंतु, यानंतरही सतत त्यांना बिले येत असून, ती बिले घेऊन ते प्रत्येकवेळी दहिफळ उपकेंद्रात जमा करतात. वर्षात दोन वेळा त्यांच्या घरी लाईनमन येऊन मीटर बंद असल्याचा अहवालही घेऊन गेले. मात्र बिल येणे काही थांबलेले नाही. चालू महिन्यात याच ग्राहकास ५८ हजार रुपयाचे बिल देण्यात आले आहे.
मीटर रीडिंग न घेताच वीज बिल वाटप करणे हा वीज वितरण कंपनीचा नेहमीचा कारभार असला तरी थकबाकीअभावी कनेक्शन कट केल्याच्या नोंदीही ठेवल्या जात नसल्याचे या बिलावरून दिसून येत आहे. मीटर रीडिंग घेण्याचे काम खाजगी एजन्सीला दिले असल्याचे सांगत अधिकारी टोलवाटोलवी करत असले तरी बंद मिटरला बिले येत असल्याने ही चूक कुणाची, असा प्रश्न समोर येत आहे. दरम्यान, याबाबत दहिफळ उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता सी. एस. जाधव म्हणाले की, या मीटरचे बिल दुरुस्तीसाठी कळंब कार्यालयात दिले आहे. मात्र, तेथे बिल प्रलंबित आहे. (वार्ताहर)