५८ कोटी ३० लाख ४६ हजार रुपये थकित बिलाची माफी
By Admin | Updated: February 10, 2015 00:32 IST2015-02-09T00:32:59+5:302015-02-10T00:32:30+5:30
लातूर : कृषी ग्राहकांवरील वीज बिलाच्या थकीत रकमेचा बोजा कमी करण्यासाठी शासनाने कृषी संजीवनी योजना २०१४ मध्ये सुरू केली आहे़ यामध्ये ४६ हजार ४३२ शेतकऱ्यांनी

५८ कोटी ३० लाख ४६ हजार रुपये थकित बिलाची माफी
लातूर : कृषी ग्राहकांवरील वीज बिलाच्या थकीत रकमेचा बोजा कमी करण्यासाठी शासनाने कृषी संजीवनी योजना २०१४ मध्ये सुरू केली आहे़ यामध्ये ४६ हजार ४३२ शेतकऱ्यांनी ३४ कोटी ८९ लाख ८८ हजार रूपयांची थकबाकी भरली असून, या शेतकऱ्यांना एकूण रकमेपैकी ५८ लाख ३० लाख ४६ हजार रुपये माफ करण्यात आल्याने दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला आधार मिळाला आहे़
कृषी पंपावरील वीज बिलांच्या थकीत रकमेचा बोजा कमी करण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी संजीवनी योजना २०१४ मध्ये सुरू केली आहे़ यामध्ये ेंथकबाकीदारांसाठी मुळ रकमेच्या ५० टक्के रक्कम एकरकमी किंवा तीन मासिक हप्त्यामध्ये भरण्याची संधी महावितरणने उपलब्ध करून दिली आहे़ तर उरलेली रक्कम महाराष्ट्र शासनाच्या वतीने महावितरण विद्युत कायदा २००३ कलम ६५ प्रमाणे रोखीने आणि समप्रमाणात अनुदान स्वरूपात अदा करण्यात येईल. तसेच या योजनेमध्ये भाग घेणाऱ्या कृषी ग्राहकांचे थकीत व्याज व दंडही माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे़
कृषी ग्राहकांसाठी १ एप्रिल २०१४ पर्यंतचा कालावधी देण्यात आला होता. त्यामध्ये वाढ करून हा कालावधी मार्च २०१५ पर्यंत करण्यात आला आहे़ लातूर परिमंडल अंतर्गत येणाऱ्या बीड, लातूर, उस्मानाबाद या तीन जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या ४६ हजार ४३२ शेतकऱ्यांनी मार्च २०१४ च्या मुळ थकबाकीच्या प्रमाणात एकूण रकमेपैकी ३४ कोटी ८९ लाख ८८ हजार रूपये मुळ थकबाकी, दंडाची रक्कम व व्याजाच्या रकमेचा भरणा केला असून, यामधून ५८ कोटी ३० लाख ४६ हजार रूपयांची माफी करण्यात आली आहे़ तसेच १ कोटी ५० लाख रूपयाची गारपीट व टंचाई माफी करण्यात आली आहे़ या रकमेचाही यात समावेश करण्यात आलेला आहे़ महावितरणच्या या अभिनव योजनेमुळे कृषीपंपाच्या ग्राहकांना दुष्काळग्रस्त परिस्थितीत मोठा आधार मिळाला आहे़ (प्रतिनिधी)
कृषी ग्राहकांवरील कृषी संजीवनी योजनेअंतर्गत थकी वीज बिलाच्या रकमेचा भरणा करण्याचा राहिलेल्या ग्राहकांमध्ये ३ लाख ६३ हजार जणांचा समावेश आहे़ या ग्राहकांनी ४०१ कोटी रक्कमेचा भरणा केल्यास त्यांची ११५५ कोटी ५२ लाख ७७ हजार १९४ रूपये एवढी माफी होणार आहे़ ग्राहकांना या योजनेचा लाभ मार्चअखेरपर्यंत घेता येणार आहे. कंपनीने मुदतवाढ दिल्यामुळे अन्य शेतकऱ्यांनाही याचा फायदा घेता येणार आहे.