शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

खात्यात ५५ कोटी शिल्लक, म्हणे पाणी योजना पूर्ण करा;‘मजीप्रा’ची मनपास ८३५ कोटींची मागणी

By मुजीब देवणीकर | Updated: July 11, 2024 16:23 IST

शहराची तहान भागविण्यासाठी २,७४० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. आतापर्यंत या योजनेसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून १,४२४ कोटी १७ लाख रुपये आले.

छत्रपती संभाजीनगर : नवीन पाणीपुरवठा योजना डिसेंबर २०२४मध्ये पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर (मजीप्रा) राजकीय दबाव टाकण्यात येत आहे. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय मंडळींनी पाण्यासाठी आग्रह धरला असला तरी ‘मजीप्रा’च्या बँक खात्यात फक्त ५५ कोटी रुपये शिल्लक आहेत. योजना पूर्ण करण्यासाठी ८३५ कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी ‘मजीप्रा’ने महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

शहराची तहान भागविण्यासाठी २,७४० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. आतापर्यंत या योजनेसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून १,४२४ कोटी १७ लाख रुपये आले. हा निधी मनपाने त्वरित ‘मजीप्रा’कडे वर्ग केला. त्यातील १,३६८ कोटी रुपये आतापर्यंत झालेल्या कामांवर खर्चही झाले. कंत्राटदार कंपनीकडून अनेक बिले दाखल करण्यात आली. कंपनीकडून सातत्याने बिलांची मागणी होतेय. मजीप्राकडे फक्त ५५ कोटी ३५ लाख रुपये शिल्लक आहेत. योजना पूर्ण करण्यासाठी ८३५ कोटी रुपयांची गरज आहे. सप्टेंबर किंवा ऑक्टाेबरपर्यंत हा निधी द्यावा, असे ‘मजीप्रा’ला अपेक्षित आहे. मजीप्राने या योजनेवर ३ टक्के सेवा कराची मागणी केली. त्यानुसार किमान ९०० कोटी रुपये द्यावे लागतील. मागील महिन्यातच यासंदर्भातील पत्र आम्ही मनपाला दिल्याचे कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांनी सांगितले.

योजनेचे डिझाइन २,७४० कोटी रुपयांच्या योजनेत केंद्र शासन २५ टक्के म्हणजेच ६८५ कोटी रुपये देईल. राज्य शासन अनुदान ४५ टक्के म्हणजे १,२३३ कोटी आणि मनपाचा वाटा ८२२ कोटी रुपये ठरविण्यात आला. मनपाने यापूर्वीच एवढा निधी आमच्याकडे नसल्याचे शासनाला कळविले. शासनाने मनपाला ‘सॉफ्ट लोन’ देण्याचे आश्वासन दिले होते.

तरतूदच नाहीयोजना डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण व्हावी म्हणून राजकीय मंडळींकडून बैठकांचे सत्र सुरू आहे. योजनेसाठी आर्थिक तरतूदही करून देण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी स्वीकारायला तयार नाहीत. मनपाचा वाटा वेळेवर दाखल न केल्यास योजनेला आणखी काही महिने विलंब होऊ शकतो, अशी शक्यता अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे.

८३५ कशासाठी हवेत? १५० कोटी- कंत्राटदार देयक- असाधारण भाववाढ ७० कोटी- पाणीपुरवठा पुनरुज्जीवन योजना १४९ कोटी- यांत्रिकी कामे करण्यासाठी २१ कोटी- यांत्रिकीची अन्य कामे ५०० कोटी- जून ते डिसेंबरपर्यंतचा निधी.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी