शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

सायबर गुन्ह्यात ५२ टक्के पैसे झारखंड, बिहारच्या बँक खात्यात; रोख काढतात मात्र दिल्लीतून

By सुमित डोळे | Updated: November 29, 2023 17:21 IST

सायबर गुन्ह्यांसाठी सर्वाधिक सीमकार्ड प. बंगाल मधून विकत घेतली जातात; सायबर पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर

छत्रपती संभाजीनगर: तंत्रज्ञानाच्या बदलांसह विविध प्रकारे प्रलोभन दाखवून, फसवणुकीचे सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वेगाने वाढले. गेल्या १० महिन्यात शहरातील १६८१ नागरिक सायबर गुन्ह्यांत फसले गेले. यात ३ कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम सायबर गुन्हेगारांनी लंपास केली. सायबर पोलिसांना यापैकी ७० लाख रुपये थांबवण्यात यश आले. परंतु यातील ५२ टक्के रक्कम ही झारखंडमध्ये तर १६ टक्के रक्कम एकट्या बिहार राज्यात गेली आहे. हे पैसे जरी मुख्यत्वे सहा ते सात राज्यातील बँक खात्यात जमा होत असले तरी ८० टक्के रक्कम दिल्लीतून रोखीत बदलली जात असल्याचेही सायबर पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले.

गेल्या ४ वर्षांत सायबर गुन्ह्यांचे प्रमाण १४० टक्क्याने वाढले. हनिट्रॅप, ऑनलाईन टास्क, इन्स्टंट लोन, ऑनलाईन जाॅब, घरबसल्या नोकरीचे आमिष, वीजबिलासारख्या विविध कारणांखाली हजारो नागरिकांना सायबर गुन्हेगारांनी कोट्यवधींचा गंडा घातला. यात प्रामुख्याने नवरात्र, दिवाळीत भरघोस डिस्काऊंटच्या नावाखाली फसवणुकीच्या तक्रारींचा ओघ दुपटीने वाढला.ग्रामीण पेक्षा सुशिक्षित शहरी अधिक बळी

सायबर विभागाच्या पोलिस निरीक्षक प्रवीणा यादव यांच्या माहितीनुसार, ग्रामीणच्या तुलनेत शहरात सुशिक्षित वर्ग ऑनलाईन फसवणुकीला अधिक बळी पडत आहे. बिहार, झारखंड, राजस्थानच्या विरळ भागातून हे रॅकेट चालवले जाते. शिवाय, बँक खाते एका राज्यात तर पैशांचा वापर मात्र अन्य राज्यातून होत असल्याने तपासात मोठ्या अडचणी येतात. तरीही गेल्या १० महिन्यांमध्ये १११ तक्रारदारांचे ७० लाख रुपये वाचवण्यात पोलिसांना यश आले. यादव यांच्यासह सहायक निरीक्षक अमोल सातोदकर, अंमलदार वैभव वाघचौरे, सुशांत शेळके, श्याम गायकवाड यांचे पथक यासाठी कार्यरत आहे.

ठाणे -तक्रारी - निकाली - तपासावर - मागील प्रलंबितसायबर पोलिस ठाणे - १०४ - ३१- ७३ - ७२अन्य पोलिस ठाणे - १५७७ - २६६ - १३११ - १४०४

सर्वाधिक झारखंड राज्यातून वसूलीसायबर पोलिसांनी वसूल केलेल्या ७० लाखांपैकी सर्वात जास्त ३१ लाख रुपये झारखंड, १६ लाख नोएडा, १४ लाख दिल्ली तर ९ लाख बिहारमधून वसूल केले. बहुतांश प्रकरणात गुन्हेगार पैसे तातडीने अन्य खात्यात वळवून रोखीत बदलतात. १६८१ तक्रारीत ३ कोटींपेक्षा अधिक रक्कम देखील झारखंडमधील बँक खात्यात गेल्याचे तपासात निष्पन्न होत आहे.

झारखंड - ५२ टक्केबिहार - १६ टक्केराजस्थान - १४ टक्केनोएडा - ७ टक्केओडिसा - ६ टक्केउर्वरित - ५ टक्के

१० पैकी ४ गुन्हेगार बिहारचे- गेल्या तीन महिन्यांत सायबर पोलिसांनी ६ मोठ्या गुन्ह्यांत परराज्यात शोध घेऊन १० आरोपींना अटक केली. त्यातील ४ बिहारचे होते.-बिहार, झारखंडच्या सीमावर्ती भागात सर्वाधिक रॅकेट चालवते जाते. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी मात्र जवळच्या राज्यांतील बँक खात्याचा वापर होतो.- फसवणुकीच्या रकमेतून झारखंडमध्ये मोठ्या प्रमाणात संपत्ती जमवल्याचे अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीत निष्पन्न झाले. पश्चिम बंगालमधून सीमकार्ड विकत घेतले जातात. तीन ते चार राज्यांतील विविध मार्गाने रॅकेट चालवले जात असल्याने पोलिसांना देखील आरोपी निष्पन्न करणे आव्हानात्मक ठरत आहे.

हनीट्रॅप, बँकांची प्रकरणे जास्तसायबर पोलिसांच्या मते, शहरातील १६८१ तक्रारींमध्ये सर्वाधिक फसवणूक बँक, इन्शुरन्स कंपन्यांच्या नावाखाली फसवणुकीच्या आहेत. त्याखालोखाल हनीट्रॅप, डेटिंग अॅपवरून फसवणुकीच्या तक्रारी वाढत आहेत.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी