शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

औरंगाबादेतून ५०० टन कचरा उचलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:39 AM

कचराप्रश्नी बुधवारी संपूर्ण महापालिकेने झोकून देऊन काम केले. त्यामुळे दिवसभरात ५०० टनांहून अधिक कचरा उचलण्यात यश आले. महापौरांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे सहाव्या दिवशी २५ टक्के प्रक्रिया केलेला कचरा उचलला.

ठळक मुद्देचार दिवस शिल्लक : झाल्टा येथे विरोध; पोलीस कुमक मागविली

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कचराप्रश्नी बुधवारी संपूर्ण महापालिकेने झोकून देऊन काम केले. त्यामुळे दिवसभरात ५०० टनांहून अधिक कचरा उचलण्यात यश आले. महापौरांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे सहाव्या दिवशी २५ टक्के प्रक्रिया केलेला कचरा उचलला. येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये शंभर टक्के कचरा उचलण्यात येणार असल्याचा दावा महापौरांकडून करण्यात आला. शहरातील कचरा झाल्टा येथे टाकण्यात येत असताना परिसरातील नागरिकांनी प्रखर विरोध दर्शविला. महापालिकेने अतिरिक्त पोलीस कुमक मागविल्याने विरोध मावळला.शहरातील प्रमुख रस्त्यांवर आणि गल्लीबोळांत एकूण ५ हजार टन कचरा पडून आहे. उचलण्यात आलेला कचरा टाकायचा कुठे, असा प्रश्न सर्व वॉर्ड अधिकाºयांना पडला आहे. ज्या वॉर्डात ओला व सुका कचरा वेगळा करण्यात येतो तेथेच सुजलाम् सुफलाम् आहे. जिथे ओला व सुका मिक्स करून कचरा जमा करण्यात येतो तेथे प्रश्न गंभीर आहे. प्रभाग १, २, ३ आणि ९ मध्ये बुधवारी सकाळी ६ वाजेपासून व्यापक मोहीम राबविण्यात आली. जिथे मोठमोठे कचºयाचे डोंगर साचले आहेत तो कचरा उचलण्यास सुरुवात केली. किलेअर्क, समर्थनगर, पैठणगेट, जकात नाका, औरंगपुरा येथील कचरा उचलण्यात आला. हा सर्व प्रक्रिया केलेला कचरा आहे. या कचºयाचे स्क्रिनिंग झाल्टा येथे करण्याचे निश्चित झाले. दुपारी महापालिकेच्या आणि खाजगी कचºयाच्या गाड्या झाल्टा येथे पोहोचताच नागरिकांकडून प्रखर विरोध सुरू झाला.येथे कचºयावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यात येत असल्याचे अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, एम.बी. काझी, एस.एस. कुलकर्णी यांनी नागरिकांना सांगितले. नागरिक अजिबात ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते. प्रशासनाने त्वरित महापालिकेचे अतिक्रमण हटाव पथकही मागवून घेतले. त्यानंतरही नागरिकांचा विरोध सुरूच होता. मनपाने अतिरिक्त पोलीस कुमक मागवून घेतली. त्यानंतर नागरिकांचा विरोध मावळला. दिवसभरात २५ पेक्षा अधिक ट्रक कचरा या ठिकाणी टाकण्यात आला. रात्रीही कचरा टाकण्यात येणार आहे. नाशिकच्या कंपनीमार्फत कचºयाचे स्क्रिनिंग करण्यात येईल.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका