शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
2
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
3
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
4
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
5
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
6
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
7
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
8
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
9
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
10
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
11
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
12
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
13
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
14
बायकोचा खून करून घरात रचला चोरीचा बनाव, पण पतीच्या एका चुकीमुळे झाला 'भांडाफोड'...
15
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
16
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?
17
Jio चा धमाका! २०० रुपयांपेक्षा कमी दरात अनलिमिटेड 5G डेटा आणि कॉलिंग; 'हे' २ स्वस्त प्रीपेड प्लॅन्स लॉन्च
18
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
19
IND vs AUA 1st T20I : सूर्यकुमार यादव अन् शुबमन गिल जोडी जमली; पण शेवटी पाऊस जिंकला!
20
रणबीर कपूरनंतर आता प्रभासही देणार न्यूड सीन? संदीप रेड्डी वांगा यांच्या 'स्पिरीट'ची चर्चा

मराठवाड्यासाठी ४५ हजार कोटींचे पॅकेज, मुख्यमंत्री म्हणाले, घोषणांवर काम करू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 13:20 IST

मंत्रिमंडळ बैठकीतील घोषणांवर आम्ही काम करणार आहोत: मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त शहरात घेतलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागातील आठ जिल्ह्यांची झोळी ४५ हजार कोटींनी भरण्याची घोषणा केली. या पॅकेजच्या घोषणेवर सरकार काम करील असे मुख्यमंत्री शिंदे यांनी गुरुवारी (दि.२३) येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. मंत्रिमंडळ बैठकीला नऊ महिने झाले असून, अंमलबजावणी कधी होणार, याचे वृत्त ‘लोकमत’ने गुरुवारच्या अंकात प्रकाशित करून शासनाचे लक्ष वेधले होते.

घोषणेचा अध्यादेश काढण्याशिवाय काहीही तरतूद शासनाने केलेली नाही. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत या पॅकेजचा सत्ताधाऱ्यांसह विरोधकांना देखील विसर पडला. स्थानिक पातळीवरूनही काही हालचाली नसल्यामुळे या पॅकेजमधील कामांना मुहूर्त कधी लागणार? नऊ महिने झाले मंत्रिमंडळ बैठकीला, आजवर त्यावर काय निर्णय घेतले, यावर मुख्यमंत्री संतापून म्हणाले, मग काय आचारसंहितेत निर्णय घ्यायचा काय, सरकारने मराठवाड्यासाठी ‘एनडीआरएफ’, ‘एसडीआरएफ’चे नियम बदलले. शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मानधन सुरू केले. मंत्रिमंडळ बैठकीतील घोषणांवर आम्ही काम करणार आहोत. येथील पाणीपुरवठा योजनेचे काम शासनच करीत आहे. पीकविमा योजनेसाठी सरकार काम करीत नाही का, यात लापरवाही करणाऱ्यावर कारवाई केली जाईल. मराठवाडा वॉटरग्रीडसाठी पंतप्रधानांना बोललो आहोत. भीमा स्थिरीकरण योजनेचे काम करतो आहोत. मराठवाड्याला पाण्यापासून वंचित ठेवणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

पालकमंत्री नसले तरी मैं हूँ ना...मराठवाड्यातील दोन वगळता उर्वरित पालकमंत्री बैठकीला का नव्हते, काही पालकमंत्री उमेदवार आहेत. त्यामुळे ते आले नाहीत. ते नसले तरी मैं हूँ ना, असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच विरोधक टंचाईवर सध्या काहीही बोलत नाहीत. यावर बोलतांना शिंदे म्हणाले, शेतकऱ्यांना साेडून मला लंडनला (विरोधकांचे नाव न घेता) कसे जाता येईल. काही लोक फक्त निवडणुका व मतदानापुरतेच असतात अशी टीका करून सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे १७०० कोटी देखील सरकार देणार असल्याचे ते म्हणाले.

‘त्या’ कंपन्या अंबरनाथमध्ये हलवू...डोंबिवलीतील एका कंपनीत झालेल्या स्फोटामुळे आठ जणांचे मृत्यू झाले आहेत. तेथे मदतकार्य सुरू असून, प्रशासन, लोकप्रतिनिधी तेथे आहेत. एमआयडीसी आधी झाली, मग कंपन्या आल्या. नंतर वसाहती झाल्या. घातक रसायन उत्पादनांमुळे ब्लास्ट होऊ शकतात. अशा कंपन्यांना अंबरनाथ सेक्टरमध्ये शिफ्ट करण्याचा निर्णय घेत आहोत. यासाठी संबंधित खात्यांशी चर्चा सुरू आहे.

कीर्तिकरांबाबत पक्ष निर्णय घेईल...गजानन कीर्तिकर यांच्यावर कारवाई करणार आहात का? या प्रश्नावर ते म्हणाले, कीर्तिकर यांच्याची माझे बोलणे झाले आहे. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. त्याबाबत काय निर्णय घ्यायचा असेल तर पक्ष घेईल.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMarathwadaमराठवाडाWaterपाणीAurangabadऔरंगाबाद