शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यासाठी ४५ हजार कोटींचे पॅकेज, मुख्यमंत्री म्हणाले, घोषणांवर काम करू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 13:20 IST

मंत्रिमंडळ बैठकीतील घोषणांवर आम्ही काम करणार आहोत: मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त शहरात घेतलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागातील आठ जिल्ह्यांची झोळी ४५ हजार कोटींनी भरण्याची घोषणा केली. या पॅकेजच्या घोषणेवर सरकार काम करील असे मुख्यमंत्री शिंदे यांनी गुरुवारी (दि.२३) येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. मंत्रिमंडळ बैठकीला नऊ महिने झाले असून, अंमलबजावणी कधी होणार, याचे वृत्त ‘लोकमत’ने गुरुवारच्या अंकात प्रकाशित करून शासनाचे लक्ष वेधले होते.

घोषणेचा अध्यादेश काढण्याशिवाय काहीही तरतूद शासनाने केलेली नाही. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत या पॅकेजचा सत्ताधाऱ्यांसह विरोधकांना देखील विसर पडला. स्थानिक पातळीवरूनही काही हालचाली नसल्यामुळे या पॅकेजमधील कामांना मुहूर्त कधी लागणार? नऊ महिने झाले मंत्रिमंडळ बैठकीला, आजवर त्यावर काय निर्णय घेतले, यावर मुख्यमंत्री संतापून म्हणाले, मग काय आचारसंहितेत निर्णय घ्यायचा काय, सरकारने मराठवाड्यासाठी ‘एनडीआरएफ’, ‘एसडीआरएफ’चे नियम बदलले. शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मानधन सुरू केले. मंत्रिमंडळ बैठकीतील घोषणांवर आम्ही काम करणार आहोत. येथील पाणीपुरवठा योजनेचे काम शासनच करीत आहे. पीकविमा योजनेसाठी सरकार काम करीत नाही का, यात लापरवाही करणाऱ्यावर कारवाई केली जाईल. मराठवाडा वॉटरग्रीडसाठी पंतप्रधानांना बोललो आहोत. भीमा स्थिरीकरण योजनेचे काम करतो आहोत. मराठवाड्याला पाण्यापासून वंचित ठेवणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

पालकमंत्री नसले तरी मैं हूँ ना...मराठवाड्यातील दोन वगळता उर्वरित पालकमंत्री बैठकीला का नव्हते, काही पालकमंत्री उमेदवार आहेत. त्यामुळे ते आले नाहीत. ते नसले तरी मैं हूँ ना, असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच विरोधक टंचाईवर सध्या काहीही बोलत नाहीत. यावर बोलतांना शिंदे म्हणाले, शेतकऱ्यांना साेडून मला लंडनला (विरोधकांचे नाव न घेता) कसे जाता येईल. काही लोक फक्त निवडणुका व मतदानापुरतेच असतात अशी टीका करून सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे १७०० कोटी देखील सरकार देणार असल्याचे ते म्हणाले.

‘त्या’ कंपन्या अंबरनाथमध्ये हलवू...डोंबिवलीतील एका कंपनीत झालेल्या स्फोटामुळे आठ जणांचे मृत्यू झाले आहेत. तेथे मदतकार्य सुरू असून, प्रशासन, लोकप्रतिनिधी तेथे आहेत. एमआयडीसी आधी झाली, मग कंपन्या आल्या. नंतर वसाहती झाल्या. घातक रसायन उत्पादनांमुळे ब्लास्ट होऊ शकतात. अशा कंपन्यांना अंबरनाथ सेक्टरमध्ये शिफ्ट करण्याचा निर्णय घेत आहोत. यासाठी संबंधित खात्यांशी चर्चा सुरू आहे.

कीर्तिकरांबाबत पक्ष निर्णय घेईल...गजानन कीर्तिकर यांच्यावर कारवाई करणार आहात का? या प्रश्नावर ते म्हणाले, कीर्तिकर यांच्याची माझे बोलणे झाले आहे. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. त्याबाबत काय निर्णय घ्यायचा असेल तर पक्ष घेईल.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMarathwadaमराठवाडाWaterपाणीAurangabadऔरंगाबाद