शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यातील बाजारपेठेला ४०० कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 00:38 IST

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे पुकारण्यात आलेल्या बंदला शहरात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. मात्र, या एका दिवसात जिल्ह्यातील सुमारे ४०० कोटींचे व्यवहार ठप्प झाले. त्यात शहरातील व्यवसायाचे आर्थिक नुकसान २७५ कोटींपर्यंत आहे.

ठळक मुद्देबंदचा परिणाम : शहरातील २७५ कोटींचे व्यवहार ठप्प; पेट्रोलपंप, हॉटेलसह विविध उद्योगांचा व्यवहार थांबला

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे पुकारण्यात आलेल्या बंदला शहरात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. मात्र, या एका दिवसात जिल्ह्यातील सुमारे ४०० कोटींचे व्यवहार ठप्प झाले. त्यात शहरातील व्यवसायाचे आर्थिक नुकसान २७५ कोटींपर्यंत आहे.मराठा समाजाच्या आंदोलनात व्यापारी स्वत:हून सहभागी झाले होते. बहुतांश व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानाचे शटर गुरुवारी उघडलेच नाही. याचा मोठ्या प्रमाणात फटका शहराला बसला. विशेषत: येथील हॉटेल, लॉजिंग, बोर्डिंग, पर्यटनाच्या व्यवसायाला याचा सर्वाधिक फटका सहन करावा लागला आहे. यासंदर्भात मराठवाडा चेंबर आॅफ ट्रेड अ‍ॅण्ड कॉमर्सचे अध्यक्ष प्रफुल्ल मालाणी यांनी सांगितले की, शहरातच नव्हे तर जिल्ह्यातील ९९ टक्के बाजारपेठ बंद होती. सरकारी तिजोरीत कर भरण्याच्या आकडेवारीचे गणित केल्यास जिल्ह्यातील बाजारपेठेत सध्या दररोज ४०० कोटींची उलाढाल होत आहे. या एकूण उलाढालीपैकी शहरातील व्यवसायाचा २५० ते २७५ कोटींचा वाटा असतो. जर एक दिवस बाजारपेठ बंद राहिली तर जिल्ह्यात ४०० कोटींचे व्यवहार ठप्प होतात. यात जाधववाडी, मोंढा, आॅटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल्स, कपडा बाजार, सराफा बाजार यासारख्या व्यवसायाचा समावेश आहे.पेट्रोलपंपांचे ५ कोटींचे व्यवहार ठप्पगुरुवारी शहरातील व आसपासच्या परिसरातील ३५ पैकी ३० पेट्रोलपंप बंद ठेवण्यात आले होते. या काळात अवघे ५ पेट्रोलपंप सुरू होते. मात्र, दुपारनंतर आंदोलनकर्त्यांनी यातील ३ पेट्रोलपंप बंद करायला भाग पाडले होते. सायंकाळी काहीच पेट्रोलपंप सुरू झाले होते. यासंदर्भात पेट्रोलपंपचालक असोसिएशनचे हितेश पटेल यांनी सांगितले की, पहिल्यांदाच शहरातील पेट्रोल कंपन्यांचे स्वत:चे पेट्रोलपंप बंद होते. शहरात दररोज ३ लाख लिटर पेट्रोल तर दोन लाख लिटर डिझेलची विक्री होते. व्यवस्थापनावरील खर्च, असे ५ कोटींपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.हॉटेल उद्योगाला फटकाऔरंगाबाद जिल्हा हॉटेल्स रेस्टॉरंट ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी मगर यांनी सांगितले की, आमच्या संघटनेचे १७२ सदस्य आहेत. तसेच अन्य मिळून शहरात लहान-मोठे २५० हॉटेल रेस्टॉरंट, लॉज आहेत. एका दिवसात दीड कोटीचा फटका या व्यवसायाला बसला आहे. बंदचा परिणाम येणारा आठवडाभर दिसून येईल.८०० कोटींचे बँकिंग व्यवहार ठप्पबँकेतील सुमारे ८०० कोटींचे व्यवहार ठप्प झाल्याची माहिती बँकेच्या अधिकाºयांनी दिली. चित्रपटगृहांनाही आर्थिक फटका बसला. यासंदर्भात चित्रपटगृहाचे मालक रवी खिंवसरा यांनी सांगितले की, शहरात मल्टिप्लेक्स व सिंगल चित्रपटगृहांचे २७ स्क्रीन आहेत. या चित्रपटगृहांतील सर्व शो रद्द करण्यात आले होते. त्यामुळे २० ते २५ लाख रुपयांचे नुकसान झाले. खाद्यपदार्थांपासून ते पार्किंगपर्यंत विविध व्यवसायालाही तेवढाच फटका बसला. असा एकूण ५० लाख रुपयांचा फटका बसला आहे.उद्योजकांच्या प्रतिक्रियाउद्योजकांत भीतीचे वातावरणनवीन उद्योग येत नाहीत. अशा घटना घडत असतील, तर येणारे नवीन उद्योगही येणार नाहीत. मोठे उद्योग गेले तर मराठवाड्यातील भूमिपुत्राचे छोटे उद्योग कसे चालतील. या घटनेमुळे संपूर्ण उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.-राहुल मोगले, उद्योजकउद्योगांना बंदमधून वगळावेऔरंगाबादच्या इतिहासात ही अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे उद्योजक आतून हादरले असून, त्यांचे मनोबल खालावले आहे. अशा घटना टाळण्यासाठी उद्योगाला बंदमधून वगळण्यात यावे.-अनिल पाटील, उद्योजकदरोड्याचे गुन्हे दाखल करावेतनियोजन करून कारखान्याची तोडफोड केली आहे. उद्योगाची सुरक्षा महत्त्वाची आहे. यात पोलीस कमी पडले. यात बाहेरचे लोक जास्त होते. तोडफोड करणाºया हल्लेखोरांवर पोलिसांनी दरोड्याचे गुन्हे दाखल करावेत.-विकास पाटील, उद्योजकनकारात्मक परिणामवाळूज औद्योगिक वसाहतीत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान घडले आहे. या घटनेचा येथील औद्योगिक विकासावर नकारात्मक परिणाम होईल. ही जखम भरण्यास दीर्घकाळ जाईल.-बालाजी शिंदे, उद्योजकचुकीला माफी नाहीऔरंगाबाद शहर जगात बदनाम झाल्यामुळे गुतंवणूक करण्यास राष्ट्रीय, बहुराष्ट्रीय कंपन्या दहा वेळा विचार करतील. याचा फटका मराठवाड्याचा विकासालाच बसणार आहे. चुकीला माफी नाही. दोषींना लवकर अटक झाली पाहिजे.-किरण जगताप, उद्योजकपोलिसांनी दबावाला बळी पडू नयेदोषींना कडक शिक्षा झाली पाहिजे, पोलिसांनीही कोणाच्याही दबावाला बळी न पडता दोषींना अटक करावी. उद्योगांचा विकास होण्यासाठी आम्ही मागील काही दशकापासून प्रयत्नशील आहोत. अशा घटनांमुळे त्यास धक्का लागला आहे.-बी.एस. खोचे, उद्योजकतोडफोडीची चौकशी करावाळूज एमआयडीसीतील कंपन्यांची तोडफोडीचा निषेध येथील काही बहुराष्ट्रीय कंपन्यांचे रिपोर्टिंग विदेशातील त्यांच्या मुख्यालयात होते. अशा घटनेमुळे चुकीचा संदेश जगात गेला आहे. या घटनेची सीबीआय चौकशी करावी. सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात यावी. -नारायण पवार, उद्योजककामगारांची सुरक्षा धोक्यातमोठ्या उद्योगांनाच संरक्षण मिळत नाही. लघु उद्योगांना कसे मिळेल. उद्योजकांसाठी कामगारांची सुरक्षा महत्त्वाची असते. सुरक्षा असेल तर उद्योग टिकतील. अशा घटनांमुळे कामगारांची सुरक्षा धोक्यात आली आहे.-आनंद पाटील, उद्योजकसरकारला कर देऊ नयेपायाभूत सुविधा नसताना उद्योग करावे लागत आहेत. सुरक्षित शहरात उद्योग सुरू करावा, असे वाटत आहे. सुरक्षितता सरकार जोपर्यंत देत नाही तोपर्यंत उद्योजकांनी सरकारला कर देऊ नये.-सुरेश खिल्लारे, उद्योजकउद्योग चालविणे कठीणआंदोलनाचा गैरफायदा घेत समाजकंटकांनी नियोजनपूर्वक हल्ला केला. जे उद्योजक रोजगारनिर्मिती करतात. लाखो लोकांचे संसार त्यावर चालतात. त्याच उद्योजकांच्या जिवावर उठण्याचा हा प्रकार अतिशय घृणास्पद आहे. संरक्षणाशिवाय उद्योग चालविणे कठीण आहे.-अर्जुन गायके, माजी अध्यक्ष, मसिआ

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबादMarketबाजारagitationआंदोलन